शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

जिल्ह्याचे बजेट ११0 कोटींपर्यंत नेऊ

By admin | Updated: February 2, 2015 23:44 IST

दीपक केसरकर : जिल्हा नियोजन बैठकीत ग्वाही

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन आराखड्यातील मंजूर १०० कोटी निधीपैकी आतापर्यंत ६२ कोटी ३६ लाख निधी प्राप्त झाला असून, मार्चअखेर १०० टक्के निधी खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तर सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी ७० कोटी ३३ लाख निधी बजेटचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्याचे वार्षिक बजेट ११० कोटींपर्यंत वाढवून घेऊ, अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली.जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, राज्यसभा सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर, आमदार वैभव नाईक, नीतेश राणे, जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, जिल्हा नियोजन अधिकारी हरीबा थोरात, आदींसह अधिकारी, खातेप्रमुख, समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीची सभा राजकीय बदलानंतर प्रथमच सोमवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरूवातीलाच काँग्रेस आमदार नीतेश राणे यांच्यासह सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्थायी समितीचा आरोंदा जेटी पाहणी दौरा व त्यावेळी झालेली पोलीस कारवाई, नियोजन आराखड्यातील जुनी कामे कायम ठेवण्याची मागणी तसेच काही कामे यादीतून वगळल्याचा आरोप करीत सभागृहात हंगामा केला. विरोधी सदस्यांना शांत करीत जिल्हा नियोजनची पहिलीच सभा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचे राजकीय कसब दाखवत शांतपणे हाताळली. तुमचे अधिकार तुम्हाला मिळतील, पण त्याचा अतिरेक नको. पालकमंत्री म्हणून मलाही अधिकार आहेत, पण ते मला वापरायला लावू नका, असेही यावेळी आक्रमक सदस्यांना सुनावले. (पान ८ वर) या विभागांचा ५0 टक्के पेक्षा कमी झाला खर्चजिल्हा दुग्धविकास, कृषी अधीक्षक कार्यालय, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता, पत्तन अभियंता, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी, जिल्हा व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण, जिल्हा समाजकल्याण, शिक्षण विभाग, समाजकल्याण विभागांचा खर्च निम्म्याहून कमी झाला.सभेचा शेवट गोडसभेच्या सुरूवातीला वातावरण तापले होते. काही मुद्यांवर सत्ताधारी- विरोधी सदस्यांमध्ये हमरीतुमरी झाली. तरीही आपल्या खास शैलीत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वांना शांत करीत प्रेमाने जग जिंकता येते, असा गोड सल्ला दिला.११ कोटी १७ लाख समर्पितखर्च न होणारे ११ कोटी १७ लाख रूपये अन्य विभागांना सोमवारच्या सभेत वर्ग करण्यात आले. यात गाभा क्षेत्रात ८ कोटी ४ लाख तर बिगर गाभा क्षेत्रात ३ कोटी १३ लाख असे वाढवून दिले आहे.चालू आर्थिक वर्षाचा निधी शंभर टक्के खर्च करून पुढील वर्षासाठी ११० कोटीपर्यंत निधी प्राप्त करून घेऊ, अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री केसरकर यांनी सभेत दिली.सन २०१५-१६चे तीन स्वतंत्र प्रारूप आराखडे तयार करण्यात आले असून ७० कोटी, १०० कोटी व १२५ कोटी असे तीन प्रकल्प आराखडे तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्ह्णाचा विकास सर्वांना विश्वासात घेऊन करायचा आहे. ज्या विभागाच्या तक्रारी आहेत, समस्या आहेत, अशा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या खास सभा घेऊन तसेच सर्व आमदार, खासदार, समिती सदस्यांना एकत्रित घेऊन सभांचे नियोजन केले जाईल. तेथे सविस्तर चर्चा करून समस्या सोडविल्या जातील, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)