शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

येवा, साताऱ्यात ‘मिनी कोकण’ आसा!

By admin | Updated: March 14, 2015 00:01 IST

कष्टकऱ्यांचं सहजीवन : अजिंक्यताऱ्याच्या तीव्र चढावर वसलीय कोकणी लोकांची वसाहत

सचिन काकडे -सातारा -: परशुरामाची कोकणभूमी डोंगरदऱ्यांची. जाळल्याशिवाय उगवणार नाही, हा खुद्द परशुरामांनीच दिलेला शाप. कष्टप्रद जीवन अंगवळणी पडलेलंं. पोट नेईल तिकडं जायचं, पडेल ते काम करायचं आणि मुख्य म्हणजे एकत्र राहायचं हा खास कोकणी बाणा. अजिंंक्यताऱ्याच्या कुशीत तीव्र चढावर पाच-पंचवीस कुटुंबं अशीच एकगठ्ठा राहतायत. खरंतर या सगळ्या कुुटुंबांचं ‘घर’ एकच आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात पूर्वीपासूनच अनेक जाती-धर्मांच्या व्यक्ती गुण्यागोविंदाने राहत आहे. येथील अजिंक्यतारा किल्ल्याच्या कुशीतही कोकणातील काही कुटुंबांनी आपली वसाहत वसविली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी सुमारे वीस वर्षांपूर्वी कोकणातील एक कुटुंब याठिकाणी स्थायिक झाले. परिस्थितीशी चार हात करीत या कुटुंबानं आपल्या हक्काचं घर उभारलं. आणि बघता-बघता याठिकाणी ऐंशी ते शंभर कोकणवासीयांची एक छोटी वसाहत निर्माण झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील केशव चापोळी, दाभोळे, बेलकरवाडी, शिवगणवाडी, खांदारे, बोरुले, नवलेजंगवाडी अशा गावांतील पाच-पंचवीस कुटुंबे याठिकाणी आज गुण्यागोविंदाने राहत आहेत. दिवाळी, दसरा, कोजागिरी, रंगपंचमी वर्षाकाठी येणारे सर्व सण ही कुटुंबे एकसंधपणे साजरी करतात. एवढंच काय, लग्न कार्यापासून ते चांगल्या, वाईट प्रसंगातही ही कुटुंबे एकमेकांचा हात मात्र सोडत नाहीत. या वसाहतीमधील काही व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत. तर काही युवक व्यवसाय व काही शिक्षण घेत आहे. येथील महिलादेखील आपल्या संसाराचा गाडा ओढत-ओढत बचतगटाच्या माध्यमातून लघु उद्योग करीत आहेत. विशेष म्हणजे अजिंक्यताऱ्यावर असणाऱ्या मोरांचा सांभाळ करणारी ‘मोरांची आई’ ललीता केसव याही याच वसाहतीत राहतात.वर्षाच्या शेवटी म्हणजे नववर्षाला वसाहतीमधील नागरिक प्रत्येकाकडून वर्गणी गोळा करतात आणि एकत्र स्रेहभोजनाचा आनंद घेतात. कोकणवासीयांचा ‘कोकणरत्न’या वसाहतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे येथे असणारे श्री गणेशाचे मंदिर. सुमारे आठ लाख रुपये वर्गणीतून बांधण्यात आलेल्या या मंदिराचे नामकरण ‘कोकणरत्न’ असे करण्यात आले आहे. त्यामुळे या मंदिराकडे पाहिले तरी कोकणाची जाणीव होते. वसाहतीमधील नागरिक, युवक व महिलांनी अहोरात्र कष्ट करून हे मंदिर बांधले आहे. या मंदिरात असणारी दशभुजा रूपातील गणेशाची मूर्ती सुमारे आठशे किलो वजनाची आहे. येथील नागरिक या ‘कोकणरत्ना’ची नित्यनियमाने पूजा करतात.रुग्णासाठी खास खुर्चीकोकणवासीयांची वसाहत अजिंक्यताऱ्याच्या तीव्र चढावर वसली आहे. यामुळे एखाद्या आजारी व्यक्तीस खाली आणताना अनेक अडचणी येत असत. यावर उपाय म्हणून येथे राहणाऱ्या मोहन शिवगण यांनी आजारी व्यक्तीची ने-आण करण्यासाठी विशिष्ट अशी एक खुर्ची बनविली आहे. जेणेकरून काही नागरिकांना खुर्ची व्यवस्थित पकडता येईल. आजही वेळेप्रसंगी या खुर्चीचा वापर येथील नागरिक करतात.