शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
4
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
5
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
8
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
9
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
10
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
11
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
12
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
13
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
14
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
15
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
16
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
19
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
20
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

चौपदरीकरणांतर्गत पूलांचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2015 00:35 IST

विनायक राऊत : महामार्गावर पाच ठिकाणी बॉक्सेलऐवजी उड्डाण पूल

कणकवली/सिंधुदुर्गनगरी : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया आॅगस्टपूर्वी पूर्ण केली जाईल. येत्या डिसेंबरपूर्वी चौपदरीकरणाचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. कणकवली, लांजा, पाली, चिपळूण या बाजारपेठांच्या ठिकाणी प्रस्तावित बॉक्सेल पुलाचे आराखडे बदलून येथे उड्डाणपूल बनविण्यासाठी आराखडे तयार करण्यात येत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. जानवली पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात राऊत बोलत होते. यावेळी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा भाग म्हणून या महामार्गावरील जानवली (कणकवली), कसाल नदी व पीठढवळ नदीवरील पुलांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संजय पडते, महामार्ग प्राधिकरणाचे ए. डी. सूर्यवंशी, यतीन पटवर्धन, बळी परब, युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा राजश्री धुमाळे, उपजिल्हाप्रमुख राजू शेटये, तालुकाप्रमुख सचिन सावंत, नगरसेविका नंदिनी धुमाळे, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर, युवा सेना तालुकाप्रमुख राजू राठोड, शामल म्हाडगुत, उपतालुकाप्रमुख प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते. राऊत पुढे म्हणाले की, चौपदरीकरण होत असताना जमिनी व मालमत्तांना नवीन कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या दुप्पट व चौपट मोबदला देण्यात येणार आहे. घरे, मालमत्ता वाचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चौपदरीकरणासाठी केंद्रशासनाकडून ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मंजूर १४ पूलांच्या कामांपैकी ५ पुलांच्या कामाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. युती सरकार आल्यावर वर्षाच्या आत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यात राजकारणाचा भाग नसून लोकांची गरज म्हणून हे काम केले जात आहे. या चौपदरीकरणात फक्त पंधरा ते वीस टक्के मालमत्ता जाणार आहे. सध्या महामार्गाचे जमिन मोजणीचे काम सुरू असून लोकांनी याला सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले. विकासाच्या दृष्टीने सर्वांनी या कामाला सहकार्य करावे. जानवली पादचारी पुलासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले होते. चौपदरीकरणाने ही समस्याच संपुष्टात येईल. चौपदरीकरणाचे काम २०१९ पर्यंत पूर्ण व्हायला हवे, असे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले. भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर म्हणाले की, मुंबईत ५५ उड्डाणपूल युती सरकारने पूर्ण केले आहेत. युती सरकार आश्वासने पूर्ण करते, हे यामुळे सिद्ध झाले. आमदार वैभव नाईक म्हणाले, भूसंपादनाशी संबंधित लोकांचे प्रश्न, शंका असतील तर त्यांचे निरसन केले जाईल. महामार्ग चौपदरीकरणालाही काळाची गरज होती व आज ती प्रत्यक्षात उतरत आहे, यासाठी युतीचे शासन सर्वस्वी जबाबदार आहे. अतुल काळसेकर म्हणाले, सिंधुदुर्गात विकासाची स्थिती निर्माण करण्यासाठी युती शासनाने जी आश्वासने दिली होती ती पूर्ण केली जातील. या महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी व खासदार विनायक राऊत यांनी केलेले प्रयत्न निश्चितच स्पृहणीय आहेत. या महामार्गाचे काम २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा ध्यास आहे. शिवसैनिकांची मोटारसायकल रॅलीही यावेळी लक्षणीय ठरली. (प्रतिनिधी)