शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
2
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
3
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
4
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
5
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
6
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
7
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
8
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका
9
प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब आणि मुलावर गुन्हा दाखल; १५० हून अधिक लोकांना लाखोंचा फटका
10
Stock Market Today: सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात घसरण, निफ्टी ४० अंकांनी घसरला; Glenmark Pharma, Dixon Tech मध्ये तेजी
11
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
12
कुलदीप यादव सुसाट! जडेजा आणि मुरलीधरनचा रेकॉर्ड ब्रेक, मलिंगाचाही 'हा' विक्रम धोक्यात
13
पाकिस्तानची स्थिती बिकट होणार! भारतीय हवाई दलाला मिळणार ९७ तेजस विमाने
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत
15
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर बंदीची टांगती तलवार, मैदानातील गैरवर्तन महागात पडणार?
16
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट
18
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
19
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
20
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?

उसाला ३ कोटींची कर्ज मंजुरी

By admin | Updated: November 4, 2015 23:58 IST

सतीश सावंत : शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बँक कटीबद्ध

कणकवली : गगनबावडा येथील डी.वाय. पाटील साखर कारखान्याचा तेरावा गाळप हंगाम सुरू झाला असून यावर्षी १ लाख मेट्रिक टन ऊस गाळप सिंधुदुर्गातून अपेक्षित आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने २०१५ या हंगामाकरिता ऊस पिकासाठी ३ कोटी २० लाखाची कर्ज मंजुरी दिली आहे. ऊस पिक तोडणीसाठी स्थानिक मजुरांची टोळी तयार करण्याचे प्रयत्न असून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा बॅँक कटीबद्ध असल्याची ग्वाही बॅँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. गगनबावडा येथील डी. वाय. पाटील साखर काखान्याचा गाळप हंगाम गेल्या महिन्यापासून सुरू झाला आहे. जिल्ह्यात यावेळी १ हजार ६१८ हेक्टर ऊस लागवडीखालील क्षेत्राची नोंद झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यातून ८७ हजार ७२१ मेट्रिक टन ऊस उपलब्ध झाला होता. त्यापोटी शेतकऱ्यांना २० कोटी ५२ लाख ऊस बिलाची रक्कम अदा करण्यात आली आहे. गगनबावडा साखर कारखान्याचे २०१५-१६ मध्ये ४.७० मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. १२.२० टक्के उताऱ्याने ५.७३ क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन अपेक्षित आहे. या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ४३३१.५४ हेक्टर व कार्यक्षेत्राबाहेरील ४२९९.५४ हेक्टर असे मिळून ८६३१.८ क्षेत्रामध्ये ऊस लागवडीची नोंद झाली आहे. तारण नसल्यास हमीपत्रावर कर्जपीक कर्ज पुरवठा हा क्षेत्रावर कर्ज बोजा नोंद करून पीक तारण घेऊन केला जातो. शेतकऱ्याकडे कर्जासाठी तारण क्षेत्र नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या बाबतीत कारखान्याचा लागन दाखला व कारखान्याच्या हमीपत्रावर १ लाखापर्यंतचे कर्ज बॅँकेतर्फे मंजूर केले जात आहे. कर्ज मंजुरी ही क्षेत्राच्या प्रमाणानुसार दिली जाणार आहे. जिल्ह्यातील नवीन शेतकऱ्यांना ऊस लागवड करायची असल्यास त्यांनी बॅँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सतीश सावंत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)ऊस तोडणीचे नियोजन : वाहनधारकांशी करारगेल्यावर्षी एफआरपी प्रमाण २३४० रूपये प्रमाणे एकूण १०५.५४ कोटी रक्कम कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केली. त्यापैकी २० कोटी ५२ लाख सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. कणकवली, वैभववाडी तालुक्यातील ऊस तोडणीचे नियोजन करण्यात आले आहे. ऊस तोडणी पाळीपत्रक तालुक्यातील विकास संस्था कार्यालयात उपलब्ध आहेत. ४२७ वाहनधारकांशी करार करण्यात आले असून टोळ्यांमार्फत हंगामात प्रतिदिन ४ हजार टन ऊस तोडणी होणार आहे. पाळीपत्रकाबाबत तक्रार असल्यास बॅँकेच्या प्रधान कार्यालयाकडे अथवा कारखान्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन सावंत यांनी केले आहे.