शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

संचमान्यतेचे निकष जाहीर

By admin | Updated: August 30, 2015 22:50 IST

तुकडी पद्धत बंद : शिक्षक हवा असेल तर वर्गखोली बांधा!

सागर पाटील - टेंभ्ये  -प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रलंबीत संच मान्यता करण्याबाबतचे निकष शासनाने नुकतेच जाहीर केले आहेत. या पद्धतीनुसार तुकडी पद्धत बंद करण्यात आली असून, नैसर्गिक वाढ देखील थांबविण्यात आली आहे. विद्यार्थी संख्येच्या निकषावर शिक्षक मंजूर करण्याचे नवीन धोरण राज्य शासनाने अंमलात आणले आहे. राज्यातील माध्यमिक शाळा बंद करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे संघटनात्मक स्तरावरुन बोलले जात आहे. नवीन शिक्षक अनुज्ञेय होण्यासाठी वर्गखोली बंधनकारक करण्यात आली आहे.प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र निकष निश्चित करण्यात आले आहेत. पहिली ते चौथी अथवा पाचवीपर्यंतच्या वर्गांना ६० विद्यार्थ्यांपर्यंत २ शिक्षक अनुज्ञेय राहणार आहेत. त्याच्या पुढे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक अनुज्ञेय राहणार आहे. जुन्या शाळांमध्ये १३५ पेक्षा अधिक व नवीन शाळांमध्ये १५० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तरच प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक पद मिळणार आहे. उच्च प्राथमिक शाळा म्हणजे पाचवी ते सातवी अथवा सहावी ते आठवीच्या जुन्या शाळांमध्ये ३६ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांसाठी ३ शिक्षक अनुज्ञेय राहणार आहेत. १०५ पेक्षा अधिक पटसंख्या झाल्यास त्यापुढे ३५ विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक मिळणार आहे. या शाळांमध्ये ९० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तरच मुख्याध्यापक पद मंजूर होणार आहे.नववी, दहावीचे वर्ग असणाऱ्या माध्यमिक शाळांसाठी दोन वर्ग मिळून ४० पेक्षा अधिक विद्यार्थी असणे आवश्यक आहे. दोन वर्गांसाठी ३ शिक्षक अनुज्ञेय राहणार आहेत. कोणत्याही नवीन वर्गात ६० पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास एक जादा शिक्षकपद अनुज्ञेय राहणार आहे. नवीन शाळेसाठी नववीचा वर्ग ४० विद्यार्थ्यांचा असणे आवश्यक आहे. शाळेचा स्तर निश्चित करताना पहिली ते सातवी, पहिली ते आठवी, पहिली ते दहावी, पहिली ते बारावी, पाचवी ते दहावी, सहावी ते दहावी, पाचवी ते बारावी, सहावी ते बारावी, आठवी ते बारावी, नववी ते बारावी अशाप्रकारे करण्यात आले आहेत. या स्तरांमध्ये वरिष्ठ स्तरासाठी मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असणार आहे.नवीन शिक्षक पदाला मान्यता देताना प्रत्येक शिक्षकासाठी स्वतंत्र वर्गखोली आवश्यक आहे. वर्गखोली उपलब्ध नसेल तर शिक्षकाला मान्यता देण्यात येणार नसल्याचे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे अडचण निर्माण होणार आहे.निकष बदलावे लागतील : कानडेसंच मान्यतेसंदर्भात निश्चित करण्यात आलेले निकष माध्यमिक शाळांच्यादृष्टीने घातक आहेत. तुकडी पद्धत बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. ग्रामीण भागातील शाळांना विद्यार्थी संख्येची अट पूर्ण करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे भविष्यात माध्यमिक शाळा मोठ्या प्रमाणात बंद होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वाढ बंद केल्याने शिक्षक संख्येमध्ये घट होणार आहे. भाषा, गणित/विज्ञान व समाजशास्त्र या विषयांसाठी शिक्षक निश्चित करण्यात आले आहेत. मात्र, विशेष शिक्षकांबाबत कोणतीही तरतूद या आदेशात नाही. कार्यभार निश्चितीबाबत कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. याबाबतची खंत माध्यमिक अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी व्यक्त केली.माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक पद धोक्यात नवीन संचमान्यता निकषानुसार माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक पद धोक्यात आले आहे. या निर्णयानुसार सध्या सुरु असणाऱ्या माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय असणार नाही. जिल्ह्यात अशा शाळांचे प्रमाण अधिक असल्याने या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास या शाळांमध्ये मुख्याध्यापक पदच राहणार नाही. शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या विविध संयुक्त शाळांच्या प्रकारामध्ये इयत्ता आठवी ते दहावी हा प्रकारच नोंदविण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या प्रकारच्या शाळांची संख्या सर्वाधिक आहे.