शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ‘त्या’ शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप

By admin | Updated: January 3, 2016 00:27 IST

अनुदान न आल्याने शेतकरी अडचणीत : बांधकाम समिती सभेत जिल्हा परिषद सदस्य आक्रमक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गोठ्यांची बांधकामे केलेल्या गरीब शेतकऱ्यांना गोठे पूर्ण होऊन सहा महिने लोटले तरी अद्याप अनुदान देण्यात न आल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य सदाशिव ओगले यांनी बांधकाम समिती सभेत केला. तर १५ दिवसांत अनुदान अदा करा, असे आदेश बांधकाम सभापती संजय बोंबडी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती संजय बोंबडी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात पार पडली. यावेळी सदाशिव ओगले, दीपलक्ष्मी पडते, पंढरीनाथ राऊळ, आत्माराम पाळेकर, रुक्मिणी कांदळगांवकर, एकनाथ नाडकर्णी आदी सदस्यांसह समिती सचिव तथा बांधकाम कार्यकारी अभियंता सुनिल साळोखे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा आरोपही यावेळी सदाशिव ओगले यांनी केला. तर सभापती संजय बोंबडी यांनी १५ दिवसांत गोठ्याचे अनुदान वितरीत करा असे आदेश दिले. तसेच मंजूर झालेल्या गोठ्यांची कामे तत्काळ सुरु करा अशाही सूचना दिल्या. आंबोली जकातवाडी शाळेची दुरुस्ती करावी अशी गेली तीन वर्षे मागणी होत असतानाही या शाळेची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याकडे दुर्लक्ष करण्यात आला. आता ही शाळा वेळीच दुरुस्त न केल्याने कोसळली आहे. ही शाळा नवीन बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च येणार आहे आणि ५० ते ६० हजार रुपयांत शाळा दुरुस्त होणार होती. पण याकडे दुर्लक्ष केल्याने जी नुकसानी झाली त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न सदस्य आत्माराम पाळेकर यांनी उपस्थित करत या नुकसानीची चौकशी करून संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी केली. तर याबाबत चौकशी करण्याचे आदेश बांधकाम सभापती संजय बोंबडी यांनी दिले. पाणीटंचाईचा दुसरा टप्पा फेब्रुवारीपासून सुरु होतो. असे असताना अद्यापही काही तालुक्यांनी पाणीटंचाई आराखडा तयार केला नसल्याबाबत सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त केली तर संबंधितांना सक्त सूचना देण्याचे आदेश सभापतींनी दिले. (प्रतिनिधी) ‘त्या’ अधिकाऱ्यांची चौकशी करा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात गोठ्याच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गोठ्यांची बांधकामे पूर्ण केली. मात्र काही शेतकऱ्यांना ३५ हजार तर काहींना ७० हजार अनुदान मिळाले. याबाबत सदस्य सदाशिव ओगले यांनी सभेत लक्ष वेधत प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे निकष का? असा प्रश्न उपस्थित करत ज्या शेतकऱ्यांना गोठ्याच्या बांधकामासाठी ३५ हजार रुपये मिळाले आहेत अशांना उर्वरित रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली तर अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करा, अशी मागणीही सभेत करण्यात आली.