शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

आपल्यातील परकी अन् परक्यांतील आपल्यांची पारख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:40 IST

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन ...

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन हजारांत फितूर झालेल्यांचा बुरखा यानिमित्ताने उतरला आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले, तर काहींनी आपला गड कायम राखला.

काही ठिकाणी युवकांना संधी दिली गेली, तर काही ठिकाणी ज्येष्ठांचाच मान राखल्याचे निकालातून स्पष्ट झाले. आपल्या लोकांच्या विश्वासावर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटलेल्या अनेक तरुण उमेदवारांना आपल्याच लोकांनी केलेल्या दगा, फटक्यांमुळे पराभवाचा सामना करावा लागला. ग्रामविकासाचे ध्येय उराशी बाळगलेल्या उमेदवारांचा धनशक्ती अन् फितुरांच्या सहकार्याने विरोधकांनी केलेला पराभव हा लोकशाहीचा पराभव असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

नेहमी आपल्या आजूबाजूला वावरणारी आणि डोळ्यांसमोर दिसणारी माणसं आपली आहेत, असा भाबडा आशावाद अनेकांना असतो. ही माझी माणसं आहेत असं तो विश्वासानं इतरांना सांगत असतो. अडचणीच्या काळात आपल्याला दादा.. दादा.. म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि व्याकूळतेने आवाज देणाऱ्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न अनेकांकडून नेहमी केला जातो. गावाच्या सर्वांगीण विकासाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहू, असा शब्द जवळचे लोक निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देतात. मात्र, मतदानाच्या अगोदर विराेधकांनी आवडीच्या पेयाबरोबर एक-दोन वेळचे जेवण आणि हजार-दोन हजार रुपयांच्या नोटा खिशात कोंबल्यानंतर लगेच मतपरिवर्तन झाल्याचे दिसून येते. योग्य-अयोग्याचं देणं-घेणं नसलेली ही मंडळी लगेच परक्यांच्या झुंडीत सहभागी होतात. विरोधकांनी डोक्यात भरलेलं चुकीचं ज्ञान त्यांना ब्रह्मज्ञान वाटू लागतं आणि आपल्याच जवळच्या उमेदवाराच्या पराभवाचे नियोजन करू लागतात. प्रचारादरम्यान आणि निवडणुकीनंतर उमेदवाराच्या नजरेला नजर न भिडविणे या कृतीमुळेच चुकीच्या पद्धतीनं वागलो हे संबंधिताला जाणवलं असल्याचं स्पष्ट होतं.

चौकट

दगाफटक्याची सल कायम

ग्रामपंचायत निवडणुका दर पाच वर्षांनी होतातच; परंतु आपल्यांनी केलेला दगाफटका मनामध्ये मात्र कायम घर करून राहतो. त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्यातील परके आणि परक्यांतील आपलं कोण हे ओळखायचे असेल, त्यानं निश्चितपणे एकदा तरी ग्रामपंचायत निवडणूक लढवायला हवी, अशीच चर्चा गावोगावच्या पारावर सुरू आहे.