शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

पुढील पाच वर्षात १७0 कोटी प्राप्त होणार

By admin | Updated: June 17, 2016 00:21 IST

संग्राम प्रभुगांवकर, शेखर सिंह : गावाचा आराखडा बनविताना लोकसहभागाची नितांत गरज

सिंधुदुर्गनगरी : ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत पुढील पाच वर्षांसाठी जिल्ह्याला १७० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा तयार करताना आरोग्य, शिक्षण, दरडोई उत्पन्न वाढ यासाठी ३५ टक्के निधी खर्च करायचा आहे. गावातील गरजा काय आहेत याचा विचार करून बनवायच्या आराखड्यात लोकसहभागाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.१४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचे गाव आमचा विकास उपक्रम राबविण्यात येत आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, महिला बालविकासचे प्रकल्प संचालक अनिल बागल उपस्थित होते.१३ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ते, गटार अशा कामांवर प्रामुख्याने खर्च केला गेला. मात्र १४ व्या वित्त आयोगांतर्गत येणाऱ्या निधीचे सुव्यवस्थापन व्हावे यादृष्टीने शासनाने यातील ३५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण, दरडोई उत्पन्न वाढविण्याची साधने यावर खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला १७० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. म्हणूनच त्याचे नियोजन ग्रामपंचायत स्तरावर अचूक होणे आवश्यक आहे. यादृष्टीने ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत.१४ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीतील प्रत्येक गटातील जास्त व कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या अनुदानाची माहितीही देण्यात आली आहे. सर्वात जास्त निधी फोंडाघाट ग्रामपंचायतीला १८ कोटी ९५ लाख रुपये तर सर्वात कमी ५ कोटी ७२ हजार रुपये निधी मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीला प्राप्त होणार आहे.यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा हा लोकसहभागातून बनविणे आवश्यक आहे. हा आराखडा तयार होताना शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती, महिला, युवक, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था यांच्याशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती यांच्या संबंधातील कामे प्राधान्यक्रमानुसार कामे निवड करण्यात यावीत. यासाठी गण पातळीवर घेण्यात आलेले तज्ज्ञ प्रशिक्षक व अधिकारी यांच्या मदतीने लोकसहभागासाठी वातावरण निर्मिती प्रक्रिया अभियान स्वरूपात राबविण्यात येणार आहे. ‘आपले गाव आपला विकास’साठी प्रत्येक ग्रामस्थाने आपली व आपल्या गावाच्या विकासासाठी आवश्यक गोष्टींसाठी आग्रही रहावे व ग्रामपंचायतीने हा आराखडा १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत अंतिम मंजूर करून घ्यावा, असेही आवाहन यावेळी शेखर सिंह यांनी केले. (प्रतिनिधी)