शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
2
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
3
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
4
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
5
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
6
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
7
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
8
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
9
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
10
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
11
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
12
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
13
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
14
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
15
Maharashtra Politics : डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत माना, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवा; संजय राऊतांचा भाजपाला टोला
16
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
17
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
18
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
19
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
20
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...

सिंधुदुर्गात पारा ४३ अंशावर

By admin | Updated: March 23, 2016 00:20 IST

विक्रमी तापमानाची नोंद : वैशाखाच्या झळा फाल्गुनात

सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जिल्हावासियांना सूर्यनारायणाच्या प्रकोपाला सामोरे जावे लागले आहे. सोमवारी दुपारपर्यंत तापमानाचा पारा तब्बल ४३ अंशापर्यंत चढला होता. शिमगोत्सव तोंडावर असतानाच वैशाखाच्या झळाही फाल्गुनात पोहचू लागल्या आहेत. त्यामुळे हा पारा आणखीनच वाढणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.सिंधुदुर्गात प्रामुख्याने एप्रिलनंतर वातावरणातील तापमान ३९ ते ४० अंशापर्यंत जाते. तोपर्यंत हवेतील आर्द्रताही टिकून राहते. असे असताना मार्च महिन्यापासूनच जिल्हावासियांना उन्हाचे चटके बसू लागले आहेत. या वाढत्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले असून दुपारच्या सत्रात शहरातील, महामार्गातील रस्ते ओस पडू लागल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.तापमानवाढीला सिंधुदुर्गच अपवाद नसून संपूर्ण महाराष्ट्रात हा पारा वाढतच चाललेला आहे. मराठवाडा, विदर्भात तर भयावह स्थिती आहे. त्याठिकाणी ४१ ते ४४ अंशापर्यंत तापमानाचा पारा वाढत चालला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात जर आज ही स्थिती असेल तर एप्रिल व मे महिन्यात सूर्य आणखीनच पारा चढवणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. कडक ऊन पडत असल्यामुळे प्रमुख बाजारपेठांमधील रस्ते दुपारच्या वेळी सुने-सुने वाटत आहेत. (प्रतिनिधी)थंड पेयाच्या दुकानांवर गर्दी : लिंबू सरबत, ऊसाचा रस, कलिंगडांना मागणीवाढत्या उन्हाच्या माऱ्यामुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांनी शरीराला काहीशी ऊर्जा मिळावी यासाठी ठिकठिकाणी थाटण्यात आलेल्या थंडपेयांच्या दुकानांवर गर्दी करण्यास सुरुवात केल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन ठिकठिकाणी लिंबू सरबत, ऊसाचा रस, कलिंगड आदी थंडपेयांची दुकाने ठिकठिकाणी थाटली असल्याचे दिसून येत आहे. दिवसा उष्ण तर रात्री थंड गारवासकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत वातावरणात थंडावा असतो. मात्र त्यानंतर वातावरणात उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते. मोटारसायकलने प्रवास करताना तोंडाला स्कार्फ व हेल्मेटचा वापर करताना तरुणाई दिसून येत आहे. चालतानादेखील स्कार्फ व छत्री घेतल्याशिवाय सर्वसामान्य बाहेर पडताना दिसत नाहीत. दिवसा जरी उष्मा असला तरी त्याचा प्रभाव साधारणत: संध्याकाळी साडेचारनंतर ओसरू लागतो व रात्री मात्र वातावरणात गारवा पसरल्याचे चित्र असते.पाणीटंचाईची भीतीदिवसेंदिवस वाढत चाललेल्या उष्णतेच्या प्रमाणामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावात आहे. त्यामुळे आता उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यात घट होत आहे. यावर्षी दरवर्षी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यातच कडक उन्हाळ्यामुळे लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागणार आहे.