शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

देवगड समुद्रकिनार्‍यावर डांबरसदृश थर

By admin | Updated: May 28, 2014 01:34 IST

सोनेरी वाळू बनली काळी : पर्यटकांची किनार्‍याकडे पाठ

देवगड : गेले दोन दिवस देवगड समुद्र किनार्‍यावर भरतीच्या लाटांबरोबर काळसर चिकट द्रवाचा थर समुद्र किनार्‍यावर येत आहे. काळ्या रंगाच्या चिकटसर द्रवामुळे समुद्रकिनार्‍यावरील सोनेरी वाळू काळी बनली आहे. हा डांबरसदृश चिकट द्रव कसला आहे, याचा अजून उलगडा झालेला नाही. या द्रवामुळे समुद्रकिनारा दूषित झाला असून पर्यटकांनी किनार्‍याकडे पाठ वळविली आहे. वैशाख अमावास्येची मोठी भरती व ओहोटी याबरोबर हा टाकाऊ पदार्थ किनार्‍याकडे फेकला गेला आहे. मच्छिमारी बोटी खोल समुद्रात मासेमारी करताना कित्येकवेळा टाकाऊ पदार्थ व डांबरसदृश वंगण समुद्रात सोडतात. ते खडकांना तळाशी जाऊन चिकटून राहते. मात्र, प्रवाह बदलल्यामुळे किंवा तापमानातील फरकामुळे हे खडकांपासून वेगळे होते व प्रवाहाच्या जोराबरोबर समुद्रकिनारी येऊन थडकते. प्रत्यक्ष जवळून बघितल्यावर हा चिकट काळा थर डांबरसदृश दिसतो. मात्र, तो वाळूला चिकटल्यामुळे समुद्रकिनार्‍याचे सौंदर्य पूर्णपणे नाहीसे झालेले दिसून येत आहे. त्याचबरोबर हा चिकट द्रव अन्य टाकाऊ वस्तूंनाही एकत्र करून किनार्‍यावर आणून टाकत असल्यामुळे किनारा प्रदूषित झालेला आहे. या परिस्थितीत एरव्ही किनार्‍यावर समुद्र सफरीचा आनंद घेणारे पर्यटक गायब झालेले दिसून येत असून संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यानही किनारा निर्मनुष्य दिसत होता. अशाप्रकारे पर्यटकांनी देवगड पुळणीकडे पाठ फिरविलेली दिसून येत आहे. हा काळा चिकट पदार्थ अशाच प्रकारे येत राहिल्यास पिण्याच्या पाण्याच्या विहिरीसुद्धा प्रदूषित होतील, अशी भीती समुद्रकिनारी राहणार्‍या ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत जिल्हा परिषद अथवा आरोग्य खात्याच्या माध्यमातून त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)