शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

आंबोलीतील पर्यटनस्थळांना ‘बुरे दिना’ची झालर

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

विकासकामांत साधले जातेय ‘हित’ : स्थानिक केवळ ‘बघेच’; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

आंबोली : थंड हवेचे रमणीय ठिकाण असूनही केवळ अपुऱ्या सोयीसुविधा व पर्यटकांसाठी नसलेले मनोरंजन यामुळे आंबोलीतील पर्यटनाला मर्यादा येत आहेत. हिवाळी पर्यटनासह ख्रिसमसच्या निमित्ताने सिंधुदुर्गसह गोवा राज्यात जाणाऱ्या लाखो पर्यटकांपैकी नाममात्र पर्यटकच आंबोलीत डोकावत आहेत. त्यामुुळे आंबोलीच्या पर्यटनाला अच्छे दिनाऐवजी दिवसेंदिवस ‘बुरे दिना’ची झालर चढत आहे. आंबोलीत हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेवगड पॉर्इंट, नांगरतास धबधबा, राघवेश्वर स्वयंभू गणपती मंदिर, कावळेशेत पॉर्इंट, धबधबा, शिरगावकर पॉर्इंट यासारखी पर्यटनस्थळे आहेत. सुरुवातीच्या काळात या पर्यटनस्थळांना राज्यातील पर्यटकांसह देशातील पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली होती. नैसर्गिक सौंदर्य आणि रमणीय वातावरण यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची चांगलीच भुरळ पर्यटकांना पडली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायही तेजीत येऊन स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर झाला होता. सध्या या पर्यटनस्थळांवरील अनेक सुविधांच्या बाबतीत वानवा आहे. त्यामुळे येथील पर्यटकांना या स्थळांची गोडी कमी होत असून पर्यटक नाराजीने माघारी फिरत आहेत. स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे. शासनाकडून या स्थळांच्या सुधारणेसाठी विविध विकास निधी दिला जातो; पण यातून निर्माण होणारी कामे विकास करण्यापेक्षा भकास होत आहेत. कोणतेही पर्यटन विकासाचे काम सुमार दर्जाचे होत असताना या व्यावसायिकांकडून ते काम कोणते आहे किंवा या कामाचा खरोखर पर्यटनाला काही फायदा होतो का? याबाबतची साधी विचारणाही केली जात नाही. स्थानिकांच्या केवळ बघ्याच्या भूमिकेनेच ठेकेदार व काही अधिकारी आपले यातून ‘हित’ साधून घेतात. त्यामुळे या पर्यटन स्थळांचा विकास रखडलेल्या अवस्थेतच आहे. याशिवाय आंबोलीत अद्यापही एकही सार्वजनिक शौचालय पर्यटकांसाठी उपलब्ध नाही. तीन पर्यटन स्थळे वगळता इतर पर्यटन स्थळांवर रस्त्याअभावी साधे जाता सुद्धा येत नाही. त्यामुळे काय आहे आंबोलीत, असा प्रश्न विचारत पर्यटक आंबोलीतून काढता पाय घेत आहेत. आंबोलीच्या पर्यटनाचे चांगले दिवस येण्याऐवजी दिवसेंदिवस वाईट दिवस येत असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक, लोक प्रतिनिधी व पर्यटन महामंडळ यांच्या उदासिनतेमुळे आंबोलीची ही अवस्था झाल्याचे बोलले जात आहेत. स्थानिकांच्या मतानुसार आंबोलीत होणारी पर्यटन विकासकामे ही लोकप्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार यांच्या हितासाठीच होत असल्याचे आरोपही होत आहे.