शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

चौपदरीकरणांतर्गत पूलांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2015 00:35 IST

विनायक राऊत : महामार्गावर पाच ठिकाणी बॉक्सेलऐवजी उड्डाण पूल

कणकवली/सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया आॅगस्टपूर्वी पूर्ण केली जाईल. येत्या डिसेंबरपूर्वी चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. कणकवली, लांजा, पाली, चिपळूण या बाजारपेठांच्या ठिकाणी प्रस्तावित बॉक्सेल पुलाचे आराखडे बदलून येथे उड्डाणपूल बनविण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. जानवली पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भाग म्हणून या महामार्गावरील जानवली (कणकवली), कसाल नदी व पीठढवळ नदीवरील पुलांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संजय पडते, महामार्ग प्राधिकरणाचे ए. डी. सूर्यवंशी, यतीन पटवर्धन, बळी परब, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नगरसेविका नंदिनी धुमाळे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, शामल म्हाडगुत, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते. राऊत पुढे म्हणाले की, चौपदरीकरण होत असताना जमिनी व मालमत्तांना नवीन कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या दुप्पट व चौपट मोबदला देण्यात येणार आहे. घरे, मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चौपदरीकरणासाठी केंद्रशासनाकडून ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर १४ पूलांच्या कामांपैकी ५ पुलांच्या कामाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. युती सरकार आल्यावर वर्षाच्या आत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात राजकारणाचा भाग नसून लोकांची गरज म्हणून हे काम केले जात आहे. या चौपदरीकरणात फक्त पंधरा ते वीस टक्के मालमत्ता जाणार आहे. सध्या महामार्गाचे जमिन मोजणीचे काम सुरू असून लोकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले. विकासाच्या दृष्टीने सर्वांनी या कामाला सहकार्य करावे. जानवली पादचारी पुलासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. चौपदरीकरणाने ही समस्याच संपुष्टात येईल. चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले. भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की, मुंबईत ५५ उड्डाणपूल युती सरकारने पूर्ण केले आहेत. युती सरकार आश्वासने पूर्ण करते, हे यामुळे सिद्ध झाले. आमदार वैभव नाईक म्हणाले, भूसंपादनाशी संबंधित लोकांचे प्रश्न, शंका असतील तर त्यांचे निरसन केले जाईल. महामार्ग चौपदरीकरणालाही काळाची गरज होती व आज ती प्रत्यक्षात उतरत आहे, यासाठी युतीचे शासन सर्वस्वी जबाबदार आहे. अतुल काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्गात विकासाची स्थिती निर्माण करण्यासाठी युती शासनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली जातील. या महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व खासदार विनायक राऊत यांनी केलेले प्रयत्न निश्चितच स्पृहणीय आहेत. या महामार्गाचे काम २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा ध्यास आहे. शिवसैनिकांची मोटारसायकल रॅलीही यावेळी लक्षणीय ठरली. (प्रतिनिधी)