शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

आंबोलीतील पर्यटनस्थळांना ‘बुरे दिना’ची झालर

By admin | Updated: January 2, 2016 08:29 IST

विकासकामांत साधले जातेय ‘हित’ : स्थानिक केवळ ‘बघेच’; प्रशासन, लोकप्रतिनिधींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

आंबोली : थंड हवेचे रमणीय ठिकाण असूनही केवळ अपुऱ्या सोयीसुविधा व पर्यटकांसाठी नसलेले मनोरंजन यामुळे आंबोलीतील पर्यटनाला मर्यादा येत आहेत. हिवाळी पर्यटनासह ख्रिसमसच्या निमित्ताने सिंधुदुर्गसह गोवा राज्यात जाणाऱ्या लाखो पर्यटकांपैकी नाममात्र पर्यटकच आंबोलीत डोकावत आहेत. त्यामुुळे आंबोलीच्या पर्यटनाला अच्छे दिनाऐवजी दिवसेंदिवस ‘बुरे दिना’ची झालर चढत आहे. आंबोलीत हिरण्यकेशी नदीचा उगम, महादेवगड पॉर्इंट, नांगरतास धबधबा, राघवेश्वर स्वयंभू गणपती मंदिर, कावळेशेत पॉर्इंट, धबधबा, शिरगावकर पॉर्इंट यासारखी पर्यटनस्थळे आहेत. सुरुवातीच्या काळात या पर्यटनस्थळांना राज्यातील पर्यटकांसह देशातील पर्यटकांनी चांगलीच पसंती दिली होती. नैसर्गिक सौंदर्य आणि रमणीय वातावरण यामुळे आंबोलीच्या पर्यटनाची चांगलीच भुरळ पर्यटकांना पडली होती. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायही तेजीत येऊन स्थानिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न दूर झाला होता. सध्या या पर्यटनस्थळांवरील अनेक सुविधांच्या बाबतीत वानवा आहे. त्यामुळे येथील पर्यटकांना या स्थळांची गोडी कमी होत असून पर्यटक नाराजीने माघारी फिरत आहेत. स्थानिक व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे. शासनाकडून या स्थळांच्या सुधारणेसाठी विविध विकास निधी दिला जातो; पण यातून निर्माण होणारी कामे विकास करण्यापेक्षा भकास होत आहेत. कोणतेही पर्यटन विकासाचे काम सुमार दर्जाचे होत असताना या व्यावसायिकांकडून ते काम कोणते आहे किंवा या कामाचा खरोखर पर्यटनाला काही फायदा होतो का? याबाबतची साधी विचारणाही केली जात नाही. स्थानिकांच्या केवळ बघ्याच्या भूमिकेनेच ठेकेदार व काही अधिकारी आपले यातून ‘हित’ साधून घेतात. त्यामुळे या पर्यटन स्थळांचा विकास रखडलेल्या अवस्थेतच आहे. याशिवाय आंबोलीत अद्यापही एकही सार्वजनिक शौचालय पर्यटकांसाठी उपलब्ध नाही. तीन पर्यटन स्थळे वगळता इतर पर्यटन स्थळांवर रस्त्याअभावी साधे जाता सुद्धा येत नाही. त्यामुळे काय आहे आंबोलीत, असा प्रश्न विचारत पर्यटक आंबोलीतून काढता पाय घेत आहेत. आंबोलीच्या पर्यटनाचे चांगले दिवस येण्याऐवजी दिवसेंदिवस वाईट दिवस येत असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक, लोक प्रतिनिधी व पर्यटन महामंडळ यांच्या उदासिनतेमुळे आंबोलीची ही अवस्था झाल्याचे बोलले जात आहेत. स्थानिकांच्या मतानुसार आंबोलीत होणारी पर्यटन विकासकामे ही लोकप्रतिनिधी आणि संबंधित ठेकेदार यांच्या हितासाठीच होत असल्याचे आरोपही होत आहे.