शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

जिंती येथे सर्पदंशाने मध्य प्रदेशमधील युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:42 IST

सातारा : मध्य प्रदेश येथील इंदूर जिल्ह्यातील जामबुजूर्ग येथील एकाचा फलटण तालुक्यातील जिंती येथे सर्पदंशाने मृत्यू झाला. मुरली कटारे ...

सातारा : मध्य प्रदेश येथील इंदूर जिल्ह्यातील जामबुजूर्ग येथील एकाचा फलटण तालुक्यातील जिंती येथे सर्पदंशाने मृत्यू झाला. मुरली कटारे असे मृत्यू झालेल्याचे नाव असून ही घटना बुधवार, दि. १३ रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, मुरली भैरूसिंग कटारे (वय ३०, रा. जामबुजूर्ग, ता. महू, जि. इंदूर, राज्य मध्य प्रदेश) हा युवक फलटण तालुक्यातील जिंती गावच्या हद्दीत मोलमजुरी करण्यासाठी आला होता. दौलतनाना यांच्या उसाच्या शेतात असणारा जिंती बंधारा क्रॉस करून आल्यानंतर त्याला सर्पदंश झाला. याचा मुरली कटारे याने स्वत:हून त्याचा मित्र सुरज गिनावा याला मोबाइलवर मेसेज केला. यानंतर सुरज याने मुरली याच्याशी संपर्क केला असता, ''मला साप चावला आहे, तू लगेच ये'', असे त्याने सांगितले. त्यामुळे सुरज आणि सुरेश खोमणे असे दोघेजण जिंती बंधाऱ्याजवळ पोहोचले. येथे दोघांनीही मुरली यास शोधून काढले आणि त्याला साखरवाडी येथील शासकीय रुग्णालयात आणले. मात्र, त्याचा वाटेतच मृत्यू झाला असल्याची माहिती येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती सुरज याने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर त्याची नोंद झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बी.आर. साबळे हे करत आहेत.