शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी भातलागवडीचा खोळंबा

By admin | Updated: July 8, 2017 22:39 IST

कडकडीत ऊन : शेती बनली खर्चिक, जिल्ह्यात पाऊस अघोषित संपावर, रोपे सुकण्याची वेळ, शेतकरी चिंतेत

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १०८८.४० मिलिमीटर पाऊस पडला आहे. पावसाच्या पाण्यावर येथील भातशेती अवलंबून असल्याने व सध्या पाऊस गायब असल्यामुळे भातशेती लागवडीला विलंब होत आहे. कडकडीत ऊन पडत असल्यामुळे पंपाच्या पाण्यावर सध्या भातशेती लागवड सुरू असल्याने ती खर्चिक बनली आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागलीही लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. ८०९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला तसेच ८२५९ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य व १०० हेक्टर क्षेत्रावर गळीतधान्य घेण्यात येते. जिल्ह्यात पारंपरिक पध्दतीने भातलागवड करण्यात येत असली, तरी येथील भातशेती ही मुख्यत्वे पावसावर अवलंबून आहे. गतवर्षी दि. ८ जुलै अखेर सरासरी १४३६.४५ मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सरासरी ३५९.०१ मिलिमीटर इतका कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ७१ हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड करण्यात येते. मात्र, पावसाअभावी आतापर्यंत ३२ हजार ५३२ हेक्टर क्षेत्रावरील भात लागवड पूर्ण करण्यात आली आहे. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली पिकाची लागवड करण्यात येते. मात्र, आतापर्यंत ५२८ हेक्टर क्षेत्रावर ही लागवड करण्यात आली असून, ५३ हेक्टर क्षेत्रावर वरीची लागवड पूर्ण झाली आहे. भाजीपाला लागवड ५१४ हेक्टरवर करण्यात आली असून, गळीत धान्यापैकी भुईमूग ५, कारले ६९, तीळ ३० मिळून एकूण १०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात लागवडीचे ४५ टक्के काम पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने बळीराजा चिंतेत आहे. लागवड पद्धतीने भातशेती करण्यात येत असल्याने रोपवाटिकेतून रोपे तयार होऊनसुद्धा पावसाअभावी शेतकऱ्यांना लागवड करणे अवघड बनले आहे. भातलागवड करताना चिखल करुन त्यामध्ये भाताची रोपे लावण्यात येतात. ही रोपे काढून पुन्हा दुसऱ्या शेतात लावण्यात आल्याने वरच्यावर ही लागवड असते. सध्या शेतकरी पंप भाड्याने घेऊन लागवड करीत असले, तरी पावसाच्या पाण्याअभावी ही रोपे वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे शेतात सोडलेले पंपाचे पाणीदेखील बाष्पीभवनामुळे कमी होत आहे. मात्र, शेतकरीवर्ग आर्थिक भुर्दंड सोसून भातलागवडीच्या कामात व्यस्त आहे. पाण्याअभावी डोंगर, व कातळावरील शेतीची कामे रखडली आहेत. पाण्याची अन्य कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. भातलागवडीला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी पंप भाड्याने घ्यावा लागत असून, त्यासाठी तासाला २५० ते ३०० रूपये भाडे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहे. तर नांगरणीसाठी वापर होत असलेल्या पॉवर टिलरचे भाडे ३५० ते ४०० रूपये आकारले जात आहे. याचबरोबर स्त्री मजुरांची मजुरी दिवसाला १५० ते २०० रूपये तर पुरूष मजुरांची दिवसाला २०० ते २५० रूपये मजुरी आहे. खते, कीटकनाशके, बियाण्यांचे दर वाढल्यामुळे भातशेती लागवडीसाठी शेतकऱ्यांना अधिक खर्च येत असून, त्या तुलनेत उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्ग चिंताग्रस्त बनला आहे.तीन दिवस गायब : रोपे पिवळी पडू लागलीसिंचनाचे मोठे प्रकल्प जिल्ह्यात नसल्यामुळे उपलब्ध विहिरी, नदी, बंधारे व पाटाच्या पाण्यावर जिल्ह्यात लागवड सुरू आहे. गेले दोन-तीन दिवस पावसाची एकही सर कोसळलेली नाही. त्यामुळे कडाक्याच्या उन्हात ही शेती पिवळी पडू लागली आहे.