शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

येवा, साताऱ्यात ‘मिनी कोकण’ आसा!

By admin | Updated: March 14, 2015 00:01 IST

कष्टकऱ्यांचं सहजीवन : अजिंक्यताऱ्याच्या तीव्र चढावर वसलीय कोकणी लोकांची वसाहत

सचिन काकडे -सातारा -: परशुरामाची कोकणभूमी डोंगरदऱ्यांची. जाळल्याशिवाय उगवणार नाही, हा खुद्द परशुरामांनीच दिलेला शाप. कष्टप्रद जीवन अंगवळणी पडलेलंं. पोट नेईल तिकडं जायचं, पडेल ते काम करायचं आणि मुख्य म्हणजे एकत्र राहायचं हा खास कोकणी बाणा. अजिंंक्यताऱ्याच्या कुशीत तीव्र चढावर पाच-पंचवीस कुटुंबं अशीच एकगठ्ठा राहतायत. खरंतर या सगळ्या कुुटुंबांचं ‘घर’ एकच आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात पूर्वीपासूनच अनेक जाती-धर्मांच्या व्यक्ती गुण्यागोविंदाने राहत आहे. येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीतही कोकणातील काही कुटुंबांनी आपली वसाहत वसविली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी कोकणातील एक कुटुंब याठिकाणी स्थायिक झाले. परिस्थितीशी चार हात करीत या कुटुंबानं आपल्या हक्काचं घर उभारलं. आणि बघता-बघता याठिकाणी ऐंशी ते शंभर कोकणवासीयांची एक छोटी वसाहत निर्माण झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील केशव चापोळी, दाभोळे, बेलकरवाडी, शिवगणवाडी, खांदारे, बोरुले, नवलेजंगवाडी अशा गावांतील पाच-पंचवीस कुटुंबे याठिकाणी आज गुण्यागोविंदाने राहत आहेत. दिवाळी, दसरा, कोजागिरी, रंगपंचमी वर्षाकाठी येणारे सर्व सण ही कुटुंबे एकसंधपणे साजरी करतात. एवढंच काय, लग्न कार्यापासून ते चांगल्या, वाईट प्रसंगातही ही कुटुंबे एकमेकांचा हात मात्र सोडत नाहीत. या वसाहतीमधील काही व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत. तर काही युवक व्यवसाय व काही शिक्षण घेत आहे. येथील महिलादेखील आपल्या संसाराचा गाडा ओढत-ओढत बचतगटाच्या माध्यमातून लघु उद्योग करीत आहेत. विशेष म्हणजे अजिंक्यताऱ्यावर असणाऱ्या मोरांचा सांभाळ करणारी ‘मोरांची आई’ ललीता केसव याही याच वसाहतीत राहतात.वर्षाच्या शेवटी म्हणजे नववर्षाला वसाहतीमधील नागरिक प्रत्येकाकडून वर्गणी गोळा करतात आणि एकत्र स्रेहभोजनाचा आनंद घेतात. कोकणवासीयांचा ‘कोकणरत्न’या वसाहतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे श्री गणेशाचे मंदिर. सुमारे आठ लाख रुपये वर्गणीतून बांधण्यात आलेल्या या मंदिराचे नामकरण ‘कोकणरत्न’ असे करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिराकडे पाहिले तरी कोकणाची जाणीव होते. वसाहतीमधील नागरिक, युवक व महिलांनी अहोरात्र कष्ट करून हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात असणारी दशभुजा रूपातील गणेशाची मूर्ती सुमारे आठशे किलो वजनाची आहे. येथील नागरिक या ‘कोकणरत्ना’ची नित्यनियमाने पूजा करतात.रुग्णासाठी खास खुर्चीकोकणवासीयांची वसाहत अजिंक्यताऱ्याच्या तीव्र चढावर वसली आहे. यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीस खाली आणताना अनेक अडचणी येत असत. यावर उपाय म्हणून येथे राहणाऱ्या मोहन शिवगण यांनी आजारी व्यक्तीची ने-आण करण्यासाठी विशिष्ट अशी एक खुर्ची बनविली आहे. जेणेकरून काही नागरिकांना खुर्ची व्यवस्थित पकडता येईल. आजही वेळेप्रसंगी या खुर्चीचा वापर येथील नागरिक करतात.