शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

कारवाईवर प्रश्नचिन्हच

By admin | Updated: March 16, 2015 00:16 IST

जलस्वराज्य योजना : दोषींवर कारवाई न झाल्याने संताप

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य योजनेत मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे उघड झाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर जलस्वराज्य अध्यक्ष वसंत उजगावकर आणि सचिव कांचन कापडी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली. तांत्रिक सल्लागार आणि शाखा अभियंता यांना मात्र याविषयात क्लिनचिट देण्यात आली असून, संबंधित दोषींवर अद्याप फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीत. यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. कडवई ग्रामपंचायतीच्या जलस्वराज्य आणि बाराव्या वित्त आयोगातील रक्कमेत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे एका ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी उघड केल्यानंतर संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी त्यावेळचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब जगताप यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल सादर केला होता. यात जलस्वराज्य योजनेतील पाणीपट्टीच्या अनामत रक्कमा या कोणतेही स्वतंत्र खाते न उघडता अध्यक्ष व सचिव यांनी परस्पर खर्च केल्याचे नमूद करण्यात आले होते. कामे पूर्ण नसताना ठेकेदाराला बिले देण्यात आल्याचेही या तक्रारीत म्हटले होते. या योजनेत रक्कमेचा फार मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे उघड झाले होते. यानंतर उजगावकर व सचिव कांचन कापडी यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरवण्याचे आदेश कोकण आयुक्तांनी दिले.अद्यापही या योजनेचे स्वतंत्र खाते अस्तित्त्वात नसून अपहार झालेल्या अनामत रक्कमेबाबत कोणताही खुलासा संबंधितांनी दिलेला नाही. सदस्यांची अनामत रक्कम या स्वतंत्र खात्यात जमा असणे गरजेचे असतानाही आजतागायत या लाखोंच्या रक्कमेचा पत्ता लागलेला नाही. योजनेची कामे ही निकृष्ट झाली आहेत. असे असताना केवळ अपात्रतेच्या कारवाईवरच ग्रामस्थांनी बोळवण केली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या योजनेच्या अंतिम हप्त्याची ९ लाख एवढी रक्कम ही अपहार उघड झाल्याने ती संबंधितांनी खर्च करु नये, असा ठराव ग्रामसभेमध्ये होऊनही सदरची रक्कम अध्यक्ष, सचिव आणि संबंधित अधिकारी यांनी ती ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर उपयोगात आणली. एवढा गंभीर भ्रष्टाचार असतानाही अध्यक्ष सचिवावर अपात्रतेची कारवाई करून यावर पडदा टाकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर) प्रकरणाची सखोल चौकशी हवी...संगमेश्वर तालुक्यातील कडवई जलस्वराज्य भ्रष्टाचार प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रूतली होती. झालेल्या चौकशीनंतर फौजदारी गुन्हा दाखल झाल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.