शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

जिल्ह्यात १७८ टॉवर थ्रीजीने जोडणार

By admin | Updated: August 22, 2015 00:20 IST

विनायक राऊत यांचे आश्वासन : दूरसंचार सल्लागार समितीची सावंतवाडीत बैठक

सावंतवाडी : सिंधुदुर्गमध्ये येत्या काही दिवसात १७८ टॉवरवर थ्री जी सेवा देण्याचा दूरसंचार विभागाचा विचार आहे. तर जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जातील, असे निर्णय सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले. तसेच चतुर्थीच्या काळात मोबाईल सेवेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेशही खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीची बैठक सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार भालचंद्र मुणगेकर होते. तर दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक बी. एस. बिराजदार, माजी आमदार राजन तेली, सल्लागार समिती सदस्य रूपेश राऊळ, विलास साळसकर, दीपलक्ष्मी पडते, राजन नाईक आदी उपस्थित होते. यावेळी सल्लागार समिती सदस्यांनी जिल्ह्यातील दूरसंचारच्या अडचणी मांडल्या. यात देवगड येथील विलास साळसकर यांनी केबल चोरीबाबत खासदारांचे लक्ष वेधले. त्यात आरोपींना रंगेहात पकडूनही पोलीस त्यांना सोडून देतात, असा प्रकार निदर्शनास आणून दिला. दीपलक्ष्मी पडते यांनी कुडाळमधील काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नाही व बिलाबाबत तक्रारी केल्या. याबाबत दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी चोरीचे प्रकार होत असल्याचे सांगत आम्ही वेळोवेळी तक्रारी करतो, असे स्पष्ट केले. माजी आमदार राजन तेली यांनी केबल चोरीबाबत दोन्ही खासदारांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी बोलून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात १५६ अधिकारी कमी आहेत. असे असताना राज्यात बीएसएनएलचे सर्वात चांगले काम हे सिंधुदुर्गमध्ये सुरू असून, गेल्या आर्थिक वर्षात १६ कोटीचा नफा या विभागाने मिळवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे कमी असलेल्या अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मी व खासदार मुणगेकर संयुक्तपणे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टॉवरबाबत अनेक तक्रारी असून मोबाईल सेवा सर्व ठिकाणी व्यवस्थित मिळावी, यासाठी दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्गमध्ये ४५० च्या जवळपास ग्रामपंचायती असून त्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायती दुसऱ्या टप्प्यात जोडल्या जातील, असे यावेळी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. १७८ टॉवरने थ्री जी सेवा देण्याचा प्रारंभ लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित टॉवर जोडले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)