शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

पुढील पाच वर्षात १७0 कोटी प्राप्त होणार

By admin | Updated: June 17, 2016 00:21 IST

संग्राम प्रभुगांवकर, शेखर सिंह : गावाचा आराखडा बनविताना लोकसहभागाची नितांत गरज

सिंधुदुर्गनगरी : ‘आमचं गाव आमचा विकास’ या उपक्रमांतर्गत पुढील पाच वर्षांसाठी जिल्ह्याला १७० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा तयार करताना आरोग्य, शिक्षण, दरडोई उत्पन्न वाढ यासाठी ३५ टक्के निधी खर्च करायचा आहे. गावातील गरजा काय आहेत याचा विचार करून बनवायच्या आराखड्यात लोकसहभागाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगांवकर व मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.१४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार आमचे गाव आमचा विकास उपक्रम राबविण्यात येत आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, महिला बालविकासचे प्रकल्प संचालक अनिल बागल उपस्थित होते.१३ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ते, गटार अशा कामांवर प्रामुख्याने खर्च केला गेला. मात्र १४ व्या वित्त आयोगांतर्गत येणाऱ्या निधीचे सुव्यवस्थापन व्हावे यादृष्टीने शासनाने यातील ३५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण, दरडोई उत्पन्न वाढविण्याची साधने यावर खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला १७० कोटी रुपये प्राप्त होणार आहेत. म्हणूनच त्याचे नियोजन ग्रामपंचायत स्तरावर अचूक होणे आवश्यक आहे. यादृष्टीने ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत.१४ व्या वित्त आयोगांतर्गत सन २०१६-१७ ते २०१९-२० या कालावधीतील प्रत्येक गटातील जास्त व कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना प्राप्त होणाऱ्या अनुदानाची माहितीही देण्यात आली आहे. सर्वात जास्त निधी फोंडाघाट ग्रामपंचायतीला १८ कोटी ९५ लाख रुपये तर सर्वात कमी ५ कोटी ७२ हजार रुपये निधी मालवण तालुक्यातील बांदिवडे खुर्द ग्रामपंचायतीला प्राप्त होणार आहे.यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने आराखडा हा लोकसहभागातून बनविणे आवश्यक आहे. हा आराखडा तयार होताना शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती, महिला, युवक, महिला बचतगट, स्वयंसेवी संस्था यांच्याशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य, शिक्षण, रोजगार निर्मिती यांच्या संबंधातील कामे प्राधान्यक्रमानुसार कामे निवड करण्यात यावीत. यासाठी गण पातळीवर घेण्यात आलेले तज्ज्ञ प्रशिक्षक व अधिकारी यांच्या मदतीने लोकसहभागासाठी वातावरण निर्मिती प्रक्रिया अभियान स्वरूपात राबविण्यात येणार आहे. ‘आपले गाव आपला विकास’साठी प्रत्येक ग्रामस्थाने आपली व आपल्या गावाच्या विकासासाठी आवश्यक गोष्टींसाठी आग्रही रहावे व ग्रामपंचायतीने हा आराखडा १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत अंतिम मंजूर करून घ्यावा, असेही आवाहन यावेळी शेखर सिंह यांनी केले. (प्रतिनिधी)