शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

पंचक्रोशीवर आधारित पर्यटन आराखडा तयार करा

By admin | Updated: November 1, 2015 00:13 IST

दीपक केसरकर : ओरोस येथे ग्राम पर्यटनाबाबतच्या बैठकीत मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : ग्राम पर्यटनाच्या दृष्टीने शासनाच्यावतीने संपूर्ण कोकणाकरिता ४५ कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गचा महत्वाचा वाटा आहे. त्या अनुषंगाने या जिल्ह्यातील ग्राम पर्यटनाच्या विकासाकरिता पंचक्रोशींवर आधारित पर्यटन विकास आराखडा तयार करा, असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. शरदचंद्र पवार भवन, ओरोस येथे आयोजित व्हिलेज टुरिझम व ग्राम पर्यटनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा नियोजन अधिकारी हरिबा थोरात, ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे डॉ. साळवी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे डॉ. मुणगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले, पर्यटनातून प्रत्येक घरी विकास पोहचला पाहिजे. यासाठी पर्यटनावर आधारित कामांचा प्रामुख्याने विचार होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतींनी आपली बलस्थाने ओळखून त्या धर्तीवर पर्यटन विकास आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील धार्मिक पर्यटन स्थळे, वर्षा पर्यटन स्थळे, थंड हवेची ठिकाणे या सर्व पर्यटनस्थळांची एकमेकांशी सांगड घालणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती, जंगलसफर, लोककला व जैवविविधता यावर आधारित पर्यटन विकासाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत. तरी ग्रामस्थांनी आपल्या पंचक्रोशीत असलेल्या पर्यटनस्थळांवर तसेच पर्यटकांना उपलब्ध करून द्यावयाच्या सोयीसुविधांवर आधारित आराखड्याचे नियोजन करावे. आमदार वैभव नाईक म्हणाले, केवळ रस्ते तयार केल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल असे नाही तर पर्यटनाच्या संपूर्ण विकासाकरिता पर्यटनाला चालना देणाऱ्या बाबींचे योग्य नियोजन करणे आवश्यक असून, उत्तम नियोजन असेल तर कमी पैशातही आपल्या पंचक्रोशीच्या पर्यटनाचा विकास होऊ शकेल. जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर प्रमाणात जैववैविधता असून पर्यटन विकास आराखडा तयार करताना जैववैविधता संवर्धनाच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत पातळीवर जैववैविधतेची समिती गठीत करून त्या- त्या पंचक्रोशीतील दुर्मीळ प्राणी, वनस्पती, पक्षी यांच्या नोंदी घेणे आवश्यक असून जैववैविधतेच्या अनुषंगाने पर्यटकांना आकर्षित करून पर्यटनाला चालना मिळू शकेल. तसेच ग्रामपंचायतींनी भौगोलिक परिस्थितीवर आधारित पर्यटन विकास आराखडा तयार करावा, असे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्लेचे डॉ. साळवी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे डॉ. मुणगेकर यांनी आपले विचार मांडले. (प्रतिनिधी) नवाबागची फिशर पर्यटन व्हिलेज म्हणून निवड जिल्ह्यातील गावांचा पर्यटनावर आधारित विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नवाबाग या गावाची पर्यटन फिशर व्हिलेज म्हणून निवड करण्यात आली आहे. या गावामध्ये पर्यटन फिशर व्हिलेज म्हणून विकास करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. धनगर समाजाच्या समस्या सोडविणार : पालकमंत्री जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मागण्या लक्षात घेता प्रशासनाने या समाज बांधवांना शासकीय योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवावा, त्यानुसार घेण्यात येणाऱ्या योजना याची माहिती सादर करावी, वाडीनिहाय घेण्यात येणाऱ्या जनसुविधांची यादी बनवावी व त्यानुसार समाज कल्याण विभागाने या कामाला प्राधान्य देऊन आराखडा सादर करावा.