शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तरूणांनी कृषी पर्यटनाकडे वळावे : राजेंद्र सरकाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

पेट्री : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला असून. शाश्वत अशा शेती व्यवसायाशिवाय तरणोपाय नाही. याचा विचार करून तरूणांनी शेती ...

पेट्री : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला असून. शाश्वत अशा शेती व्यवसायाशिवाय तरणोपाय नाही. याचा विचार करून तरूणांनी शेती करतच त्याला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास आर्थिक उन्नती साधता येईल, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

जावली तालुक्यातील सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र्राला भेट देऊन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, जावली तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. तालुक्यात कास पठार, बामणोली, वासोटा किल्ला व विविध धार्मिक स्थळांमुळे पर्यटनाला मोठा वाव आहे. लाखो पर्यटक दरवर्षी या परिसरात येत असतात. शिवाय महाबळेश्वर, पाचगणी जवळच असल्याने येथील पर्यटकही आकर्षित करता येतील. याचा विचार करून शेतीमधे नवीन कल्पना राबवून शेतीला जोडधंदा म्हणून पर्यटनाची जोड दिली पाहिजे. यातून रोजगार निर्मिती होण्याबरोबरच तरूणांना शहराची वाट धरावी लागणार नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत असून, जावली तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्रामार्फत संचालिका अर्चना पवार यांनी राजेंद्र सरकाळे व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ.सरकाळे यांनी केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले.