शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

लोकप्रतिनिधींसाठी ‘सीईटी’ अनिवार्य करावी

By admin | Updated: May 26, 2014 01:16 IST

महेंद्र नाटेकर : स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेची सभा

 कणकवली : लोकप्रतिनिधी होण्यासाठी सीईटी परीक्षा अनिवार्य केल्यास प्रशासन गतिमान होऊन विकासाचा वेग वाढून जनसामान्यांचे प्रश्न सुटून देश समर्थ बनेल, असे ठोस विचार स्वतंत्र कोकणचे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केले. स्वतंत्र कोकण राज्य निर्मिती संघटनेची सभा संस्थेच्या कार्यालयात आयोजित केली होती. त्यावेळी नाटेकर बोलत होते. यावेळी शिवाजी देसाई, वाय. जी. राणे, बाबुराव आचरेकर, श्रुतिशया डोंगरे, जी. पी. सावंत आदी उपस्थित होते. नाटेकर म्हणाले, राजेशाही, हुकूमशाही व लोकशाही या भिन्न शासन पद्धती, त्यातील लोकशाही ही सर्वोत्कृष्ट शासन पद्धती आहे. लोकशाही म्हणजे लोकांचे, लोकांसाठी, लोकांनी चालविलेले राज्य होय. इंग्लंड, अमेरिकेप्रमाणेच स्वातंत्र्योत्तर कालखंडात आपणही लोकशाही शासनपद्धतीचा अवलंब केला. इंग्लंड, अमेरिकेचे लोक सुजाण असल्याने कोणत्याही आमिषाला बळी न पडता राज्यकारभार करायला सक्षम लोकप्रतिनिधी निवडून पाठवितात. परंतु आपले बहुसंख्य लोक अशिक्षित, अडाणी असून उच्चशिक्षित, अभ्यासू व प्रभावी वक्ता पाठविण्याऐवजी जाती- पाती, धर्म, पैसे व दहशत यांच्या ओझ्याखाली दबून आपला उमेदवार निवडतात. त्यामुळे आपली लोकशाही जाती-पाती, धर्म, भ्रष्टाचार व दहशत यांच्यामध्ये गटांगळ््या खात आहे. यातून सुटका करून घेऊन राष्ट्र समर्थ पायावर उभे करण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडून जाणार्‍यांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करणे आवश्यक आहे. नुकत्याच निवडून आलेल्या खासदारांची शैक्षणिक पात्रता कशी आहे पहा- पाचवी पास- ६, आठवी पास- ९, दहावी पास- ४८, बारावी पास- ५७, पदवीधर- १६, पदव्युत्तर- १५०, व्यवसाय पदवी- १०६, डॉक्टरेट- ३३, इतर १० मिळून एकूण ५४१. यातील बहुसंख्य खासदार अप्रशिक्षित असून हे देशाचा कारभार कसा करणार? शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कारकून, अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर आदींची सीईटी परीक्षा घेऊन ते आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम आहेत याची खात्री करून घेऊन त्यांच्या नेमणुका केल्या जातात. तसेच ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार होण्यासाठी निश्चित शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता ठरविण्याची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी किमान एस.एस.सी. पास व ग्रामपंचायत अ‍ॅक्टवर आधारीत परीक्षा पास, जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी उमेदवार किमान एच.एस.सी. पास व जिल्हा परिषद अ‍ॅक्ट परीक्षा उत्तीर्ण असावा. आमदार होण्यासाठी उमेदवार किमान पदवीधर असावा व राज्यघटना तसेच राज्याने वेळोवेळी केलेले कायदे यावर आधारीत परीक्षा उत्तीर्ण असावा. तसेच खासदार होण्यासाठी भारतीय राज्यघटना व संसदेने वेळोवेळी केलेले कायदे यावर आधारीत परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा. परीक्षा पास होण्यासाठी किमान ६० टक्के गुण मिळविणे आवश्यक असावे. असे उत्तीर्ण झालेले उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षातून किंवा स्वतंत्रपणे निवडणुका लढवू शकतील. कायदा व नियमांचा चांगला अभ्यास झाल्याने प्रशासनावर मांड ठोकून विकासाची घोडदौड करता येईल. अल्पशिक्षित, गुंडप्रवृत्तीचे लोक या परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकल्याने राजकारणातील गुंडगिरीचे प्रमाण फारच कमी होईल. लोकशाही सक्षम होऊन राष्ट्र मजबूत पायावर उभे राहील, असे नाटेकर म्हणाले. विश्वनाथ केरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)