शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

बंड्या नाना.. प्रवास एका शतकानंतरचा

By admin | Updated: December 5, 2015 00:21 IST

साळीस्तेतील अवलिया : अजूनही तरूणांना लाजवेल अशी दैनंदिनी

निकेत पावसकर-- नांदगाव -नेहमीप्रमाणेच दररोज सकाळी उठून गुरे चरायला घेऊन जाणे...अनेक मैलाचा पायी प्रवास करणे... डोंगरदऱ्या सहज पार करणे...कोणत्याही प्रकारचा आजार शिवू न शकलेला...वयाची शतकी पूर्ण केल्यानंतरही आजही ते एस.टी.ने एकटेच प्रवास करतात. कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथील बंड्या नाना म्हणजे एक अवलिया. शंभर वर्ष पूर्ण केलीत तरीदेखील ते तरूणांना लाजवेल अशी दैनंदिन कामे करताना दिसतात.कणकवली तालुक्यातील साळीस्ते गावातील अनंत विश्राम गुरव म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच बंड्या नाना. गेली शंभर वर्षे बंड्या नाना नावाचा माणूस साळीस्ते गावात वावरतो. आजही त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. कित्येक वर्षांपूर्वीच्या अनेक घटना, प्रसंग ते सहजरित्या कोणत्याही प्रकारचा विलंब न करता चटकन सांगतात. बंड्या नानांना बोलते करायचे म्हणजे कोणालाही सहज शक्य आहे. अस्सल मालवणी बोलायला लागले की, बंड्या नाना आपल्या अनुभवातून आलेल्या गोष्टी सहज सांगतात आणि कोणत्याही वयाच्या माणसासोबत मिसळून जातात.पहाटे पाच वाजल्यापासून त्यांच्या दिवसाला आणि कामाला सुरूवात होते. अनेक मेहनतीची कामे करीत असल्यामुळे याही वयात त्यांना चष्मा लागलेला नसून त्यांची दृष्टी खूप चांगली आहे. दररोज चालणे व फिरणे यामुळे तब्बेत तंदुरूस्त आहे. हे सांगतात. त्यावेळी फुकटची शाळा शिकायला मिळायची. तरीदेखील शाळेत गेलोच नसल्याची कबुली ते देतात. आजच्या तरूणांना लाजवेल अशी शरीरयष्टी, अंगमेहनत, दररोजची विविध मेहनत ते आजही एवढ्या वयात करतात. एवढ्या वयानंतरही तंदुरूस्तीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, दररोजची करण्यात येणारी अंगमेहनतच माझ्या तंदुरूस्तीचे कारण आहे. आज अनेकजण व्यायाम करायला जातात. मात्र, आम्ही कोणत्याही प्रकारचे व्यायाम केले नाहीत. दैनंदिन कामे करताना जो व्यायाम होतो. तोच खरा व्यायाम असल्याचे त्यांनी सांगितले. साळीस्तेवासीयांतर्फे बंड्या नानांचा गौरवेवयाची शंभरी पूर्ण केल्याबद्दल साळीस्ते ग्रामस्थांनी बंड्या नानांचा सत्कार केला. सुमारे चार पिढ्यांचा हा इतिहास चालता बोलता अनुभवास मिळतो. गावातील अनेक लोक जुन्या घटनांसाठी बंड्या नानांकडून माहिती घेत असतात. बंड्या नानांसमवेत त्यांचा मुलगा आणि नातवंडे असा परिवार आहे.अनेक वर्षे शेती केली. जोत धरले. खूप अंगमेहनतीचे काम केले. आज शेती कमी झाली असली तरीदेखील अंग मेहनतीचे काम मात्र, कमी झालेले नाही. सकाळी उठल्यानंतर गुरांना रानात चरायला घेऊन जाणे, त्यानंतर शेतीची कामे करणे आणि विविध अंगमेहनतीची कामे करणे हा दिनकर्म आजही आहे. पूर्वी वाहने कमी असल्याने तळेरे ते साळीस्ते हे पाच किलोमीटरचे अंतर दररोज चालत यायचे आणि जायचे. अलिकडे वाहनांची व्यवस्था झाल्यामुळे हा जरी प्रवास कमी झाला असला तरीदेखील दररोजचे चालणे कमी झाले नाही.- अनंत गुरव, साळीस्ते, कणकवली