शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

जिल्ह्याचे बजेट ११0 कोटींपर्यंत नेऊ

By admin | Updated: February 2, 2015 23:44 IST

दीपक केसरकर : जिल्हा नियोजन बैठकीत ग्वाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन आराखड्यातील मंजूर १०० कोटी निधीपैकी आतापर्यंत ६२ कोटी ३६ लाख निधी प्राप्त झाला असून, मार्चअखेर १०० टक्के निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तर सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ७० कोटी ३३ लाख निधी बजेटचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्याचे वार्षिक बजेट ११० कोटींपर्यंत वाढवून घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार वैभव नाईक, नीतेश राणे, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबा थोरात, आदींसह अधिकारी, खातेप्रमुख, समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीची सभा राजकीय बदलानंतर प्रथमच सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरूवातीलाच काँग्रेस आमदार नीतेश राणे यांच्यासह सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्थायी समितीचा आरोंदा जेटी पाहणी दौरा व त्यावेळी झालेली पोलीस कारवाई, नियोजन आराखड्यातील जुनी कामे कायम ठेवण्याची मागणी तसेच काही कामे यादीतून वगळल्याचा आरोप करीत सभागृहात हंगामा केला. विरोधी सदस्यांना शांत करीत जिल्हा नियोजनची पहिलीच सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे राजकीय कसब दाखवत शांतपणे हाताळली. तुमचे अधिकार तुम्हाला मिळतील, पण त्याचा अतिरेक नको. पालकमंत्री म्हणून मलाही अधिकार आहेत, पण ते मला वापरायला लावू नका, असेही यावेळी आक्रमक सदस्यांना सुनावले. (पान ८ वर) या विभागांचा ५0 टक्के पेक्षा कमी झाला खर्चजिल्हा दुग्धविकास, कृषी अधीक्षक कार्यालय, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता, पत्तन अभियंता, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी, जिल्हा व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण, जिल्हा समाजकल्याण, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभागांचा खर्च निम्म्याहून कमी झाला.सभेचा शेवट गोडसभेच्या सुरूवातीला वातावरण तापले होते. काही मुद्यांवर सत्ताधारी- विरोधी सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली. तरीही आपल्या खास शैलीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वांना शांत करीत प्रेमाने जग जिंकता येते, असा गोड सल्ला दिला.११ कोटी १७ लाख समर्पितखर्च न होणारे ११ कोटी १७ लाख रूपये अन्य विभागांना सोमवारच्या सभेत वर्ग करण्यात आले. यात गाभा क्षेत्रात ८ कोटी ४ लाख तर बिगर गाभा क्षेत्रात ३ कोटी १३ लाख असे वाढवून दिले आहे.चालू आर्थिक वर्षाचा निधी शंभर टक्के खर्च करून पुढील वर्षासाठी ११० कोटीपर्यंत निधी प्राप्त करून घेऊ, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी सभेत दिली.सन २०१५-१६चे तीन स्वतंत्र प्रारूप आराखडे तयार करण्यात आले असून ७० कोटी, १०० कोटी व १२५ कोटी असे तीन प्रकल्प आराखडे तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्णाचा विकास सर्वांना विश्वासात घेऊन करायचा आहे. ज्या विभागाच्या तक्रारी आहेत, समस्या आहेत, अशा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या खास सभा घेऊन तसेच सर्व आमदार, खासदार, समिती सदस्यांना एकत्रित घेऊन सभांचे नियोजन केले जाईल. तेथे सविस्तर चर्चा करून समस्या सोडविल्या जातील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)