शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्यातील परकी अन् परक्यांतील आपल्यांची पारख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:40 IST

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन ...

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन हजारांत फितूर झालेल्यांचा बुरखा यानिमित्ताने उतरला आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले, तर काहींनी आपला गड कायम राखला.

काही ठिकाणी युवकांना संधी दिली गेली, तर काही ठिकाणी ज्येष्ठांचाच मान राखल्याचे निकालातून स्पष्ट झाले. आपल्या लोकांच्या विश्वासावर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटलेल्या अनेक तरुण उमेदवारांना आपल्याच लोकांनी केलेल्या दगा, फटक्यांमुळे पराभवाचा सामना करावा लागला. ग्रामविकासाचे ध्येय उराशी बाळगलेल्या उमेदवारांचा धनशक्ती अन् फितुरांच्या सहकार्याने विरोधकांनी केलेला पराभव हा लोकशाहीचा पराभव असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

नेहमी आपल्या आजूबाजूला वावरणारी आणि डोळ्यांसमोर दिसणारी माणसं आपली आहेत, असा भाबडा आशावाद अनेकांना असतो. ही माझी माणसं आहेत असं तो विश्वासानं इतरांना सांगत असतो. अडचणीच्या काळात आपल्याला दादा.. दादा.. म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि व्याकूळतेने आवाज देणाऱ्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न अनेकांकडून नेहमी केला जातो. गावाच्या सर्वांगीण विकासाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहू, असा शब्द जवळचे लोक निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देतात. मात्र, मतदानाच्या अगोदर विराेधकांनी आवडीच्या पेयाबरोबर एक-दोन वेळचे जेवण आणि हजार-दोन हजार रुपयांच्या नोटा खिशात कोंबल्यानंतर लगेच मतपरिवर्तन झाल्याचे दिसून येते. योग्य-अयोग्याचं देणं-घेणं नसलेली ही मंडळी लगेच परक्यांच्या झुंडीत सहभागी होतात. विरोधकांनी डोक्यात भरलेलं चुकीचं ज्ञान त्यांना ब्रह्मज्ञान वाटू लागतं आणि आपल्याच जवळच्या उमेदवाराच्या पराभवाचे नियोजन करू लागतात. प्रचारादरम्यान आणि निवडणुकीनंतर उमेदवाराच्या नजरेला नजर न भिडविणे या कृतीमुळेच चुकीच्या पद्धतीनं वागलो हे संबंधिताला जाणवलं असल्याचं स्पष्ट होतं.

चौकट

दगाफटक्याची सल कायम

ग्रामपंचायत निवडणुका दर पाच वर्षांनी होतातच; परंतु आपल्यांनी केलेला दगाफटका मनामध्ये मात्र कायम घर करून राहतो. त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्यातील परके आणि परक्यांतील आपलं कोण हे ओळखायचे असेल, त्यानं निश्चितपणे एकदा तरी ग्रामपंचायत निवडणूक लढवायला हवी, अशीच चर्चा गावोगावच्या पारावर सुरू आहे.