शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
7
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
8
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
9
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
10
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
11
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
12
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
13
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
14
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
15
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!
19
जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?
20
रश्मिका मंदानाने घातली डायमंड रिंग, विजय देवरकोंडाशी झाला साखरपुडा? चर्चांना उधाण

मुंबई-गोवा मृत्यूचा महामाग

By admin | Updated: November 23, 2014 23:44 IST

हायवेचा झाला डायवे : बेशिस्त वाहतूक, वाढलेल्या वाहनांमुळे निरपराधांचा बळी...र्!

श्रीकांत चाळके - खेड--मुंबई - गोवा महामार्गावर सध्या अपघातांची मालिका सुरू आहे़ ती खंडित करण्यासाठी ज्या ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे, त्यांची महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी ठोस अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे आतापर्यंत या मार्गावर ३ हजारांहून अधिक बळी गेले आहेत. अपघातात बळी जाणाऱ्यांचा हा आकडा कमी करण्यासाठी पोलीस आणि महामार्ग विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रित बैठक घेऊन तसा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे.शुक्रवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भोस्ते घाटात झालेल्या अपघातांची भीषणता अधोरेखित झाली आहे़सद्यस्थितीत या महामार्गावर वाहनांचा मोठा भार आहे. त्यामुळे अपघातांची संख्याही लक्षणीय आहे. अपघातांची संख्या लक्षात घेता अपघाताला कारणीभूत असलेल्या वाहनचालकांचा परवाना, वाहनांची नोंदणी रद्द करण्यासंबंधी आतापर्यंत पोलिसांकडून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे एकही प्रस्ताव गेला नाही हे विशेष! याशिवाय गाडीचा परवाना आणि नोंदणी रद्द करण्याचा अधिकार परिवहन कार्यालयाला आहे. मात्र, यासाठी पोलिसांकडून प्रस्ताव पाठवण्यात येत नाहीत. त्यामुळे वाहनचालक बिनधास्त असतात. पोलीस यंत्रणेकडून याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत असल्याने अनेक वाहनचालकांचा मुजोरपणा वाढत आहे.महामार्गावर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत गेल्या १० वर्षात कमालीची वाढ झाली आहे. अपघातांची आणि त्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या चिंताजनक आहे. हजारो वाहने या मार्गावर धावत आहेत. यामध्ये अवजड वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यांची देखभाल न करणे तसेच वाहनांचा अतिवेग आणि मद्यप्राशनासह वाहनचालकांचा मुजोरपणा यामुळे अवघड वळणावर अनेक अपघात झाले आहेत़ गेल्या काही दिवसात वाढलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता वाहनचालकांसाठी ही मोठी चिंतेची बाब आहे. काही वाहनचालकांचा बेशिस्तपणा निरपराध वाहनचालकाच्या जिवावर बेतत आहे. त्यामुळे मृत्यूचा महामार्ग अशी मुबई-गोवा महामार्गाची ओळख झाली आहे. गेल्या काही वर्षात शेकडो बळी घेणाऱ्या या महामार्गाने अनेकांना कायमचे जायबंदीही केले आहे. हे रोखण्याकरिता महामार्ग वाहतूक पोलीस यत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. पोलिसांनी अर्थपूर्ण व्यवहाराला आळा घालून निर्बंध लादल्यास भीषण अपघातांची संख्या नक्कीच कमी होऊ शकेल. अवजड वाहनचालकांच्या मुजोरपणामुळे अनेकवेळा दुचाकीस्वारांचा जीव जाण्याच्या प्रकारात वाढ होत आहे, हे भीषण वास्तव आहे. अपघातग्रस्तांना सरकारी तूटपुंजी मदत जाहीर करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात असल्याचे म्हटले जात आहे.अपघात-५०५ मृत्यू-७३ गंभीर-१२० किरकोळ जखमी-३७०अपघात-४८१ मृत्यू-७५ गंभीर-१९२ किरकोळ जखमी-४८२अपघात-४८७ मृत्यू-६१गंभीर-२०३ किरकोळ जखमी-२३२अपघात-४६३ मृत्यू-१२गंभीर-२०६ किरकोळ जखमी-२२९अपघात-५०० मृत्यू-७५गंभीर-२१७ किरकोळ जखमी-४१३अपघात-४३८ मृत्यू-७१गंभीर-२२१किरकोळ जखमी-४१५