शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बालनाट्य चळवळ सक्षम व्हावी : दीपक भावे

By admin | Updated: April 17, 2015 00:20 IST

कलाकारांसाठी लवकरच कोकणात मार्गदर्शन शिबिर

कोकणातील विशेषत: सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळे पडद्यावर आणण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी सांगितले. अभिनय क्षेत्रात मोठी संधी असल्याचे सांगत अभिनयाचा गाभा ओळखून कथानकाशी समरुप होऊन काम केल्यास नक्कीच या क्षेत्रात संधी असल्याचे त्यांनी सांगितले.लवकरच कोकणात याबाबत कलाकारांसाठी मार्गदर्शन शिबिर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. बालनाट्य चळवळ सक्षम नसल्याने मराठी रंगभूमीची दुरवस्था झाली आहे. भविष्यात दर्जेदार व कसलेले कलावंत निर्माण होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात ‘नाट्यशास्त्र’ हा विषय सुरू होणे ही काळाची गरज असल्याचे मत सिने दिग्दर्शक दीपक भावे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘रात्रीचो राजा’ या व्यावसायिक मालवणी नाटकाच्या निमित्ताने ते बांदा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. कोकणातील मुलांमध्ये असलेली गुणवत्ता लक्षात घेता त्यांना मराठी रंगभूमीची अपेक्षित संधी मिळावी, यासाठी कोकणातील कलाकारांसाठी कला व्यावसायिकतेवर आधारित शिबिर गरजेचे आहे. तसेच कोकणातील महाविद्यालयांमधून नाट्य, एकांकिका स्पर्धा होणे ही काळाची गरज आहे. दीपक भावे यांनी आतापर्यंत हिंदी तसेच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.२00५ मध्ये त्यांनी दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यासोबत सुपरहिट ठरलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरसोबत ‘फॅशन’, ‘जेल’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘हिरोईन’ या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. मधुर भांडारकरसोबत त्यांचा ‘कॅलेंडर गर्ल्स’ हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रंगभूमीवर येत आहे.मराठीत त्यांनी ‘नांदी’, ‘ईश्वरी’, ‘चिंतामणी’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कोकणातील दशावतारावर आधारित ‘रात्रीचो राजा’ या मालवणी बोलीभाषेतील नाटकाचे ते प्रथमच दिग्दर्शन करीत आहेत. कोकणात कलाकारांची खाण आहे. मात्र, याठिकाणी अद्ययावत थिएटर्स नसल्याने या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही. यासाठी येथील कलाकारांनी संधी मिळावी, यासाठी कोकणातच ‘रात्रीचो राजा’ या व्यावसाियक नाटकाची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‘रात्रीचो राजा’ हे नाटक दशावतारी कलेतील राजाची भूमिका साकारणाऱ्या बाबी गावडे या पात्राची आहे. कोकणातील दहिकाल्यात रात्रीच्या राजाची भूमिका करणाऱ्या या कलाकाराचे आयुष्य मात्र उपेक्षितच आहे. सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढत असताना त्याच्या कुटुंबीयांना भोगावे लागणारे भोग या नाटकातून मांडण्यात आले आहेत. कोकणातील लोककलेवर आधारित या नाटकाची निर्मिती असल्याने कोकणातील प्रेक्षकांना हे नाटक नक्कीच भावणार आहे. आपण आतापर्यंत विविध दिग्दर्शक, निर्माते यांचेबरोबरच केलेल्या कामाचा अनुभव आपल्या रंगभूमीवरील प्रवासात मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोकणातील युवा कलाकारांत प्रचंड बुद्धिमत्ता आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शक नसल्याने कोकणातील युवा कलाकारांना अपेक्षित संधी रंगभूमीवर मिळत नाही. याची खंत असल्याने येथील युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मनोदय आहे. नीलेश मोरजकर ल्ल बांदाबालनाट्य चळवळ सक्षम नसल्याने मराठी रंगभूमीची दुरवस्था झाली आहे. भविष्यात दर्जेदार व कसलेले कलावंत निर्माण होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात ‘नाट्यशास्त्र’ हा विषय सुरू होणे ही काळाची गरज असल्याचे मत सिने दिग्दर्शक दीपक भावे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘रात्रीचो राजा’ या व्यावसायिक मालवणी नाटकाच्या निमित्ताने ते बांदा येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. कोकणातील मुलांमध्ये असलेली गुणवत्ता लक्षात घेता त्यांना मराठी रंगभूमीची अपेक्षित संधी मिळावी, यासाठी कोकणातील कलाकारांसाठी कला व्यावसायिकतेवर आधारित शिबिर गरजेचे आहे. तसेच कोकणातील महाविद्यालयांमधून नाट्य, एकांकिका स्पर्धा होणे ही काळाची गरज आहे. दीपक भावे यांनी आतापर्यंत हिंदी तसेच मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.२00५ मध्ये त्यांनी दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्यासोबत सुपरहिट ठरलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरसोबत ‘फॅशन’, ‘जेल’, ‘दिल तो बच्चा है जी’, ‘हिरोईन’ या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. मधुर भांडारकरसोबत त्यांचा ‘कॅलेंडर गर्ल्स’ हा चित्रपट येत्या आॅगस्टमध्ये रंगभूमीवर येत आहे.मराठीत त्यांनी ‘नांदी’, ‘ईश्वरी’, ‘चिंतामणी’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे. कोकणातील दशावतारावर आधारित ‘रात्रीचो राजा’ या मालवणी बोलीभाषेतील नाटकाचे ते प्रथमच दिग्दर्शन करीत आहेत. कोकणात कलाकारांची खाण आहे. मात्र, याठिकाणी अद्ययावत थिएटर्स नसल्याने या कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही. यासाठी येथील कलाकारांनी संधी मिळावी, यासाठी कोकणातच ‘रात्रीचो राजा’ या व्यावसाियक नाटकाची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‘रात्रीचो राजा’ हे नाटक दशावतारी कलेतील राजाची भूमिका साकारणाऱ्या बाबी गावडे या पात्राची आहे. कोकणातील दहिकाल्यात रात्रीच्या राजाची भूमिका करणाऱ्या या कलाकाराचे आयुष्य मात्र उपेक्षितच आहे. सावकाराच्या कर्जाचा डोंगर वाढत असताना त्याच्या कुटुंबीयांना भोगावे लागणारे भोग या नाटकातून मांडण्यात आले आहेत. कोकणातील लोककलेवर आधारित या नाटकाची निर्मिती असल्याने कोकणातील प्रेक्षकांना हे नाटक नक्कीच भावणार आहे. आपण आतापर्यंत विविध दिग्दर्शक, निर्माते यांचेबरोबरच केलेल्या कामाचा अनुभव आपल्या रंगभूमीवरील प्रवासात मार्गदर्शक ठरल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोकणातील युवा कलाकारांत प्रचंड बुद्धिमत्ता आहे. मात्र, त्यांना योग्य मार्गदर्शक नसल्याने कोकणातील युवा कलाकारांना अपेक्षित संधी रंगभूमीवर मिळत नाही. याची खंत असल्याने येथील युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मनोदय आहे.

 

नीलेश मोरजकर - बांदा