शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: March 30, 2015 00:27 IST

बांदावासीयांची मागणी : शेती नुकसानीबाबत वनखात्याकडून केवळ पंचनाम्याचा फार्स

बांदा : बांदा शहर व परिसरात वन्य प्राण्यांकडून भातशेती तसेच बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वनखात्याकडून केवळ नुकसानीच्या पंचनाम्याव्यतिरिक्त कोणतीच कार्यवाही करण्यात येत नसल्याने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बांदा ग्रामस्थांनी वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शनिवारी सकाळी निवेदनाद्वारे केली.शेतकऱ्यांना शेती नुकसानभरपाई प्रतिगुंठा केवळ २00 रुपये देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची वनखात्याकडून चेष्टा करण्यात येत असल्याचा आरोप करत ही नुकसानभरपाई वाढवून मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॅनी आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शिरगावकर यांना जाब विचारला.गेले कित्येक दिवस बांदा शहरातील शेटकरवाडी, गडगेवाडी, वाफोली, आरोसबाग या भागात गवा, सांबर, डुक्कर यांचा मुक्त संचार असून या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता या प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. या परिसरात शेतकऱ्यांनी नाचणी, मका, चवळी, भात आदी उन्हाळी पिके घेतली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेती बागायती उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असता वनखात्याकडे या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी सामग्री नसल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले. वाढीव नुकसानभरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी सावंतवाडी येथील वनकार्यालयात अर्ज देण्याची विनंती वनपाल शिरगावकर यांनी केली.यावेळी वनपाल एस. एस. शिरगावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लिपिक व्ही. एम. मांजरेकर उपस्थित होते. यावेळी उमा शेटकर, प्रमोद कोचरेकर, बाबू शेटकर, घनश्याम परब, रामचंद्र केरकर, नारायण शेटकर, शैलेश शेटकर, गणपत सुभेदार, गुंडू सुभेदार, सुरेंद्र सुभेदार, अमेय नाईक, परशुराम वडार, संजू वडार, मनोज शेटकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन्यथा आंदोलनशेती नुकसानीबाबत वनखात्याशी संपर्क साधला असता केवळ पंचनाम्याचा फार्स करण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र नुकसानभरपाईच्या कित्येक पट कमी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. याबाबत वनखात्याने विचार करून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा डॅनी आल्मेडा यांनी दिला.