शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याच्या समस्येवर ‘बायोगॅस’चा उतारा!

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

रत्नागिरी नगरपरिषद : दीड कोटीच्या प्रकल्पातून बायोगॅसवर वीज निर्मिती होणार...

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने नेटाचे प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेच्याच जागेत ५ टन ओल्या कचऱ्यापासून दररोज बायोगॅस निर्मिती व त्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी दीड कोटीचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्याची समस्या कमी होऊन नगरपरिषदेला वीजही उपलब्ध होईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. रत्नागिरी पालिका २००० सालापासून कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. मात्र, अनंत अडथळ्यांच्या शर्यतीत कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प रेंगाळल्याने कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचविण्यात आले होते. आता रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील ५ गुंठे जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी निविदा पध्दतीने कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक प्राथमिक तयारी सुरू आहे. शहरात दररोज जमा होणारा २२ टन कचरा गेल्या काही वर्षांपासून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जात होता. त्यामुळे तेथे कचऱ्याचे ढीग तयार झाले होते. या समस्येवर मात करण्यासाठी गेल्याच महिन्यात कोकणनगरमधील चिऱ्यांच्या मोकळ्या खाणींमध्ये शहरातील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे साळवी स्टॉप परिसरातील लोकांची समस्या संपुष्टात आली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबवण्यासाठी पालिकेने दांडेआडोम येथेही जागा घेतली होती. त्या जागेत जाण्यासाठी रस्त्याला जागा देण्यास विरोध झाल्याने काही काळ दांडेआडोमचा विषय रखडला होता. परंतु नंतर जिल्हा प्रशासनाने रस्त्याची जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही ग्रामस्थ न्यायालयात गेल्याने व त्यांच्या बाजूने निकाल लागल्याने दांडेआडोम प्रकल्पाचा विषय थंडावला आहे. रत्नागिरीचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे दररोजचे कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. असे असताना कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पच उभारणे शक्य न झाल्याने ही समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका नेमके काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांना विचारले असता, हा बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित असून, त्याबाबतची प्राथमिक तयारी झाल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रस्तावित बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीतून शहराला बायोगॅसपासून तयार झालेल्या विजेचाही वापर करता येणार आहे. दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यातून ओला कचरा वेगळा केला जाणार आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याने कचऱ्याचे ढीग कमी होतील. कचऱ्याची समस्या त्यातून बऱ्याच प्रमाणात सुटणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला. प्रस्तावित प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष आहे.महेंद्र मयेकर : दररोज पाच टन कचऱ्यावर होणार प्रक्रिया...कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस व त्यापासून वीज निर्मितीच्या या प्रकल्पासाठी जागेचा मुद्दा महत्त्वाचा होता. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांसाठी शहरात जागा देण्यास विरोध होता. मात्र, आता छोट्या स्वरुपातील या प्रकल्पाला जागेचीही उपलब्धता झाली आहे. प्रस्तावित बायोगॅस प्रकल्प झाल्यानंतर कचऱ्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, कचरा संकलित होण्याचे प्रमाण लक्षात घेता शहरात नजीकच्या काळात आणखी काही प्रकल्प नगरपरिषदेला उभारावे लागणार आहेत. कचरा नष्ट करणार...शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरणच्या आवारात कचरा टाकणे बंद झाले आहे. मात्र, तेथे असलेला कचरा जाळून वा अन्य मार्गाने नष्ट केला जाणार आहे. त्यामुळे साळवी स्टॉप परिसरातील कचऱ्याची समस्या संपेल, असे मुख्याधिकारी एम. बी. खोडके म्हणाले.