शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

राणे समर्थकांना मनसेचा पर्याय

By admin | Updated: July 3, 2014 23:58 IST

शैलेश भोगले : नीतेश राणेंनी केला कार्यकर्त्यांचा अपमान

कणकवली : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची कारणीमिमांसा करताना नीतेश राणे यांनी काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी ठेकेदार बनल्याने नीलेश राणे यांचा पराभव झाल्याचे मान्य केले आहे. गेली २५ वर्षे नारायण राणेंसोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांचा त्यामुळे एकप्रकारे अपमानच झाला आहे. अशी टीका करतानाच राणे समर्थकांनी खऱ्या अर्थाने स्वाभिमानला आता आपला स्वाभिमान दाखवावा आणि मनसेसारखा चांगला पर्याय निवडावा, असे आवाहन मनसेचे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी केले.कणकवली येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाध्यक्ष जयसिंग नाईक, अनिल राणे, समीर आचरेकर, शैलेंद्र नेरकर उपस्थित होते. शैलेश भोगले पुढे म्हणाले, नीलेश राणे यांचा पराभव रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाला हे नीतेश यांनी मान्य केले. बंधुप्रेमापोटी आपल्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना ते दोष देत आहेत. गेली २५ वर्षे ही स्थिती अशीच असताना पालकमंत्री अथवा नीतेश राणे यांना त्याची जाणिव झाली नाही. रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून आपण विकास करतो आहे असे भासविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सिंधुदुर्गात पर्यटन हा महत्वाचा मुद्दा असताना रस्ते दर्जेदार व सुस्थितीत असणे आवश्यक होते.नजिकच्या गोवा राज्याचा विकास पर्यटनामुळे झाला हे माहित असतानाही सिंधुदुर्गात मात्र राणे यांच्याकडून जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. मनसेने रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न तसेच समर्थकांच्या दहशतीविषयी आवाज उठविला होता. यावेळी मनसे जनतेची दिशाभूल करीत असल्याचे काँग्रेसवाल्यांचे म्हणणे होते. मात्र, पराभवानंतर काँग्रेसला ठेकेदारांनी घेरले आहे, असे सांगितले जात आहे. इतकी वर्षे राणे यांनी ठेकेदरांच्या बळावर राजकारण केले. असेच एकप्रकारे त्यांनी मान्य केले आहे. राणेंसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे समर्थक त्यांच्यासमवेत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले. मात्र, आपण ही मोठी चूक केल्याची भावना या समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांना लाचारपणाचे जगणे जगावे लागत आहे. कार्यकर्ता हा भाऊ अथवा मित्र असल्याची भावना आवश्यक असताना ते नोकर आहेत असे नीतेश राणे यांना वाटत आहे. त्यामुळे समर्थकांनी आपला स्वाभिमान जागृत करावा. त्यांनी मनसेसारखा चांगला पर्याय स्वीकारल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांचे आम्ही स्वागतच करू, असेही भोगले म्हणाले. (वार्ताहर)