शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख रूपयांचे वाटप

By admin | Updated: December 31, 2015 00:25 IST

अवकाळी पाऊस : आंबा उत्पादकांना दिलासा

रत्नागिरी : गतवर्षी अवेळीच्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान झाले होेते. पंचनाम्यानंतर शासनाकडून हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. बाधीत सर्वेक्षणानुसार रत्नागिरी तालुक्यातील १० हजार ७७५ शेतकऱ्यांना १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. पैकी ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ३ हजार १२१ सिंगल सातबाराधारकांना ४ कोटी ८२ लाख ३२ हजार १७५ रुपये, तर ४ हजार १४५ खातेदारांना ४ कोटी ४० लाख १९ हजार २३६ रुपयांचे वितरण करण्यात आले. सामायिक खातेदारांसाठी हमीपत्राची अट आहे. हमीपत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.यामध्ये नोकरी - व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सातबारावरील अधिक नावांमुळे सहहिस्सेदारांची संख्या वाढते. मिळणाऱ्या भरपाईच्या रकमेपेक्षा संमतीपत्र तसेच येण्या-जाण्याचा खर्च अधिक होतो. त्यामुळे अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. वर्ष समाप्ती तसेच आर्थिक वर्ष समाप्ती जवळ असल्यामुळे नुकसान भरपाईचा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. निधी परत जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी हमीपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)७ हजार ३५७ शेतकऱ्यांना मिळाला लाभ.फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान.निधी परत जाण्यापूर्वी हमीपत्र तयार करून द्यावे; कृषी विभागाचे आवाहन.