शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी तालुक्यातील शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख रूपयांचे वाटप

By admin | Updated: December 31, 2015 00:25 IST

अवकाळी पाऊस : आंबा उत्पादकांना दिलासा

रत्नागिरी : गतवर्षी अवेळीच्या पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. जिल्ह्यातील ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान झाले होेते. पंचनाम्यानंतर शासनाकडून हेक्टरी २५ हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना आंबा नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली. बाधीत सर्वेक्षणानुसार रत्नागिरी तालुक्यातील १० हजार ७७५ शेतकऱ्यांना १६ कोटी ८१ लाख ६१ हजार रुपये जाहीर करण्यात आले होते. पैकी ७ हजार ३५७ शेतकऱ्यांना ९ कोटी २२ लाख ५१ हजार ४११ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.जिल्ह्यातील ३ हजार १२१ सिंगल सातबाराधारकांना ४ कोटी ८२ लाख ३२ हजार १७५ रुपये, तर ४ हजार १४५ खातेदारांना ४ कोटी ४० लाख १९ हजार २३६ रुपयांचे वितरण करण्यात आले. सामायिक खातेदारांसाठी हमीपत्राची अट आहे. हमीपत्रानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे.यामध्ये नोकरी - व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर असणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सातबारावरील अधिक नावांमुळे सहहिस्सेदारांची संख्या वाढते. मिळणाऱ्या भरपाईच्या रकमेपेक्षा संमतीपत्र तसेच येण्या-जाण्याचा खर्च अधिक होतो. त्यामुळे अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करतात. वर्ष समाप्ती तसेच आर्थिक वर्ष समाप्ती जवळ असल्यामुळे नुकसान भरपाईचा निधी परत जाण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची रक्कम घेऊन जावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात येत आहे. निधी परत जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी हमीपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)७ हजार ३५७ शेतकऱ्यांना मिळाला लाभ.फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे ७० टक्क्यांपेक्षा अधिक पिकाचे नुकसान.निधी परत जाण्यापूर्वी हमीपत्र तयार करून द्यावे; कृषी विभागाचे आवाहन.