शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शहरीकरणामुळे शिमगोत्सवात बदल

By admin | Updated: March 12, 2015 00:08 IST

नवी पिढी हायटेककडे : परंपरा, प्रथांकडे होतेय दुर्लक्ष

सुनील गोवेकर - आरोंदा -आपल्या जिल्ह्यात शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षांची ही परंपरा जतन करण्यात येत आहे आणि पूर्वांपार चालत आलेल्या आगळ््यावेगळ््या आणि पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जात आहे; परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांचा विचार करता, वाढत्या शहरीकरणामुळे शिमगोत्सवामध्ये बदल झालेला दिसून येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आधुनिक विचारसरणीचा पगडा ग्रामीण भागातही पडल्याचे दिसून येत असून, याचा परिणाम शिमगोत्सवावर झालेला दिसत आहे. दहा - पंधरा वर्षांपूर्वी शिमगोत्सवात ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ‘रोंबाट’ हा प्रकार फार आवडीचा विषय असायचा. ढोल-ताशांचे वाद्य व त्यावर गाणी म्हणत (रोंबाट) नाचायचं आणि रात्रं जागवायची हा धुळवड होईपर्यंतचा कार्यक्रम असायचा. आता अलीकडच्या काळात मोबाईलच्या जमान्यात रात्रभर रोंबाट घालण्यात आपला वेळ न घालवता मोबाईल हाताळण्यातच अलीकडची पिढी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीची परंपरा सुरू असली, तरी त्यातला उत्साह नवीन पिढीमध्ये दिसून येत नाही. काही भागांमध्ये पारंपरिक ढोल-ताशांची जागा आता बेंजोने घेतली असून, गाणे न म्हणता वाद्यावर फक्त नाचगाण्याचा शॉर्टकट उपाय अलीकडे प्रचलित झाला आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी राधा-कृ ष्ण, विविध वेशभूषा साकारत ‘शबय’ मागत गावातील घराघरांसमोर फिरणारे कितीतरी लोक दिसायचे आणि वेशभूषा साकारण्यासाठी बरेच दिवस मेहनत घेणारे कलावंतही दिसायचे. अलीकडच्या काळात मात्र शहरीकरणाबरोबरच हे प्रकार कमी दिसत आहेत. शहरीकरणामुळे छोट्या-छोट्या गावांतील लोक हे शहरी राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या चालीरिती, परंपरा शिमगोत्सवामध्ये जपल्या जात असल्या, तरी नवीन पिढीला जुन्या परंपरा जतन करताना कमीपणा वाटत असल्याचे दिसून येते.काही वर्षांपूर्वी मळेवाड गावातील एक कलावंत बुधाजी मसूरकर हे शिमगोत्सव कालावधीत नाविन्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारायचे. प्रत्येक वर्षी नवनवीन कल्पकता आणण्याचा त्यांचा कल असायचा. त्याबद्दल पणजी दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेऊन सन्मानही केला होता.नव्या पिढीचा ओढा आधुनिकतेकडेदहा-पंधरा वर्षांपूर्वी राधा-कृ ष्ण, विविध वेशभूषा साकारत. ‘शबय’ मागत. गावातील घराघरांसमोर फिरणारे कितीतरी लोक दिसायचे आणि एखादी वेशभूषा साकारण्यासाठी बरेच दिवस मेहनत घेणारे कलावंतही दिसायचे. अलीकडच्या काळात मात्र शहरीकरणाबरोबरच हे प्रकार कमी प्रमाणात दिसत आहेत. शहरीकरणामुळे छोट्या-छोट्या गावांतील लोक हे शहरी राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जुन्या चालीरिती, परंपरा शिमगोत्सवामध्ये जपल्या जात असल्या, तरी नवीन पिढीला जुन्या परंपरा जतन करताना कमीपणा वाटत असल्याचे दिसून येत आहे.