शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

संयुक्त पंचनाम्यासह होणार सुधारित याद्या

By admin | Updated: December 30, 2015 00:33 IST

शासनाचे आदेश : आंबा, काजू भरपाईसाठी करावी लागणार प्रतीक्षा ?

प्रकाश काळे-- वैभववाडी  -कोकणातील शेतकऱ्यांना आंबा, काजू नुकसानभरपाई हमीपत्रावर देण्यासाठी सामायिक क्षेत्रातील लागवड कोणाची आहे. याबाबत खात्री करुन संयुक्त पंचनाम्यासह आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची सुधारित यादी तयार करण्याचे आदेश राज्य शासनाने प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे वाद असतील तिथे संमतीपत्रासह भविष्यात वाद उत्पन्न झाल्यास घेतलेली मदत शासनाला परत करण्यासंबंधी बंधपत्र घेऊनच नुकसान भरपाईचे वाटप करण्याचे आदेश आहेत. त्यामुळे संमतीपत्रावर नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी भरपाई पदरात पडण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.फेब्रुवारी, मार्च २0१५मध्ये गारपीट, हवामानातील बदल व अवकाळी पावसामुळे आंबा, काजूपिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने आपद्गस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेत भरपाई वाटपाची जबाबदारी महसूलकडे सोपवली होती. मात्र, महसूलने हिस्सेदारांच्या संमतीखेरीज भरपाई देण्यास नकार दिल्याने कोकणातील बहुसंख्य शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले. त्यामुळे नुकसानभरपाईचा निधीही पडून राहिला. याबाबत कोकणातील आमदारांनी हमीपत्रावर भरपाई वाटण्याची शासनाकडे मागणी लावून धरल्याने कोकण विभागासाठी नुकसान भरपाईचा स्वतंत्र शासन निर्णय काढून दिलासा दिला. मात्र, नव्या शासन निर्णयातील अटी शर्थीची पूर्तता करण्यात आणखी दोन महिने लोटणार असल्याचे दिसून येत आहे.नव्या शासन नियमानुसार पूर्वी नुकसानाचा पंचनामा केलेल्या लागवडी नेमक्या कोणी केल्या आहेत. त्याची खात्री करून तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच व लगतच्या वहिवाटदारांच्या स्वाक्षरीने आपद्गस्त कसवटदारांची सुधारित यादी तयार केली जाणार आहे.तयार केलेल्या या याद्यांचे त्या त्या ठिकाणच्या ग्रामसभेत वाचन करुन ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करून त्यावर १५ दिवसात येणाऱ्या हरकतींच्या निर्गतीचे अधिकार महसूल मंडल अधिकारी, मंडल कृषी अधिकारी यांच्या समितीला देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)सुधारित याद्यांसाठी हालचालीसंमतीपत्राच्या अटीमुळे मे २0१५ मध्ये महसूलकडे प्राप्त झालेला आंबा, काजू नुकसान भरपाईचा निधी पडून आहे. त्यामुळे नव्या शासन निर्णयानुसार आपद्गस्त शेतकऱ्यांच्या सुधारित याद्या तयार करण्यास विलंब होऊन मार्च अखेरीस निधी मागे जाऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून महसूलने संबंधिताना कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांना संयुक्त पंचनाम्यासह सुधारित याद्या तातडीने बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत.दोन महिन्यांची प्रतीक्षासमितीने हरकतींवर सुनावणी घेऊन उपलब्ध कागदपत्र व पंचनाम्याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा. हिस्सेदारांच्या हरकती असतील तेथे संमतीपत्र बंधनकारक केले आहे. भविष्यात नुकसानभरपाईबाबत हिस्सेदारांमध्ये वाद निर्माण झाला तर भरपाईची रक्कम परत करण्याचे बंदपत्र घेऊनच भरपाईचे वाटप होणार आहे. भरपाई देण्याचा सुधारित निर्णय झाला असला तरी मदत पदरात पाडून घेण्यासाठी किमान दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.