शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत
2
टॅक्सी ड्रायव्हरने सुरू केला व्यवसाय, २० कोटींचं कर्ज; मित्तल यांनी का घेतला टोकाचा निर्णय?
3
आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल
4
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करला लिव्हर कॅन्सरचं निदान, म्हणाली- "आमच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काळ..."
5
नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
6
गजकेसरी राजयोगात राहु-केतु गोचर: १.५ वर्षे एकाच राशीत, ८ राशींचा भाग्योदय; यशच यश, लाभच लाभ!
7
वर्गात गैरहजर तर कायमचा विसरा अमेरिकेचा व्हिसा; अमेरिकन दूतावासाचा भारतीय विद्यार्थ्यांना इशारा
8
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
9
मेट्राे स्थानक २ दिवसांत सुरू करणार; ‘एमएमआरसी’च्या अश्विनी भिडे यांची माहिती
10
महामुंबईतील वाहने बीजिंग, शांघाय, टोकियोपेक्षा जास्त; पार्किंग असेल, तरच वाहन खरेदीस मुभा
11
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
12
मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव
13
अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा
14
विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन
15
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
16
LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)
17
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
18
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
19
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
20
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा

जिल्ह्यात १७८ टॉवर थ्रीजीने जोडणार

By admin | Updated: August 22, 2015 00:20 IST

विनायक राऊत यांचे आश्वासन : दूरसंचार सल्लागार समितीची सावंतवाडीत बैठक

सावंतवाडी : सिंधुदुर्गमध्ये येत्या काही दिवसात १७८ टॉवरवर थ्री जी सेवा देण्याचा दूरसंचार विभागाचा विचार आहे. तर जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जातील, असे निर्णय सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले. तसेच चतुर्थीच्या काळात मोबाईल सेवेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेशही खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीची बैठक सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार भालचंद्र मुणगेकर होते. तर दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक बी. एस. बिराजदार, माजी आमदार राजन तेली, सल्लागार समिती सदस्य रूपेश राऊळ, विलास साळसकर, दीपलक्ष्मी पडते, राजन नाईक आदी उपस्थित होते. यावेळी सल्लागार समिती सदस्यांनी जिल्ह्यातील दूरसंचारच्या अडचणी मांडल्या. यात देवगड येथील विलास साळसकर यांनी केबल चोरीबाबत खासदारांचे लक्ष वेधले. त्यात आरोपींना रंगेहात पकडूनही पोलीस त्यांना सोडून देतात, असा प्रकार निदर्शनास आणून दिला. दीपलक्ष्मी पडते यांनी कुडाळमधील काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नाही व बिलाबाबत तक्रारी केल्या. याबाबत दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी चोरीचे प्रकार होत असल्याचे सांगत आम्ही वेळोवेळी तक्रारी करतो, असे स्पष्ट केले. माजी आमदार राजन तेली यांनी केबल चोरीबाबत दोन्ही खासदारांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी बोलून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात १५६ अधिकारी कमी आहेत. असे असताना राज्यात बीएसएनएलचे सर्वात चांगले काम हे सिंधुदुर्गमध्ये सुरू असून, गेल्या आर्थिक वर्षात १६ कोटीचा नफा या विभागाने मिळवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे कमी असलेल्या अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मी व खासदार मुणगेकर संयुक्तपणे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टॉवरबाबत अनेक तक्रारी असून मोबाईल सेवा सर्व ठिकाणी व्यवस्थित मिळावी, यासाठी दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्गमध्ये ४५० च्या जवळपास ग्रामपंचायती असून त्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायती दुसऱ्या टप्प्यात जोडल्या जातील, असे यावेळी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. १७८ टॉवरने थ्री जी सेवा देण्याचा प्रारंभ लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित टॉवर जोडले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)