शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘हातपाटी’मागचे ग्रहण अजूनही कायम

By admin | Updated: September 24, 2015 23:51 IST

परवान्यांची मुदत अपुरी : नव्या परवान्यांसाठी प्रतीक्षा आॅक्टोबरची

रत्नागिरी : जिल्ह्यातील हातपाटी उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आलेल्या १३४ पैकी ९२ प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र, त्यांना सप्टेंबरअखेर मुदत असल्याने आता नव्या परवान्यांसाठी पुन्हा आॅक्टोबरमध्ये मेरिटाईम बोर्डाकडून ‘ना हरकत’ दाखल्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ५०० ब्रासपर्यंतच्या वाळू उत्खननासाठी तात्पुरती परवानगी देण्याचा अधिकार जानेवारीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाने पुन्हा बंदी लागू करण्यात आली होती. आता नदी, खाड्यांतील वाळू उत्खननासाठी परवाने देण्याचे अधिकार मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले आहेत. मेरिटाईम बोर्डाकडून दापोली तालुक्यातील आंजर्ला खाडीतील तीन, दाभोळ खाडीतील एक, रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीतील तीन आणि काळबादेवी खाडीतील एक अशा एकूण चार खाड्यांमधील ८ रेती गटांना हातपाटीसाठी रेतीसाठा निर्धारित करून देण्यात आला आहे. या खाडीतील हातपाटी उत्खनन परवान्यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून नाहरकत दाखल्यासह आतापर्यंत १३४ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. त्यापैकी ९२ प्रस्ताव मंजूर करून त्यांना परवाने देण्यात आले. काहींनी चलन न भरल्याने त्यांना परवाने मिळाले नाहीत. अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून मिळालेल्या ‘ना हरकत दाखल्यां’ची मुदतही सप्टेंबरअखेरची आहे. परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने वाळू व्यावसायिकांच्या व्यवसायावरील ग्रहण कित्येक वर्षांनंतर सुटले आहे. मात्र, ही मुदत सप्टेंबरअखेर आहे. आता आॅक्टोबरमध्ये नव्याने प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. यासाठी पुन्हा मेरिटाईम बोर्डाकडून परवानगी मिळवावी लागणार आहे. त्यानंतर या व्यावसायिकांना परवाने मिळणार आहेत. या परवान्यांची मुदत एक वर्षाची असेल. त्यामुळे आता या व्यावसायिकांना आॅक्टोबरची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नवीन परवाने लवकर मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)