शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By admin | Updated: March 30, 2015 00:27 IST

बांदावासीयांची मागणी : शेती नुकसानीबाबत वनखात्याकडून केवळ पंचनाम्याचा फार्स

बांदा : बांदा शहर व परिसरात वन्य प्राण्यांकडून भातशेती तसेच बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वनखात्याकडून केवळ नुकसानीच्या पंचनाम्याव्यतिरिक्त कोणतीच कार्यवाही करण्यात येत नसल्याने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बांदा ग्रामस्थांनी वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शनिवारी सकाळी निवेदनाद्वारे केली.शेतकऱ्यांना शेती नुकसानभरपाई प्रतिगुंठा केवळ २00 रुपये देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची वनखात्याकडून चेष्टा करण्यात येत असल्याचा आरोप करत ही नुकसानभरपाई वाढवून मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॅनी आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शिरगावकर यांना जाब विचारला.गेले कित्येक दिवस बांदा शहरातील शेटकरवाडी, गडगेवाडी, वाफोली, आरोसबाग या भागात गवा, सांबर, डुक्कर यांचा मुक्त संचार असून या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता या प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. या परिसरात शेतकऱ्यांनी नाचणी, मका, चवळी, भात आदी उन्हाळी पिके घेतली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेती बागायती उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असता वनखात्याकडे या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी सामग्री नसल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले. वाढीव नुकसानभरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी सावंतवाडी येथील वनकार्यालयात अर्ज देण्याची विनंती वनपाल शिरगावकर यांनी केली.यावेळी वनपाल एस. एस. शिरगावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लिपिक व्ही. एम. मांजरेकर उपस्थित होते. यावेळी उमा शेटकर, प्रमोद कोचरेकर, बाबू शेटकर, घनश्याम परब, रामचंद्र केरकर, नारायण शेटकर, शैलेश शेटकर, गणपत सुभेदार, गुंडू सुभेदार, सुरेंद्र सुभेदार, अमेय नाईक, परशुराम वडार, संजू वडार, मनोज शेटकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)अन्यथा आंदोलनशेती नुकसानीबाबत वनखात्याशी संपर्क साधला असता केवळ पंचनाम्याचा फार्स करण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र नुकसानभरपाईच्या कित्येक पट कमी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. याबाबत वनखात्याने विचार करून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा डॅनी आल्मेडा यांनी दिला.