शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १७८ टॉवर थ्रीजीने जोडणार

By admin | Updated: August 22, 2015 00:20 IST

विनायक राऊत यांचे आश्वासन : दूरसंचार सल्लागार समितीची सावंतवाडीत बैठक

सावंतवाडी : सिंधुदुर्गमध्ये येत्या काही दिवसात १७८ टॉवरवर थ्री जी सेवा देण्याचा दूरसंचार विभागाचा विचार आहे. तर जिल्ह्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जातील, असे निर्णय सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आले. तसेच चतुर्थीच्या काळात मोबाईल सेवेत कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेशही खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. सिंधुदुर्ग दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीची बैठक सावंतवाडीतील दूरसंचार विभागाच्या सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार भालचंद्र मुणगेकर होते. तर दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे, उपमहाप्रबंधक बी. एस. बिराजदार, माजी आमदार राजन तेली, सल्लागार समिती सदस्य रूपेश राऊळ, विलास साळसकर, दीपलक्ष्मी पडते, राजन नाईक आदी उपस्थित होते. यावेळी सल्लागार समिती सदस्यांनी जिल्ह्यातील दूरसंचारच्या अडचणी मांडल्या. यात देवगड येथील विलास साळसकर यांनी केबल चोरीबाबत खासदारांचे लक्ष वेधले. त्यात आरोपींना रंगेहात पकडूनही पोलीस त्यांना सोडून देतात, असा प्रकार निदर्शनास आणून दिला. दीपलक्ष्मी पडते यांनी कुडाळमधील काही ठिकाणी मोबाईल रेंज मिळत नाही व बिलाबाबत तक्रारी केल्या. याबाबत दूरसंचारचे महाप्रबंधक सुहास कांबळे यांनी चोरीचे प्रकार होत असल्याचे सांगत आम्ही वेळोवेळी तक्रारी करतो, असे स्पष्ट केले. माजी आमदार राजन तेली यांनी केबल चोरीबाबत दोन्ही खासदारांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी बोलून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यात १५६ अधिकारी कमी आहेत. असे असताना राज्यात बीएसएनएलचे सर्वात चांगले काम हे सिंधुदुर्गमध्ये सुरू असून, गेल्या आर्थिक वर्षात १६ कोटीचा नफा या विभागाने मिळवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे कमी असलेल्या अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरण्याबाबत मी व खासदार मुणगेकर संयुक्तपणे दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच टॉवरबाबत अनेक तक्रारी असून मोबाईल सेवा सर्व ठिकाणी व्यवस्थित मिळावी, यासाठी दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सिंधुदुर्गमध्ये ४५० च्या जवळपास ग्रामपंचायती असून त्यातील ३६२ ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात आॅप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. तर उर्वरित ग्रामपंचायती दुसऱ्या टप्प्यात जोडल्या जातील, असे यावेळी खासदार राऊत यांनी स्पष्ट केले. १७८ टॉवरने थ्री जी सेवा देण्याचा प्रारंभ लवकरच करण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित टॉवर जोडले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)