शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरतीचा जीआर रद्द झाल्यामुळे तरुण नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:39 IST

अकॅडमीचा खर्च परवडेना; सराव करताना मनोबल खचतंय सातारा : पोलीस भरतीचा जीआर शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे पोलीस भरतीचा ...

अकॅडमीचा खर्च परवडेना; सराव करताना मनोबल खचतंय

सातारा : पोलीस भरतीचा जीआर शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे पोलीस भरतीचा सराव करणारे युवक नाराज झाले आहेत. पोलीस होण्याचे स्वप्न अधुरेच राहतेय की काय? अशी चिंता तरुणांना लागली आहे. काही तरुणांचे वय संपत आल्याने युवक अक्षरश: हतबल झाले आहेत.

पोलीस दलात भरती होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून तरुण सराव करत आहेत. अनेकांनी खासगी अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी त्यांचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. गेल्या वर्षी पोलीस भरती होणार होती. मात्र, कोरोनामुळे ही भरती पुढे ढकलण्यात आली. परिणामी जिल्हा पोलीस दलाला मनुष्यबळ उपलब्ध होण्यात अडथळा झाला आहे. पोलीस भरतीचे नव्याने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात यावे, जेणेकरून भरतीचे प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा तरुणांनी व्यक्त केली आहे. पोलीस दलात भरती होण्यासाठी मोठ्या संख्येने युवतीही इच्छुक असून, त्याही रोज सराव करत आहेत.

एक हजार नागरिकांमागे एक पोलीस

जिल्ह्याची लोकसंख्या ३५ लाखांवर आहे, तर पोलीस केवळ साडेतीन हजार आहेत. त्यामुळे एक हजार नागरिकांमागे केवळ एक पोलीस उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत गुन्हे कसे रोखायचे, असा प्रश्न पोलिसांसमोर आवासून उभा आहे. मात्र, तरीसुद्धा पोलिसांकडून चांगल्या प्रकारे काम सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

पोलीस भरती होण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मी सराव करत आहे. जवळपास माझी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मात्र, आता भरतीच होणार नसल्याने खूप नाराज झालो आहे. गेल्या वर्षीही भरतीसाठी फाॅर्म भरला होता; परंतु भरती कोरोनामुळे होऊ शकली नाही. आता येत्या काही महिन्यांत भरती होईल, अशी आशा व्यक्त करतो.

- रामदास साळुंखे

कोरेगाव,

पोलीस भरती रद्द झाल्यामुळे आमचा अकॅडमीतील खर्चही वाढला आहे. भरती होणार असल्याने रोजचा सराव सुरू होता. आता सराव करू वाटत नाही. भरती कधी होईल, याची शाश्वती नाही. शासनाने युवकांच्या वयाचा विचार करून तातडीने भरती प्रक्रिया अमलात आणावी.

- प्रदीप माने

विसावा नाका, सातारा

पोलीस भरतीसाठी मोठी स्पर्धा आहे. गत वर्ष लाॅकडाऊनमध्ये गेले. आता दुसरं वर्ष पण असेच जाईल की काय? अशी धास्ती आम्हाला वाटू लागलीय. शासनाने युवकांचे करिअर संपुष्टात आणण्याचा विचार केला आहे का, अशी शंका येतेय.

- अनिकेत कदम, पाटण