शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

आपल्यातील परकी अन् परक्यांतील आपल्यांची पारख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:40 IST

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन ...

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन हजारांत फितूर झालेल्यांचा बुरखा यानिमित्ताने उतरला आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले, तर काहींनी आपला गड कायम राखला.

काही ठिकाणी युवकांना संधी दिली गेली, तर काही ठिकाणी ज्येष्ठांचाच मान राखल्याचे निकालातून स्पष्ट झाले. आपल्या लोकांच्या विश्वासावर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटलेल्या अनेक तरुण उमेदवारांना आपल्याच लोकांनी केलेल्या दगा, फटक्यांमुळे पराभवाचा सामना करावा लागला. ग्रामविकासाचे ध्येय उराशी बाळगलेल्या उमेदवारांचा धनशक्ती अन् फितुरांच्या सहकार्याने विरोधकांनी केलेला पराभव हा लोकशाहीचा पराभव असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

नेहमी आपल्या आजूबाजूला वावरणारी आणि डोळ्यांसमोर दिसणारी माणसं आपली आहेत, असा भाबडा आशावाद अनेकांना असतो. ही माझी माणसं आहेत असं तो विश्वासानं इतरांना सांगत असतो. अडचणीच्या काळात आपल्याला दादा.. दादा.. म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि व्याकूळतेने आवाज देणाऱ्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न अनेकांकडून नेहमी केला जातो. गावाच्या सर्वांगीण विकासाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहू, असा शब्द जवळचे लोक निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देतात. मात्र, मतदानाच्या अगोदर विराेधकांनी आवडीच्या पेयाबरोबर एक-दोन वेळचे जेवण आणि हजार-दोन हजार रुपयांच्या नोटा खिशात कोंबल्यानंतर लगेच मतपरिवर्तन झाल्याचे दिसून येते. योग्य-अयोग्याचं देणं-घेणं नसलेली ही मंडळी लगेच परक्यांच्या झुंडीत सहभागी होतात. विरोधकांनी डोक्यात भरलेलं चुकीचं ज्ञान त्यांना ब्रह्मज्ञान वाटू लागतं आणि आपल्याच जवळच्या उमेदवाराच्या पराभवाचे नियोजन करू लागतात. प्रचारादरम्यान आणि निवडणुकीनंतर उमेदवाराच्या नजरेला नजर न भिडविणे या कृतीमुळेच चुकीच्या पद्धतीनं वागलो हे संबंधिताला जाणवलं असल्याचं स्पष्ट होतं.

चौकट

दगाफटक्याची सल कायम

ग्रामपंचायत निवडणुका दर पाच वर्षांनी होतातच; परंतु आपल्यांनी केलेला दगाफटका मनामध्ये मात्र कायम घर करून राहतो. त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्यातील परके आणि परक्यांतील आपलं कोण हे ओळखायचे असेल, त्यानं निश्चितपणे एकदा तरी ग्रामपंचायत निवडणूक लढवायला हवी, अशीच चर्चा गावोगावच्या पारावर सुरू आहे.