शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

६,७00 बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

By admin | Updated: November 7, 2014 23:43 IST

जिल्हा परिषद प्रशासन : लोकसहभागातून पाणीटंचाई रोखण्याचा प्रयत्न

गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजनेसाठी प्रयत्न सुरू केले असून जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे असे एकूण ६ हजार ७०० बंधारे बांधण्याचे निश्चित केले आहे. हे सर्व बंधारे लोकसहभागातून घातले जाणार आहेत.जिल्ह्यात मे अखेर काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यामुळे त्या गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही वणवण काही प्रमाणात कमी होण्यासाठी जिल्ह्यात डिसेंबरअखेरपर्यंत कच्चे व पक्के बंधारे बांधण्यासाठीची नवीन योजना २०१२ मध्ये तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रविंद्रन यांनी अस्तित्वात आणली. त्यानंतर ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. एम.आर.ई.जी.एस.मधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेला लोकसहभागातून राबवा, असे आदेश शासनाने काढले. ही योजना राबविल्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली होती. लोकसहभागातून बंधारे बांधण्यासाठी शक्य तेवढा प्रतिसाद लाभत नसल्याने हे उद्दिष्ट ७५ ते ८० टक्के पूर्ण होत असे.जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा शेकडो मिलीमिटरची घट झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई भासण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने यावर्षीही पुढाकार घेतला असून जिल्ह्यात ६ हजार ७०० बंधारे बांधण्याचे निश्चित केले आहे. हे बंधारे कच्च्या व पक्क्या स्वरूपाचे असणार असून लोकसहभागातून हे बंधारे घालावयाचे आहेत. बंधारे लवकरात लवकर घालून पूर्ण करावेत, असे सक्त आदेशही जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार बंधारे बांधण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली असून दोडामार्गात अद्यापपर्यंत १४ बंधारे बांधून पूर्ण झालेले आहेत.पूर्वी कच्चे व वनराई बंधारे हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत बांधले जात होते. यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, हे बंधारे या योजनेतून घालणे बंद केल्याने या योजनेला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. गेल्यावेळी लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी लोकसहभागातून बंधारे घालण्यास थोडासा हातभार लावला होता. या लोकप्रतिनिधींनी बंधारे घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत पाणी वापर संस्था स्थापण्याचे आवाहन केले आहे.बंधारे बांधण्यास सुरूवात होणे आवश्यकनोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये घट होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या कडक ऊन पडत असल्याने पाणी आटत आहे. आतापासूनच प्रशासनाने याबाबत जनजागृती करून शक्य असेल तेवढ्या ठिकाणी बंधारे बांधण्यास सुरूवात करावी.जेणेकरून सध्या असलेली पाण्याची पातळी काही महिने टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.तालुकावार दिलेले उद्दिष्ट (कच्चे व पक्के बंधारे)तालुका उद्दिष्टकणकवली ८५०दोडामार्ग३००वेंगुर्ला४००मालवण८००देवगड७००सावंतवाडी८५०वैभववाडी३००कुडाळ८००सामाजिक वनीकरण २००जिल्हा अधिकारी१५००कृषी कार्यालयएकूण६७००