शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

आपल्यातील परकी अन् परक्यांतील आपल्यांची पारख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:40 IST

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन ...

रहिमतपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने उमेदवारांपुढे आपल्यातील परकी आणि परक्यांतील आपली याची पारख झाली. एक-दोन वेळचे जेवण अन् हजार-दोन हजारांत फितूर झालेल्यांचा बुरखा यानिमित्ताने उतरला आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले, तर काहींनी आपला गड कायम राखला.

काही ठिकाणी युवकांना संधी दिली गेली, तर काही ठिकाणी ज्येष्ठांचाच मान राखल्याचे निकालातून स्पष्ट झाले. आपल्या लोकांच्या विश्वासावर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटलेल्या अनेक तरुण उमेदवारांना आपल्याच लोकांनी केलेल्या दगा, फटक्यांमुळे पराभवाचा सामना करावा लागला. ग्रामविकासाचे ध्येय उराशी बाळगलेल्या उमेदवारांचा धनशक्ती अन् फितुरांच्या सहकार्याने विरोधकांनी केलेला पराभव हा लोकशाहीचा पराभव असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.

नेहमी आपल्या आजूबाजूला वावरणारी आणि डोळ्यांसमोर दिसणारी माणसं आपली आहेत, असा भाबडा आशावाद अनेकांना असतो. ही माझी माणसं आहेत असं तो विश्वासानं इतरांना सांगत असतो. अडचणीच्या काळात आपल्याला दादा.. दादा.. म्हणून मोठ्या अपेक्षेने आणि व्याकूळतेने आवाज देणाऱ्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न अनेकांकडून नेहमी केला जातो. गावाच्या सर्वांगीण विकासाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवाराच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहू, असा शब्द जवळचे लोक निवडणुकीच्या पूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देतात. मात्र, मतदानाच्या अगोदर विराेधकांनी आवडीच्या पेयाबरोबर एक-दोन वेळचे जेवण आणि हजार-दोन हजार रुपयांच्या नोटा खिशात कोंबल्यानंतर लगेच मतपरिवर्तन झाल्याचे दिसून येते. योग्य-अयोग्याचं देणं-घेणं नसलेली ही मंडळी लगेच परक्यांच्या झुंडीत सहभागी होतात. विरोधकांनी डोक्यात भरलेलं चुकीचं ज्ञान त्यांना ब्रह्मज्ञान वाटू लागतं आणि आपल्याच जवळच्या उमेदवाराच्या पराभवाचे नियोजन करू लागतात. प्रचारादरम्यान आणि निवडणुकीनंतर उमेदवाराच्या नजरेला नजर न भिडविणे या कृतीमुळेच चुकीच्या पद्धतीनं वागलो हे संबंधिताला जाणवलं असल्याचं स्पष्ट होतं.

चौकट

दगाफटक्याची सल कायम

ग्रामपंचायत निवडणुका दर पाच वर्षांनी होतातच; परंतु आपल्यांनी केलेला दगाफटका मनामध्ये मात्र कायम घर करून राहतो. त्यामुळे ज्यांना कोणाला आपल्यातील परके आणि परक्यांतील आपलं कोण हे ओळखायचे असेल, त्यानं निश्चितपणे एकदा तरी ग्रामपंचायत निवडणूक लढवायला हवी, अशीच चर्चा गावोगावच्या पारावर सुरू आहे.