शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

बंड्या नाना.. प्रवास एका शतकानंतरचा

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

साळीस्तेतील अवलिया : अजूनही तरूणांना लाजवेल अशी दैनंदिनी

निकेत पावसकर-- नांदगाव -नेहमीप्रमाणेच दररोज सकाळी उठून गुरे चरायला घेऊन जाणे...अनेक मैलाचा पायी प्रवास करणे... डोंगरदऱ्या सहज पार करणे...कोणत्याही प्रकारचा आजार शिवू न शकलेला...वयाची शतकी पूर्ण केल्यानंतरही आजही ते एस.टी.ने एकटेच प्रवास करतात. कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथील बंड्या नाना म्हणजे एक अवलिया. शंभर वर्ष पूर्ण केलीत तरीदेखील ते तरूणांना लाजवेल अशी दैनंदिन कामे करताना दिसतात.कणकवली तालुक्यातील साळीस्ते गावातील अनंत विश्राम गुरव म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच बंड्या नाना. गेली शंभर वर्षे बंड्या नाना नावाचा माणूस साळीस्ते गावात वावरतो. आजही त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. कित्येक वर्षांपूर्वीच्या अनेक घटना, प्रसंग ते सहजरित्या कोणत्याही प्रकारचा विलंब न करता चटकन सांगतात. बंड्या नानांना बोलते करायचे म्हणजे कोणालाही सहज शक्य आहे. अस्सल मालवणी बोलायला लागले की, बंड्या नाना आपल्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सहज सांगतात आणि कोणत्याही वयाच्या माणसासोबत मिसळून जातात.पहाटे पाच वाजल्यापासून त्यांच्या दिवसाला आणि कामाला सुरूवात होते. अनेक मेहनतीची कामे करीत असल्यामुळे याही वयात त्यांना चष्मा लागलेला नसून त्यांची दृष्टी खूप चांगली आहे. दररोज चालणे व फिरणे यामुळे तब्बेत तंदुरूस्त आहे. हे सांगतात. त्यावेळी फुकटची शाळा शिकायला मिळायची. तरीदेखील शाळेत गेलोच नसल्याची कबुली ते देतात. आजच्या तरूणांना लाजवेल अशी शरीरयष्टी, अंगमेहनत, दररोजची विविध मेहनत ते आजही एवढ्या वयात करतात. एवढ्या वयानंतरही तंदुरूस्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दररोजची करण्यात येणारी अंगमेहनतच माझ्या तंदुरूस्तीचे कारण आहे. आज अनेकजण व्यायाम करायला जातात. मात्र, आम्ही कोणत्याही प्रकारचे व्यायाम केले नाहीत. दैनंदिन कामे करताना जो व्यायाम होतो. तोच खरा व्यायाम असल्याचे त्यांनी सांगितले. साळीस्तेवासीयांतर्फे बंड्या नानांचा गौरवेवयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल साळीस्ते ग्रामस्थांनी बंड्या नानांचा सत्कार केला. सुमारे चार पिढ्यांचा हा इतिहास चालता बोलता अनुभवास मिळतो. गावातील अनेक लोक जुन्या घटनांसाठी बंड्या नानांकडून माहिती घेत असतात. बंड्या नानांसमवेत त्यांचा मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.अनेक वर्षे शेती केली. जोत धरले. खूप अंगमेहनतीचे काम केले. आज शेती कमी झाली असली तरीदेखील अंग मेहनतीचे काम मात्र, कमी झालेले नाही. सकाळी उठल्यानंतर गुरांना रानात चरायला घेऊन जाणे, त्यानंतर शेतीची कामे करणे आणि विविध अंगमेहनतीची कामे करणे हा दिनकर्म आजही आहे. पूर्वी वाहने कमी असल्याने तळेरे ते साळीस्ते हे पाच किलोमीटरचे अंतर दररोज चालत यायचे आणि जायचे. अलिकडे वाहनांची व्यवस्था झाल्यामुळे हा जरी प्रवास कमी झाला असला तरीदेखील दररोजचे चालणे कमी झाले नाही.- अनंत गुरव, साळीस्ते, कणकवली