शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख रूपयांचे वाटप

By admin | Updated: December 31, 2015 00:25 IST

अवकाळी पाऊस : आंबा उत्पादकांना दिलासा

रत्नागिरी : गतवर्षी अवेळीच्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान झाले होेते. पंचनाम्यानंतर शासनाकडून हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. बाधीत सर्वेक्षणानुसार रत्नागिरी तालुक्यातील १० हजार ७७५ शेतकऱ्यांना १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. पैकी ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ३ हजार १२१ सिंगल सातबाराधारकांना ४ कोटी ८२ लाख ३२ हजार १७५ रुपये, तर ४ हजार १४५ खातेदारांना ४ कोटी ४० लाख १९ हजार २३६ रुपयांचे वितरण करण्यात आले. सामायिक खातेदारांसाठी हमीपत्राची अट आहे. हमीपत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.यामध्ये नोकरी - व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सातबारावरील अधिक नावांमुळे सहहिस्सेदारांची संख्या वाढते. मिळणाऱ्या भरपाईच्या रकमेपेक्षा संमतीपत्र तसेच येण्या-जाण्याचा खर्च अधिक होतो. त्यामुळे अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. वर्ष समाप्ती तसेच आर्थिक वर्ष समाप्ती जवळ असल्यामुळे नुकसान भरपाईचा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. निधी परत जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी हमीपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)७ हजार ३५७ शेतकऱ्यांना मिळाला लाभ.फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान.निधी परत जाण्यापूर्वी हमीपत्र तयार करून द्यावे; कृषी विभागाचे आवाहन.