शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

शहरीकरणामुळे शिमगोत्सवात बदल

By admin | Updated: March 12, 2015 00:08 IST

नवी पिढी हायटेककडे : परंपरा, प्रथांकडे होतेय दुर्लक्ष

सुनील गोवेकर - आरोंदा -आपल्या जिल्ह्यात शिमगोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. शेकडो वर्षांची ही परंपरा जतन करण्यात येत आहे आणि पूर्वांपार चालत आलेल्या आगळ््यावेगळ््या आणि पारंपरिक पद्धतीने शिमगोत्सव साजरा केला जात आहे; परंतु गेल्या दहा-पंधरा वर्षांचा विचार करता, वाढत्या शहरीकरणामुळे शिमगोत्सवामध्ये बदल झालेला दिसून येत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आधुनिक विचारसरणीचा पगडा ग्रामीण भागातही पडल्याचे दिसून येत असून, याचा परिणाम शिमगोत्सवावर झालेला दिसत आहे. दहा - पंधरा वर्षांपूर्वी शिमगोत्सवात ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी ढोल-ताशांच्या गजरात ‘रोंबाट’ हा प्रकार फार आवडीचा विषय असायचा. ढोल-ताशांचे वाद्य व त्यावर गाणी म्हणत (रोंबाट) नाचायचं आणि रात्रं जागवायची हा धुळवड होईपर्यंतचा कार्यक्रम असायचा. आता अलीकडच्या काळात मोबाईलच्या जमान्यात रात्रभर रोंबाट घालण्यात आपला वेळ न घालवता मोबाईल हाताळण्यातच अलीकडची पिढी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रात्रीची परंपरा सुरू असली, तरी त्यातला उत्साह नवीन पिढीमध्ये दिसून येत नाही. काही भागांमध्ये पारंपरिक ढोल-ताशांची जागा आता बेंजोने घेतली असून, गाणे न म्हणता वाद्यावर फक्त नाचगाण्याचा शॉर्टकट उपाय अलीकडे प्रचलित झाला आहे. दहा-पंधरा वर्षांपूर्वी राधा-कृ ष्ण, विविध वेशभूषा साकारत ‘शबय’ मागत गावातील घराघरांसमोर फिरणारे कितीतरी लोक दिसायचे आणि वेशभूषा साकारण्यासाठी बरेच दिवस मेहनत घेणारे कलावंतही दिसायचे. अलीकडच्या काळात मात्र शहरीकरणाबरोबरच हे प्रकार कमी दिसत आहेत. शहरीकरणामुळे छोट्या-छोट्या गावांतील लोक हे शहरी राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जुन्या चालीरिती, परंपरा शिमगोत्सवामध्ये जपल्या जात असल्या, तरी नवीन पिढीला जुन्या परंपरा जतन करताना कमीपणा वाटत असल्याचे दिसून येते.काही वर्षांपूर्वी मळेवाड गावातील एक कलावंत बुधाजी मसूरकर हे शिमगोत्सव कालावधीत नाविन्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारायचे. प्रत्येक वर्षी नवनवीन कल्पकता आणण्याचा त्यांचा कल असायचा. त्याबद्दल पणजी दूरदर्शनवर त्यांची मुलाखत घेऊन सन्मानही केला होता.नव्या पिढीचा ओढा आधुनिकतेकडेदहा-पंधरा वर्षांपूर्वी राधा-कृ ष्ण, विविध वेशभूषा साकारत. ‘शबय’ मागत. गावातील घराघरांसमोर फिरणारे कितीतरी लोक दिसायचे आणि एखादी वेशभूषा साकारण्यासाठी बरेच दिवस मेहनत घेणारे कलावंतही दिसायचे. अलीकडच्या काळात मात्र शहरीकरणाबरोबरच हे प्रकार कमी प्रमाणात दिसत आहेत. शहरीकरणामुळे छोट्या-छोट्या गावांतील लोक हे शहरी राहणीमान अंगिकारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जुन्या चालीरिती, परंपरा शिमगोत्सवामध्ये जपल्या जात असल्या, तरी नवीन पिढीला जुन्या परंपरा जतन करताना कमीपणा वाटत असल्याचे दिसून येत आहे.