शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डीएलडी प्रवेशासाठी १ जूनपासून अर्जविक्री

By admin | Updated: May 29, 2015 23:45 IST

सहा केंद्रे : जिल्हा शिक्षण, प्रशिक्षण संस्थेची माहिती

कुडाळ : प्राथमिक शिक्षण पदविका (डीएलडी) प्रवेशासाठी अर्जविक्री १ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहा केंद्रांवर होणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्गचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकातून दिली आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शैक्षणिक वर्ष २०१५-१६ या वर्षासाठी प्राथमिक शिक्षण पदविका (ऊ्रस्र’ङ्में ्रल्ल ए’ीेील्ल३ं१८ ए४िूं३्रङ्मल्ल) प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील प्रवेशासाठी आवेदन पत्राची विक्री १ ते १५ जून या कालावधीत होणार आहे. तसेच २ ते १६ जून या कालावधीत आवेदन पत्राची स्वीकृती होणार आहे. आवेदन पत्राची विक्री व स्वीकृती प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सिंधुदुर्ग नवनगर वसाहत, जिजामाता सर्कलजवळ, कृषिरत्न कॉम्प्लेक्स समोर, सुनितादेवी टोपीवाला अध्यापिका विद्यामंदिर मालवण ता. मालवण, के. एम. एस. अध्यापक विद्यालय मिठबाव ता. देवगड, विद्याविकास अध्यापक विद्यालय आजगाव ता. सावंतवाडी, बॅ. नाथ पै अध्यापक विद्यालय कुडाळ व के. बी. सावंत कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय डिगस ता. कुडाळ या सहा केंद्रांवर होणार आहे. विक्री व स्वीकृती सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुटीच्या दिवशीही सुरू राहील. मागासवर्गीय उमेदवाराने आवेदनपत्र घेताना जात प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्यक आहे. शासनमान्य अध्यापक विद्यालयाची यादी व परिशिष्टे ६६६.े२ूी१३.ङ्म१ॅ.ल्ली३ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण प्रवेश क्षमतेपैकी ७० टक्के प्रवेश विभागस्तरावरून व ३० टक्के प्रवेश राज्यस्तरावरून करण्यात येतील. प्रवेशास इच्छुक कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र उमेदवार १२ वीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण, तर मागासवर्गीय उमेदवार किमान ४४.५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असल्याचे प्राचार्य, डायट, सिंधुदुर्ग यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)नोकरीची खात्री नाही राज्यात २ मे २०१० नंतर शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) झालेली नाही. तसेच सन २०१३ मधील शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) ५,९१,९९० आणि सन २०१४ च्या शिक्षक पात्रता परीक्षेस (टीईटी) ३,८८,६९९ इतके विद्यार्थी बसले होते. ही वस्तुस्थिती पाहता प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळेलच याची खात्री नाही, असे पत्रकात म्हटले आहे.