शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कृषि स्वावलंबन योजना नव्याने कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 16:34 IST

सिंधुदुर्गनगरी दि.२८ : अनुसुचित जाती- नवबोध्द शेतकºयांचे कृषि उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रयरेषेवर आणण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषि विभागामार्फत विशेष घटक योजना १९८२ पासून राबविण्यात येते. या योजनेमध्ये शेतीसाठी निविष्ठा, जमिन सुधारणा, पिक संरक्षण औजारे, बैलजोडी, परसबाग, सिंचन व्यवस्था इ. लाभ देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देविशेष घटक योजनेऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना शेतीसाठी निविष्ठा, जमिन सुधारणा, पिक संरक्षण औजारे, बैलजोडी, परसबाग, सिंचन व्यवस्था लाभ नविन योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यान्वित १ लाख रुपये अनुदानाची मर्यादा

सिंधुदुर्गनगरी दि.२८ : अनुसुचित जाती- नवबोध्द शेतकºयांचे कृषि उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रयरेषेवर आणण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषि विभागामार्फत विशेष घटक योजना १९८२ पासून राबविण्यात येते. या योजनेमध्ये शेतीसाठी निविष्ठा, जमिन सुधारणा, पिक संरक्षण औजारे, बैलजोडी, परसबाग, सिंचन व्यवस्था इ. लाभ देण्यात येत आहेत.

या योजनेमध्ये दिनांक २२ फेब्रुवारी २0१७ च्या शासन निर्णयाप्रमाणे व दिनांक ३ आॅगस्ट २0१७ च्या मार्गदर्शक सूचनानुसार बदल केला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या नविन नावाने सुधारित करण्यात आलेली आहे.

आता विशेष घटक योजना व नविन योजना या दोन योजना स्वतंत्रपणे न राबविता बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेवून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने सध्याची प्रचलीत विशेष घटक योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना या नावाने राबविण्याबाबत संचालक (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सिंधुदुर्गचे कृषि विकास अधिकारी यांना निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने ही नविन योजना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यान्वित करण्यात येत असल्याचे रणजित देसाई, सभापती कृषि समितीचे सभापती रणजित देसाई तसेच जि.प.सिंधुदुर्गचे उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकाºयांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहिर केले आहे.

नविन योजनेमध्ये अनुसुचित जाती व नवबौध्द शेतक-यांसाठी नविन वहिरींसाठी दोन लाख ५0 हजार रुपये, जुनी विहिर दुरुस्तीसाठी ५0 हजार रुपये, इनवेल बोअरींगसाठी २0 हजार रुपये, पंपसंच २५ हजार रुपये, वीज जोडणी आकार १0 हजार रुपये व शेततळ्यांचे अस्तरीकरण १ लाख रुपये अशी अनुदानाची मर्यादा राहणार आहे.

नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकरी असणे आवश्यक असून त्याचे नावे किमान 0.४0 हे ते कमाल ६.00 हेक्टर जमिन असावी. दारिद्र रेषेखालील लाभार्थ्यांना प्राधान्य असून दारिद्रय रेषेखाली नसलेल्या लाभार्थ्यांनी वार्षिक उत्पन्न १ लाख ५0 हजार रुपयापेक्षा जास्त नसल्याचा तहसिलदार यांचेकडील दाखला देणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम बँक खात्याव्दारे जमा करण्यात येणार असून थेट लाभ हस्तांतरण कार्यपध्दती अवलंबण्यात येणार आहे.

लाभार्थी निवड ही ग्रामसभेमध्ये करावयाची असून इच्छूक शेतक-यांनी अर्ज आॅनलाईन भरुन त्याची प्रत गट विकास अधिकारी पंचायत समितीकडे सादर करण्यात यावी. त्यानंतर जि.प. स्तरावर समितीमार्फत मंजूरी देण्यात येणार असल्याने जास्त अर्ज आल्यास लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त अनुसुचित जाती व नवबौध्द शेतक-यांनी घ्यावा असे आवाहन कृषि समितीचे सभापती रणजित देसाई तथा उपाध्यक्ष जि. प. सिंधुदुर्ग, कृषि विकास अधिकारी सुधीर चव्हाण यांनी केले आहे.