शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या संचालकांचे आडमुठे धोरण उमेश गाळवणकर यांचा आरोप

By admin | Updated: September 5, 2014 23:25 IST

कोकणी जनतेच्या प्राणाची आहुती देण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते.

सावंतवाडी : कोकण रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत, असा आरोप के. आर. सी एम्प्लॉईज युनिटचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी केला.कोकण रेल्वेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक भानू तायल यांनी कोकण रेल्वेला नवरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी डागडुजीवर खर्च न करता रेल्वे चालवली असे सिद्ध करण्याच्या जिद्दीपोटी कोकण रेल्वेच्या प्रवाशांना वेठीस धरु नये. तसेच त्यांच्या प्राणाची बाजी लावू नये व त्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असे मला सांगावेसे वाटते. भानू तायल ही व्यक्ती कोकण रेल्वेसारख्या जागतिक प्रकल्पाच्या चेअरमनपदी नियुक्त केली जाते. त्या नियुक्तीचीच सीबीआय चौकशी करणे आवश्यक आहे. ही व्यक्ती स्वत:च्या महत्वाकांक्षेसाठी संपूर्ण कोकण रेल्वेस वेठीस धरते. मनमानी पद्धतीने वागते व प्रवाशांचे जीव धोक्यात घालणारे निर्णय घेते. या निर्णयाविरोधात राजकीय नेतृत्वाने चौकशीची मागणी करुन आंदोलनाचा पवित्रा घेतला पाहिजे व महाराष्ट्राच्या सर्व खासदारांनी संसदेत आवाज उठवून कोकण रेल्वेला न्याय दिला पाहिजे. कोकणातील सामान्य जनतेला दळणवळणाचे साधन म्हणून कोकण रेल्वे उभारण्यात आली. पण याच कोकणी जनतेच्या प्राणाची आहुती देण्याची वेळ येईल, असे वाटले नव्हते.दिवा पॅसेंजरच्या अपघातानंतर मुख्य सुरक्षा आयुक्तांनी रेल्वेची डागडुजी योग्यप्रकारे होत नाही. कारण त्यासाठी आवश्यक असणारा पुरेसा कामगार वर्ग कोकण रेल्वेकडे नाही आणि डागडुजीसाठी आवश्यक वेळही कोकण रेल्वेकडे नाही. या सर्वाला कोकण रेल्वेचे मुख्यालय जबाबदार आहे, असे स्पष्ट नमूद केलेले असताना गांभीर्याने दखल घेतली जात नाही. कोकणरेल्वेला अपघात होऊ नये, याकरिता उपाययोजना करुन प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करुन रेल्वेमंत्र्यांना खुश करण्यापेक्षा अपघात न होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. गाड्या कमीतकमी विलंबाने धावण्यासाठी प्रयत्नशील असणे, तसेच निर्धोक वाहतुकीसाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, अशी मागणी गाळवणकर यांनी केली आहे. मात्र, तसे होताना दिसत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. (वार्ताहर)