शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तरूणांनी कृषी पर्यटनाकडे वळावे : राजेंद्र सरकाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

पेट्री : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला असून. शाश्वत अशा शेती व्यवसायाशिवाय तरणोपाय नाही. याचा विचार करून तरूणांनी शेती ...

पेट्री : कोरोनामुळे उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला असून. शाश्वत अशा शेती व्यवसायाशिवाय तरणोपाय नाही. याचा विचार करून तरूणांनी शेती करतच त्याला कृषी पर्यटनाची जोड दिल्यास आर्थिक उन्नती साधता येईल, असे प्रतिपादन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

जावली तालुक्यातील सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र्राला भेट देऊन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले, जावली तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. तालुक्यात कास पठार, बामणोली, वासोटा किल्ला व विविध धार्मिक स्थळांमुळे पर्यटनाला मोठा वाव आहे. लाखो पर्यटक दरवर्षी या परिसरात येत असतात. शिवाय महाबळेश्वर, पाचगणी जवळच असल्याने येथील पर्यटकही आकर्षित करता येतील. याचा विचार करून शेतीमधे नवीन कल्पना राबवून शेतीला जोडधंदा म्हणून पर्यटनाची जोड दिली पाहिजे. यातून रोजगार निर्मिती होण्याबरोबरच तरूणांना शहराची वाट धरावी लागणार नाही.

जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात येत असून, जावली तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्रामार्फत संचालिका अर्चना पवार यांनी राजेंद्र सरकाळे व उपस्थितांचे स्वागत केले. डॉ.सरकाळे यांनी केंद्राची पाहणी करून समाधान व्यक्त केले.