शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

आतंकवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी सतर्क रहावे

By admin | Updated: July 29, 2014 23:00 IST

संचित कौशिक : देवगडमध्ये सागरी सुरक्षा अभियानाअंतर्गत मार्गदर्शन

जामसंडे : देशावर होणारे आतंकवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी मच्छिमारांनी सतर्क रहावे, असे प्रतिपादन नेव्हीचे लेफ्टनंट संचित कौशिक यांनी देवगडमध्ये बोलताना केले. देवगडमध्ये मंगळवारी सागरी सुरक्षा मार्गदर्शन शिबिरांतर्गत त्यांनी देवगडमधील मच्छिमारांना मार्गदर्शन केले.लेफ्टनंट कौशिक म्हणाले, देशामध्ये शिरण्यासाठी आतंकवाद्यांकडे सागरी मार्गाचा सुरक्षित पर्याय असल्याने त्यामार्गे भारतात शिरकाव करून देशात आतंकी कारवाया करण्यासाठी आतंकवादी प्रयत्नशील असतात. मात्र मच्छिमार सतर्क राहून अशा आतंकवाद्यांपासून आपल्या देशाला वाचवू शकतो. मच्छिमारांनी आपापल्या गावात अनोळखी व्यक्ती, बोट, ट्रॉलर आलेले आढळल्यास त्वरित पोलीस, सरपंच किंवा तटरक्षक दलाशी संपर्क साधावा. समुद्रामध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यासही त्यांनी या यंत्रणेशी संपर्क साधावा. अनोळखी व्यक्तीला आपली नौका भाड्याने देऊ नये किंवा विकू नये. पावसाळ््यात मच्छिमारी टाळावी. मच्छिमारीसाठी समुद्रात जाताना आवश्यक ते सर्व कागदपत्र, ओळखपत्र घेऊन मच्छिमारीसाठी जावे. आपणास संशयास्पद जाणवलेली लहानात लहान माहितीही शासकीय यंत्रणेला द्यावी, असेही लेफ्टनंट कौशिक यांनी यावेळी सांगितले.तटरक्षक दलाचे अधिकारी आर. एस. उपाध्याय म्हणाले, गावामध्ये अनोळखी व्यक्तींना आपले घर भाड्याने देताना स्थानिक पोलिसांना त्याची कल्पना द्यावी. मुंबईवरील आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ला अगोदर त्यांनी मुंबईत समुद्रामार्गे प्रवेश केला होता. त्यांनी प्रवेश करताना समुद्रामध्ये एक मच्छिमारी नौका जबरदस्तीने ताब्यात घेतली. त्यातील चौघांना तत्काळ ठार मारले. तर दोघांना मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर येताच ठार मारले. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रामध्ये कोणत्याही अनोळखी नौकेने जवळ बोलावल्यास त्यांच्याजवळ जाऊ नये. कस्टमचे निरीक्षक सुनील बेस्ट यांनी समुद्रातील सुरक्षा मजबूत होणे देशाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. मच्छिमारांच्या मदतीशिवाय आतंकवादी हल्ले रोखता येणार नाहीत, असे सांगितले. यावेळी या अधिकाऱ्यांना आपल्या अडचणी सांगताना उपस्थित मच्छिमारांनी आपल्या समुद्रामध्ये परराज्यातील मच्छिमार २५ नौकांच्या समुहानी एकत्रितरित्या येऊन मच्छिमारी करतात. त्यांच्याजवळ आपल्याकडील नौका गेली तर ते त्या नौकेवरील खलाशांना मारहाण करतात. या नौकांवर कोणतेही नाव नसते. या नौका चालकांकडे कोणतेही परवाने नसतात असे सांगितले. तसेच अशा नौकांच्या समुद्रातून एखादी आतंकवाद्यांची नौका आपल्या देशाच्या हद्दीत शिरली तर आपण त्यांना कसे ओळखावे? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सागरी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंके, तारामुंबरी सोसायटीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद पराडकर, देवगड मच्छिमार सोसायटी अध्यक्ष संजय बांदेकर, मच्छिमार भाई खोबरेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी पाटे, नेव्हीचे अधिकारी एम. के. पांडे, संजय कुमार, कस्टम अधिकारी अमिताभ गौतम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)