शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तांबवेत चावडीसमोर झाले "झेंडावंदन"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:40 IST

विष्णुपंत राऊत सांगतात... ''तो'' दिवस सुवर्णमय! कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गाव म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी. या गावाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान ...

विष्णुपंत राऊत सांगतात... ''तो'' दिवस सुवर्णमय!

कऱ्हाड तालुक्यातील तांबवे गाव म्हणजे स्वातंत्र्यसैनिकांची पंढरी. या गावाचे स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान आहे. १९४० च्या दशकात स्वातंत्र्यासाठी मोठा उठाव झाला होता आणि हा उठाव, स्वातंत्र्याची चळवळ, तसेच स्वतंत्र भारताची पहिली पहाट अनुभवण्याचे भाग्य गावातील विष्णुपंत परशुराम राऊत यांना लाभले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या विष्णुपंत राऊत यांचे वय सध्या ८८ वर्ष आहे. मात्र, स्वतंत्र भारताची ''ती'' पहिली पहाट त्यांना आजही जशीच्या तशी आठवते. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असाच तो दिवस होता, असे ते अभिमानाने सांगतात.

स्वातंत्र्यलढा सुरू असताना तांबवे गावातही चळवळ उभी राहिली होती. सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये कोयना नदीच्या काठावर हे गाव वसले आहे. १९४० च्या दशकात गावामध्ये स्वातंत्र्य चळवळीने जोर धरला असताना इंग्रजांनी ही चळवळ हाणून पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावच्या चारी बाजूंनी कोयना नदीचे पाणी असल्यामुळे इंग्रजांना गावात जाणे शक्य होत नव्हते. १९४२ च्या भारत छोडो व प्रतिसरकार चळवळीमध्ये गावातील स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेतला होता. यशवंतराव चव्हाण, नागनाथ नायकवडी असे अनेक लोक भूमिगत म्हणून तांबवे गावात त्यावेळी राहिले होते.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला आणि तो दिवस तांबवे गावात मोठ्या जल्लोषात साजरा केला गेला. विष्णुपंत राऊत सांगतात की, त्यावेळी माझे वय अवघ्या दहा वर्षाचे होते. मी शाळेत शिक्षण घेत होतो. गावातील मधला पार स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाचे ठिकाण होते. तेथे आदल्या दिवशी सर्व स्वातंत्र्यसैनिक एकत्रित आले. त्यामध्ये महिलाही सहभागी होत्या. त्यांनी गावामध्ये झेडांवदन करायचे ठरवले. त्याची जय्यत तयारीही केली. इंग्रज देश सोडून जाणार होते. अनेक वर्षांपासून हवे असलेले स्वातंत्र्य देशाला मिळणार होते. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी कष्ट केले, तुरुंगवास भोगला होता त्यांच्या प्रयत्नांना यश येणार होते. त्यामुळे तो दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असाच होता .१५ ऑगस्ट १९४७ रोजी सकाळी साडेसात वाजता स्वातंत्र्यसैनिकांच्या हस्ते तांबवे गावात मधल्या पाराजवळ झेंडावंदन घेण्यात आले. त्यावेळी भारत ''माता की जय'' अशा घोषणा देण्यात आल्या. गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.

त्यावेळी कृष्णा दौलत पाटील हे सरपंच होते. ग्रामपंचायत चावडीची जुनी पत्र्याची इमारत होती आणि या इमारतीसमोर सरपंच कृष्णा पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. आण्णा बाळा पाटील, जयसिंग बापू, रंगनाथ पाटील, नारायण ताटे, राजाराम फल्ले, ज्ञानदेव साठे, तानाजी काटवटे त्यावेळी उपस्थित होते.

- चौकट

... अन् महिलांनी तिरंग्याला मिठी मारली

९ ऑगस्ट १९४२ रोजी यशवंतराव चव्हाण यांनी कऱ्हाडमध्ये टिळक हायस्कूल येथे झेंडावंदन केले. त्यावेळी तांबवे गावातील युवकांनी मधल्या पाराजवळ गांधी चौकात ३५ ते ४० फूट उंचीचा तिरंगा फडकावला होता. काशीनाथ देशमुख, पांडुरंग सुर्वे, शंकर भोसले, तुकाराम फल्ले, रघुनाथ फल्ले, रामचंद्र पाटील, रंगनाथ आप्पा पाटील, अण्णा बाळा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक त्यामध्ये सहभागी झाले होते. इंग्रजांना हे समजल्यानंतर ते गावात पलटण घेऊन आले. त्यांनी तिरंगा उतरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी गावातील कासाबाई धोंडूबाई चाटे, तानुबाई पाटील यांच्यासह अन्य महिलांनी झेंड्याला मिठी मारली.

फोटो : १४विष्णुपंत राऊत