शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कृषि स्वावलंबन योजना नव्याने कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 16:34 IST

सिंधुदुर्गनगरी दि.२८ : अनुसुचित जाती- नवबोध्द शेतकºयांचे कृषि उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रयरेषेवर आणण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषि विभागामार्फत विशेष घटक योजना १९८२ पासून राबविण्यात येते. या योजनेमध्ये शेतीसाठी निविष्ठा, जमिन सुधारणा, पिक संरक्षण औजारे, बैलजोडी, परसबाग, सिंचन व्यवस्था इ. लाभ देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देविशेष घटक योजनेऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना शेतीसाठी निविष्ठा, जमिन सुधारणा, पिक संरक्षण औजारे, बैलजोडी, परसबाग, सिंचन व्यवस्था लाभ नविन योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यान्वित १ लाख रुपये अनुदानाची मर्यादा

सिंधुदुर्गनगरी दि.२८ : अनुसुचित जाती- नवबोध्द शेतकºयांचे कृषि उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रयरेषेवर आणण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषि विभागामार्फत विशेष घटक योजना १९८२ पासून राबविण्यात येते. या योजनेमध्ये शेतीसाठी निविष्ठा, जमिन सुधारणा, पिक संरक्षण औजारे, बैलजोडी, परसबाग, सिंचन व्यवस्था इ. लाभ देण्यात येत आहेत.

या योजनेमध्ये दिनांक २२ फेब्रुवारी २0१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे व दिनांक ३ आॅगस्ट २0१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार बदल केला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या नविन नावाने सुधारित करण्यात आलेली आहे.

आता विशेष घटक योजना व नविन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या नावाने राबविण्याबाबत संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सिंधुदुर्गचे कृषि विकास अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने ही नविन योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात येत असल्याचे रणजित देसाई, सभापती कृषि समितीचे सभापती रणजित देसाई तसेच जि.प.सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकाºयांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहिर केले आहे.

नविन योजनेमध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द शेतक-यांसाठी नविन वहिरींसाठी दोन लाख ५0 हजार रुपये, जुनी विहिर दुरुस्तीसाठी ५0 हजार रुपये, इनवेल बोअरींगसाठी २0 हजार रुपये, पंपसंच २५ हजार रुपये, वीज जोडणी आकार १0 हजार रुपये व शेततळ्यांचे अस्तरीकरण १ लाख रुपये अशी अनुदानाची मर्यादा राहणार आहे.

नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकरी असणे आवश्यक असून त्याचे नावे किमान 0.४0 हे ते कमाल ६.00 हेक्टर जमिन असावी. दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य असून दारिद्रय रेषेखाली नसलेल्या लाभार्थ्यांनी वार्षिक उत्पन्न १ लाख ५0 हजार रुपयापेक्षा जास्त नसल्याचा तहसिलदार यांचेकडील दाखला देणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम बँक खात्याव्दारे जमा करण्यात येणार असून थेट लाभ हस्तांतरण कार्यपध्दती अवलंबण्यात येणार आहे.

लाभार्थी निवड ही ग्रामसभेमध्ये करावयाची असून इच्छूक शेतक-यांनी अर्ज आॅनलाईन भरुन त्याची प्रत गट विकास अधिकारी पंचायत समितीकडे सादर करण्यात यावी. त्यानंतर जि.प. स्तरावर समितीमार्फत मंजूरी देण्यात येणार असल्याने जास्त अर्ज आल्यास लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त अनुसुचित जाती व नवबौध्द शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन कृषि समितीचे सभापती रणजित देसाई तथा उपाध्यक्ष जि. प. सिंधुदुर्ग, कृषि विकास अधिकारी सुधीर चव्हाण यांनी केले आहे.