शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

‘यशवंत पंचायत राज’मध्ये कऱ्हाड समिती राज्यात दुसरी

By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST

देवराज पाटील : मुंबई येथे २० रोजी होणार पुरस्कार वितरण

कऱ्हाड : ‘ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे असते. विकासाच्या प्रमुख योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात. यासाठी ‘यशवंत राज अभियान’ ही पुरस्कार योजना सुरू करण्यात आली. त्यामध्ये राज्यस्तरावर दुसरा व विभाग स्तरावर पहिला क्रमांक कऱ्हाड पंचायत समितीचा आला असून, याचे वितरण दि. २० रोजी मुंबई येथे ‘यशवंत पंचायत राज अभियान’ कार्यक्रमात करण्यात येणार आहे,’ अशी माहिती सभापती देवराज पाटील यांनी दिली.कऱ्हाड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते. सभापती पाटील म्हणाले, ‘पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांनी सन २०१४-१५ या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामांचे मूल्यमापन विचारात घेऊन विभागस्तर अशा दोन स्तरांवर यशवंत पंचायत राज अभियान ही योजना यावर्षी देखील राबविण्यात येत आहे. यासाठी राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर प्रत्येकी तीन पंचायत समित्यांची निवड करण्यात येणार होती. या समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून नुकतीच कामकाजाबाबतची माहिती प्रत्यक्ष भेटीतून करण्यात आली होती. त्यातून कऱ्हाड पंचायत समितीची निवड करण्यात आली. त्यामध्ये राज्य स्तरावर पंचायत समितीगणात कऱ्हाड पंचायत समितीला दुसरा क्रमांक तर विभागस्तरावर पुणे विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)