शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सेना-राष्ट्रवादीला टक्कर देण्यास भाजपही सज्ज

By admin | Updated: April 17, 2015 00:05 IST

चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. त्यातील चिपळूण मतदार संघातील ४४ ग्रामपंचायती भाजप लढवत आहे.

चिपळूण : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यानंतर ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यामुळे मतदारांना तिसरा राजकीय पर्याय उपलब्ध झाला आहे. सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील चित्र पाहता भाजपाविरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत गावात आहे. केंद्रातील विजयानंतर अनपेक्षितपणे राज्यात भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत प्रथम क्रमांक मिळवला. चौथ्या क्रमांकाचा पक्ष असलेला भाजप एकदम पहिल्या क्रमांकावर गेल्यानंतर राजकारणातील चित्र बदलले आहे. पंधरा वर्षांनंतर सत्ता हातात आल्यामुळे सत्तेचा उपयोग करुन ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. सभासद नोंदणीसह पक्षाचे विविध उपक्रम सुरु झाले आहेत. त्यामुळे एकूणच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. चिपळूण तालुक्यातील ८३ ग्रावांमध्ये पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली होती. त्यातील चिपळूण मतदार संघातील ४४ ग्रामपंचायती भाजप लढवत आहे. यापैकी ४ ग्रामपंचायती भाजपने बिनविरोध निवडून आणल्या आहेत. २८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५५ गावांमध्ये निवडणुका सुरु आहेत. तसेच सत्तेचा उपयोग करुन स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.भाजपकडे तालुका पातळीवर सक्षम कार्यकर्ता नसतानाही ग्रामपंचायतीमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही माधव गवळी यांनी पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरू ठेवले असल्याने अनेक युवक भाजपशी जोडले जात आहेत. ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते गाव पातळीवर भाजपचे पॅनल तयार करुन निवडणुकीच्या रणांगणात दंड थोपटून उभे आहेत. गाव पातळीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी भर दिला जात आहे. भाजपेतर कार्यकर्ते व नेते मंडळी भाजपशी जवळीक साधून पाठिंबा देत आहेत. त्यामुळे भाजप या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. (प्रतिनिधी)