शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

काजू व्यावसायिकांना भरपाई द्यावी

By admin | Updated: December 29, 2014 00:07 IST

बाबल नाईक : अवकाळी पाऊस ठरला पिकासाठी हानिकारक

कसई दोडामार्ग : अवकाळी पावसामुळे व बदललेल्या वातावरणामुळे काजू बागायतीला फटका बसून जवळजवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तरीही कृषी विभागाकडून नुकसानाचे पंचनामे न झाल्याने कोकणातील काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई मिळणार नाही. त्यामुळे काजू व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे. शासनाने याची दखल घेऊन काजू व्यावसायिकांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काजू व्यावसायिक बाबल नाईक यांनी केली आहे. मोहोर येत असताना पडलेला अवकाळी पाऊस काजू उत्पादनासाठी धोकादायक ठरला आहे. या पावसामुळे काजू व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. यासाठी कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी केली होती. मात्र, शासनाच्या उदासिन धोरणामुळे कृषी विभागाने याची साधी दखलसुद्धा घेत बागायतींना भेटही दिली नाही. याचा फटका काजू व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे काजू व्यावसायिकांनी पत्रकारांना बोलावून काजू बागांची पाहणी करून घेतली. यावेळी केलेल्या पाहणीत काजू बागायतींना अवकाळी पावसाचा बराच फटका बसल्याचे दिसून आले. काजू मोहोर करपून गेला असून काही झाडांना मोहोर न येता पालवी आली असल्याचे आढळून आले. यामुळे काजू पीक होणार नाही, असे नाईक यांनी सांगितले. यावेळी चंद्रशेखर देसाई, काजू व्यावसायिक सूर्यकांत देऊलकर, शरद गवस, मायको गवस, सुुवदास मणेरीकर, शरद नाईक उपस्थित होते. यावेळी बाबल नाईक म्हणाले, ज्यावेळी काजू झाडांना मोहोर येतो, त्याचवेळी अवकाळी पाऊस पडल्याने आलेला मोहोर करपून गेला व झाडांना मोहोर येण्याऐवजी नवीन पालवी आली. त्यामुळे विकसित १ या काजू झाडांना फटका बसला आहे. ही जात हंगामात एकदाच मोहरते. तसेच १ ते १७ काजू बागायतदारांना याचा फटका बसला आहे. तसेच दमट हवामानामुळे कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. झाडांच्या फांदीचा रस शोषून हे कीटक नष्ट करतात. त्यामुळे मोहोर आलेल्या फांद्या करपून गेल्या आहेत. असे असताना कृषी विभागाने बागायतदारांची विचारपूसही केली नाही. झाडांचे पंचनामे केले नाहीत. शासनाच्या जाचक अटीमुळे कोकणातील काजू बागायतदार, सुपारी बागायतदार, नारळ बागायतदार, आंबा बागायतदार यांना नुकसान भरपाई मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच येथील हवामानाचा विचार करून शासनाने नियमावली तयार करावी. तसेच पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बाबल नाईक यांनी दिला आहे. उद्योजक चंद्रशेखर देसाई म्हणाले, तालुक्यात ३२०० हेक्टर काजू क्षेत्राची नोंद असली, तरी यापेक्षा अधिक पटीने काजू बागायतीचे क्षेत्र आहे. परंतु त्याची नोंद कृषी विभागाकडे नाही. जंगली भागात मोठ्या प्रमाणात काजू लागवड केली जाते. नुकसानग्रस्त बागायतदारांसह काजू उद्योजकांनाही आर्थिक सहकार्य करणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. (वार्ताहर)