शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

‘जीएम’विरोधामागे मोठी लॉबी

By admin | Updated: October 27, 2014 23:24 IST

अजित नरदे : औरंगाबादमध्ये २९ रोजी प्रतिआंदोलन उभारणार

सांगली : जनुकीय बदलांच्या (जीएम) चाचण्यांमुळे पर्यावरणाची, आरोग्याची हानी होत असल्याची अफवा पसरवून काही लोकांनी आंदोलनाची तयारी केली आहे. या आंदोलनामागे कीटकनाशक कंपन्यांची लॉबी कार्यरत आहे, अशी टीका शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित नरदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय कोले यांनी याप्रश्नी प्रतिआंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. नरदे म्हणाले की, कापूस शेतीत अत्यंत फायदेशीर ठरलेले जीएम तंत्रज्ञान इतर पिकात येऊ नये यासाठी जीएम मक्याच्या राहुरी आणि परभणी कृषी विद्यापीठात सुरू असलेल्या चाचणी प्रक्रियेला काही मंडळी विरोध करीत आहेत. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांना पुढे करीत आहेत. जीएमविरोधी आंदोलनाला शेतकरी संघटनेचा पूर्ण विरोध असून, आम्ही प्रतिआंदोलन उभारणार आहोत. येत्या २९ आॅक्टोबर रोजी औरंगाबाद येथे कृषी आयुक्त कार्यालयासमोर जीएम प्रयोगांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना पाठिंबा मेळावा घेणार आहे. जीएमला विरोध व्यक्तिगत स्वार्थापोटी सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ग्रीन पीस ही संघटना त्यांच्या आंदोलनाची मुख्य सूत्रधार आहे. संस्थेचे काही पगारी कार्यकर्ते काही स्वयंसेवी संस्थांना हाताशी धरून हे आंदोलन चालवित आहेत. या आंदोलनाचा आणि शेतकऱ्यांचा काहीही संबंध नाही. आंदोलनाच्या पत्रकावर सह्या करणाऱ्या १२0 लोकांपैकी ११0 लोक शहरी आहेत. उरलेलेसुद्धा सेवा संस्थावाले आहेत. भारतीय शेतकऱ्यांना फायदेशीर असलेल्या जीएम तंत्रज्ञानापासून वंचित ठेवण्याचा डाव आखण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे कापूस उत्पादनात वाढ होऊन कीटकनाशकांच्या वापरात ८0 टक्के घट झाली आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाला विरोध करणारे पर्यावरणवादी नसून कीटकनाशक लॉबीचेच हस्तक आहेत, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेत ७0 ते ८0 टक्के अन्न हे जीएमचे असते. त्याठिकाणी लोकांच्या आरोग्याला धोका झाल्याचे एकही उदाहरण नाही. तसे झाले असते तर, जीएम अन्नावर अमेरिकेत बंदी घातली असती. जीएमला विरोध करण्याच्या मुद्द्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. विरोधाच्या सर्व मुद्द्यांची उत्तरे आम्ही दिली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा लोकांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी)गुजरातसारखे धोरण... ऊसदराबाबत महाराष्ट्रातच अडचणी निर्माण केल्या जातात. वास्तविक गुजरातमध्ये साखरेचे पूर्ण पैसे शेतकऱ्यांना दिले जातात. बगॅस आणि मोलॅसिसवर त्यांचे कारखाने चालतात. गुजरातमध्ये अशी कारखानदारी यशस्वी होत असेल, तर मग महाराष्ट्रातच का प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेतकरी व कारखानदार या दोन्हींना योग्य ठरेल असे धोरण हवे, असे नरदे म्हणाले.