शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

येळगावकरांना प्रतीक्षा भाजपच्या निरोपाची

By admin | Updated: July 11, 2014 00:31 IST

माहेरची ओढ : मेळावा घेऊनच म्हणे करणार पक्ष प्रवेश

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून बाहेर पडलेले डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांना अजून राज्यस्तरीय नेतृत्वाकडून कोणताही निरोप आलेला नाही. विशेष म्हणजे, येळगावकर अजून भाजपच्या तालुका प्रमुखांशीच चर्चा करत बसले आहेत. मात्र, त्यांनी आपला भाजप प्रवेश कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊनच करणार असल्याचे जाहीर केले आहे. डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सोडून दोन दिवस उलटले आहेत. त्यांच्या जाण्याचे राष्ट्रवादीनेही फारसे मनावर घेतलेले नाही आणि येळगावकरांनीही अध्यक्षपदाचा राजीनामा फारसा काही मनाला लावून घेतलेला नाही. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तर ते ना आलेल्याचे समाधान ना गेलेल्याचे दु:ख अशी प्रतिक्रिया देऊन येळगावकरांच्यावरील आपला राग व्यक्त केला आहे. त्यांचा भाजप प्रवेश म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.दरम्यान, येळगावकर जाण्याचीच राष्ट्रवादी वाट पाहत होते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी तीन दिवसांपूर्वी मायणी येथे मेळावा घेतला आणि आपण पुढे काय करायचे, या अनुषंगाने निवडक कार्यकर्त्यांशी चर्चा केली. प्रत्येकांनी त्यांना भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. येळगावकरांनीही तोच निर्णय मान्य केला आहे. मात्र, प्रत्यक्षात येळगावकरांना भाजपकडून अजून कोणताही निरोप आलेला नाही. या तीन दिवसांत त्यांनी फक्त जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशीच आपली बोलणी सुरू ठेवली आहेत. राज्यपातळीवरील एकाही नेत्यांशी त्यांनी संपर्क साधलेला नाही आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. (प्रतिनिधी)