शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

पडीक जमिनीत बांबू लागवड फायदेशीर

By admin | Updated: March 25, 2016 00:08 IST

मिलिंद पाटील : सरसमध्ये शेतकरी कार्यशाळा उत्साहात

सावंतवाडी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत. अल्प कालावधीत व खर्चात अधिक उत्पन्न देणारे पिक म्हणून बांबूंची लागवड योग्य असून त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांनी उचलावा, असे आवाहन तज्ज्ञ शेतकरी मिलिंद पाटील यांनी केले.‘कोकण सरस’ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शेतकरी व पशुपालक यांची कार्यशाळा जिल्हा परिषद कृषी विभाग व पशू संवर्धन विभाग यांच्यावतीने आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी विकास अधिकारी एस. एन. मेथरे यांच्या हस्ते झाले. यावेळी पशुसंवर्धन अधिकारी सत्यनारायण चंदेल, सावंतवाडी तालुका कृषी अधिकारी ए. बी. परब, तंत्राधिकारी सी. जी. गायकवाड, एम. एच. मोटे आदी उपस्थित होते.यावेळी तज्ज्ञ शेतकरी मिलिंद पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले की, बांबू उत्पादनाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या उत्पादनाला बदलत्या वातावरणाचा त्रास होत नाही. आपल्या मालकीच्या पडीक जमिनीत एकदा बांबूची लागवड केली की ५० वर्षे उत्पन्न घेता येते. बांबू उत्पादनासाठी कमी खर्च येतो. घर बसल्या उत्पन्नही घेता येते. बांबू लागवडीनंतर अधिक वर्षे होऊन गेल्यावर बांबूला काटा (फुले) आला की बांबूचे बेट पुन्हा तयार होते व ती आपोआप जगतात. त्याला पाण्याचीही आवश्यकता नाही. विशेष म्हणजे बांबू उत्पादन हे नाशवंत नसल्याने बांबूला दर चांगला मिळाला की विकता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यानंतर शेतकरी विलास ठाकूर यांनी काजू लागवड व प्रक्रिया, मधुकर राणे यांनी बांबू लागवड, विक्री व प्रक्रिया तर कृषिग्राम व निसर्ग पर्यटनावर डॉ. विलास सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच ‘शेळीपालन’ याविषयी एस. कविटकर यांनी व ‘कंदवर्गीय पीक लागवड’ याविषयी डॉ. म्हसकर यांनीही मार्गदर्शन केले. (वार्ताहर)