शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

‘अवकाळी’ने आंबोलीला झोडपले

By admin | Updated: March 6, 2016 00:59 IST

ग्रामस्थांची त्रेधातिरपीट : छपरे उडाली, वीज खांब कोसळला

आंबोली : शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने आंबोली परिसराला चांगले झोडपल्याने ग्रामस्थांची त्रेधातिरपीट उडाली. ठिकठिकाणी घरांवरील छप्पर कोसळून हजारोंची हानी झाली, तर वीज खांब रस्त्यावरच कोसळून वाहतुकीची कोंडी झाली. गेल्या चार-पाच दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल झाला होता. कधी ढगाळ वातावरण, तर कधी पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त होत होती. शनिवारी सायंकाळी सव्वा चार वाजता आंबोलीत सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. सुमारे तासभर तो सुरू होता. अचानक सुरू झालेल्या पावसाने ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने क्षणार्धात जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली, तर बहुतांशी दुकाने बंद करण्यात आली. सोसाट्याच्या वाऱ्याने जकातवाडी येथे रस्त्याच्या बाजूचा विजेचा खांब रस्त्यावर कोसळला. रस्त्याच्या मध्यभागीच हा खांब पडल्याने वाहनधारकांसह ग्रामस्थांत भीती पसरली. यावेळी काही ग्रामस्थांनी समयसूचकतेने दोन्ही बाजूंनी वाहने अडवली. वीज कार्यालयात दूरध्वनीवरून माहिती देऊन वीज बंद करण्याची सूचना केली. त्यामुळे सुदैवाने हानी झाली नाही. नांगरवाक येथे गणपत पाटील यांच्या घरावरील छपराचे सर्व पत्रे उडून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच सविता धमकर, भागोजी येडगे, विठ्ठल येडगे, चौडू पाटील, पांडुरंग काकोरे यांच्याही घराच्या छपरावरील पत्रे व कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. पत्रे उडून गेल्याने या सर्व घरात पाणी साचून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तसेच जकातवाडी येथील परुळेकर यांच्यासह तिघाजणांच्या घराचे छप्पर उडून गेल्याने तेथेही मोठे नुकसान झाले. चितळशेत येथेही रामा पडते यांचे छप्पर उडून नुकसान झाले. (वार्ताहर) अनर्थ टळला, पण ‘महावितरण’बाबत संताप चार महिन्यांपूर्वी येथील विजेचे खांब बदलण्याची ग्रामस्थांनी मागणी केली होती. यासाठी महावितरणला निवेदन दिले होते. मात्र, त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सोसाट्याच्या वाऱ्याने जकातवाडी येथे वाहतुकीच्या रस्त्यावरच वीज खांब पडला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. यामुळे अनर्थ टळला असला तरी धोका मात्र कायम असल्याच्या भावना ग्रामस्थ व्यक्त करत होते. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभारावर रोष व्यक्त केला. जीर्ण झालेले विजेचे खांब त्वरित बदलण्याची मागणी केली आहे.