शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएम’विरोधामागे मोठी लॉबी

By admin | Updated: October 27, 2014 23:24 IST

अजित नरदे : औरंगाबादमध्ये २९ रोजी प्रतिआंदोलन उभारणार

सांगली : जनुकीय बदलांच्या (जीएम) चाचण्यांमुळे पर्यावरणाची, आरोग्याची हानी होत असल्याची अफवा पसरवून काही लोकांनी आंदोलनाची तयारी केली आहे. या आंदोलनामागे कीटकनाशक कंपन्यांची लॉबी कार्यरत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कोले यांनी याप्रश्नी प्रतिआंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. नरदे म्हणाले की, कापूस शेतीत अत्यंत फायदेशीर ठरलेले जीएम तंत्रज्ञान इतर पिकात येऊ नये यासाठी जीएम मक्याच्या राहुरी आणि परभणी कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या चाचणी प्रक्रियेला काही मंडळी विरोध करीत आहेत. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांना पुढे करीत आहेत. जीएमविरोधी आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पूर्ण विरोध असून, आम्ही प्रतिआंदोलन उभारणार आहोत. येत्या २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथे कृषी आयुक्त कार्यालयासमोर जीएम प्रयोगांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना पाठिंबा मेळावा घेणार आहे. जीएमला विरोध व्यक्तिगत स्वार्थापोटी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ग्रीन पीस ही संघटना त्यांच्या आंदोलनाची मुख्य सूत्रधार आहे. संस्थेचे काही पगारी कार्यकर्ते काही स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरून हे आंदोलन चालवित आहेत. या आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही. आंदोलनाच्या पत्रकावर सह्या करणाऱ्या १२0 लोकांपैकी ११0 लोक शहरी आहेत. उरलेलेसुद्धा सेवा संस्थावाले आहेत. भारतीय शेतकऱ्यांना फायदेशीर असलेल्या जीएम तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचा डाव आखण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे कापूस उत्पादनात वाढ होऊन कीटकनाशकांच्या वापरात ८0 टक्के घट झाली आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाला विरोध करणारे पर्यावरणवादी नसून कीटकनाशक लॉबीचेच हस्तक आहेत, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेत ७0 ते ८0 टक्के अन्न हे जीएमचे असते. त्याठिकाणी लोकांच्या आरोग्याला धोका झाल्याचे एकही उदाहरण नाही. तसे झाले असते तर, जीएम अन्नावर अमेरिकेत बंदी घातली असती. जीएमला विरोध करण्याच्या मुद्द्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. विरोधाच्या सर्व मुद्द्यांची उत्तरे आम्ही दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा लोकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)गुजरातसारखे धोरण... ऊसदराबाबत महाराष्ट्रातच अडचणी निर्माण केल्या जातात. वास्तविक गुजरातमध्ये साखरेचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. बगॅस आणि मोलॅसिसवर त्यांचे कारखाने चालतात. गुजरातमध्ये अशी कारखानदारी यशस्वी होत असेल, तर मग महाराष्ट्रातच का प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेतकरी व कारखानदार या दोन्हींना योग्य ठरेल असे धोरण हवे, असे नरदे म्हणाले.