शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

६,७00 बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

By admin | Updated: November 7, 2014 23:43 IST

जिल्हा परिषद प्रशासन : लोकसहभागातून पाणीटंचाई रोखण्याचा प्रयत्न

गिरीष परब - सिंधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने उपाययोजनेसाठी प्रयत्न सुरू केले असून जिल्ह्यात कच्चे व वनराई बंधारे असे एकूण ६ हजार ७०० बंधारे बांधण्याचे निश्चित केले आहे. हे सर्व बंधारे लोकसहभागातून घातले जाणार आहेत.जिल्ह्यात मे अखेर काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यामुळे त्या गावातील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही वणवण काही प्रमाणात कमी होण्यासाठी जिल्ह्यात डिसेंबरअखेरपर्यंत कच्चे व पक्के बंधारे बांधण्यासाठीची नवीन योजना २०१२ मध्ये तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी ई. रविंद्रन यांनी अस्तित्वात आणली. त्यानंतर ही योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. एम.आर.ई.जी.एस.मधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेला लोकसहभागातून राबवा, असे आदेश शासनाने काढले. ही योजना राबविल्यामुळे जिल्ह्यात काही प्रमाणात पाण्याची पातळी वाढली होती. लोकसहभागातून बंधारे बांधण्यासाठी शक्य तेवढा प्रतिसाद लाभत नसल्याने हे उद्दिष्ट ७५ ते ८० टक्के पूर्ण होत असे.जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा शेकडो मिलीमिटरची घट झाल्याने जिल्ह्यात पाणीटंचाई भासण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पाणीटंचाईची झळ बसू नये, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने यावर्षीही पुढाकार घेतला असून जिल्ह्यात ६ हजार ७०० बंधारे बांधण्याचे निश्चित केले आहे. हे बंधारे कच्च्या व पक्क्या स्वरूपाचे असणार असून लोकसहभागातून हे बंधारे घालावयाचे आहेत. बंधारे लवकरात लवकर घालून पूर्ण करावेत, असे सक्त आदेशही जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी दिले आहेत. त्यानुसार बंधारे बांधण्याच्या प्रक्रियेला सुरूवात केली असून दोडामार्गात अद्यापपर्यंत १४ बंधारे बांधून पूर्ण झालेले आहेत.पूर्वी कच्चे व वनराई बंधारे हे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत बांधले जात होते. यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. मात्र, हे बंधारे या योजनेतून घालणे बंद केल्याने या योजनेला म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. गेल्यावेळी लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी लोकसहभागातून बंधारे घालण्यास थोडासा हातभार लावला होता. या लोकप्रतिनिधींनी बंधारे घालण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पाणी वापर संस्था स्थापन करण्यासाठी उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी पुढाकार घेत पाणी वापर संस्था स्थापण्याचे आवाहन केले आहे.बंधारे बांधण्यास सुरूवात होणे आवश्यकनोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध ठिकाणच्या पाणीसाठ्यांमध्ये घट होण्यास सुरूवात झाली आहे. सध्या कडक ऊन पडत असल्याने पाणी आटत आहे. आतापासूनच प्रशासनाने याबाबत जनजागृती करून शक्य असेल तेवढ्या ठिकाणी बंधारे बांधण्यास सुरूवात करावी.जेणेकरून सध्या असलेली पाण्याची पातळी काही महिने टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.तालुकावार दिलेले उद्दिष्ट (कच्चे व पक्के बंधारे)तालुका उद्दिष्टकणकवली ८५०दोडामार्ग३००वेंगुर्ला४००मालवण८००देवगड७००सावंतवाडी८५०वैभववाडी३००कुडाळ८००सामाजिक वनीकरण २००जिल्हा अधिकारी१५००कृषी कार्यालयएकूण६७००