शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

जिल्हा परिषद जपणार ‘माती अन् माणसं’

By admin | Updated: March 26, 2015 00:02 IST

अंदाजपत्रकाला मंजुरी : समाजकल्याण, ‘जलयुक्त शिवार’ला झुकते माप

सातारा : जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ साठीच्या २५ कोटी ५४ लाखांच्या अंदाजपत्रकाला बुधवारी झालेल्या सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. अर्थ व शिक्षण सभापती अमित कदम यांनी हा अर्थसंकल्प मांडला. जिल्ह्यासाठी वैविध्यपूर्ण योजनांचा या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकामध्ये समाजकल्याण विभागाला झुकते माप देण्यात आले आहे.अंदाजपत्रकाच्या मंजुरीसाठी सभा आयोजित केली होती. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास यांची प्रमुख उपस्थिती होती. या अंदाजपत्रकात शिक्षण विभागाकरिता २०० लाख, कृषी विभागाकरिता १०० लाख, आरोग्य विभागाकरिता ८० लाख, समाजकल्याण विभागाकरिता २८५.९१ लाख, महिला व बालकल्याण विभागाकरिता १०४.४२ लाख, अशी निधीची तरतूद करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेकडील कृषी, लघु पाटबंधारे तथा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने शासनाने जाहीर केलेल्या जलयुक्त शिवाराकरिता जास्तीचा निधी देऊन जिल्ह्यातील पाण्याचे स्रोत निर्माण करून शेतीसाठी मुबलक पाणीसाठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद काम करीत असल्याचेही सभापती अमित कदम यांनी सांगितले.प्राथमिक शिक्षण, आरोग्य, कृषी विकास या बाबींवर जिल्हा परिषदेने जास्त भर दिला असून, आगामी वर्षात अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील जनतेचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी जिल्हा परिषद कटिबद्ध असल्याचेही अमित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)विरोधकांचा गोंधळ...पेल्यातले वादळ!जिल्हा परिषद सदस्यांना अंदाजपत्रकाच्या प्रती मिळणे आवश्यक होते; पण अनेक सदस्यांना त्या मिळाल्या नसल्याने आयोजित केलेली सभा रद्द करावी, अशी मागणी जयवंत जगताप यांनी केली; परंतु त्यांच्या मागणीला विरोधी बाकावरील सदस्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने सभा पुढे सुरू राहिली.