शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पारा ४३ अंशावर

By admin | Updated: March 23, 2016 00:20 IST

विक्रमी तापमानाची नोंद : वैशाखाच्या झळा फाल्गुनात

सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जिल्हावासियांना सूर्यनारायणाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागले आहे. सोमवारी दुपारपर्यंत तापमानाचा पारा तब्बल ४३ अंशापर्यंत चढला होता. शिमगोत्सव तोंडावर असतानाच वैशाखाच्या झळाही फाल्गुनात पोहचू लागल्या आहेत. त्यामुळे हा पारा आणखीनच वाढणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.सिंधुदुर्गात प्रामुख्याने एप्रिलनंतर वातावरणातील तापमान ३९ ते ४० अंशापर्यंत जाते. तोपर्यंत हवेतील आर्द्रताही टिकून राहते. असे असताना मार्च महिन्यापासूनच जिल्हावासियांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. या वाढत्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले असून दुपारच्या सत्रात शहरातील, महामार्गातील रस्ते ओस पडू लागल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.तापमानवाढीला सिंधुदुर्गच अपवाद नसून संपूर्ण महाराष्ट्रात हा पारा वाढतच चाललेला आहे. मराठवाडा, विदर्भात तर भयावह स्थिती आहे. त्याठिकाणी ४१ ते ४४ अंशापर्यंत तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जर आज ही स्थिती असेल तर एप्रिल व मे महिन्यात सूर्य आणखीनच पारा चढवणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. कडक ऊन पडत असल्यामुळे प्रमुख बाजारपेठांमधील रस्ते दुपारच्या वेळी सुने-सुने वाटत आहेत. (प्रतिनिधी)थंड पेयाच्या दुकानांवर गर्दी : लिंबू सरबत, ऊसाचा रस, कलिंगडांना मागणीवाढत्या उन्हाच्या माऱ्यामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांनी शरीराला काहीशी ऊर्जा मिळावी यासाठी ठिकठिकाणी थाटण्यात आलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी लिंबू सरबत, ऊसाचा रस, कलिंगड आदी थंडपेयांची दुकाने ठिकठिकाणी थाटली असल्याचे दिसून येत आहे. दिवसा उष्ण तर रात्री थंड गारवासकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत वातावरणात थंडावा असतो. मात्र त्यानंतर वातावरणात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते. मोटारसायकलने प्रवास करताना तोंडाला स्कार्फ व हेल्मेटचा वापर करताना तरुणाई दिसून येत आहे. चालतानादेखील स्कार्फ व छत्री घेतल्याशिवाय सर्वसामान्य बाहेर पडताना दिसत नाहीत. दिवसा जरी उष्मा असला तरी त्याचा प्रभाव साधारणत: संध्याकाळी साडेचारनंतर ओसरू लागतो व रात्री मात्र वातावरणात गारवा पसरल्याचे चित्र असते.पाणीटंचाईची भीतीदिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेच्या प्रमाणामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावात आहे. त्यामुळे आता उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात घट होत आहे. यावर्षी दरवर्षी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच कडक उन्हाळ्यामुळे लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.