शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विमानतळ विस्ताराविरोधात श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा

By admin | Updated: July 7, 2015 22:18 IST

लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे.

सातारा : कऱ्हाड येथील विमानतळ विस्ताराला विरोध करत श्रमिक मुक्ती दलातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनावश्यक विस्तार, अशास्त्रीय विस्तार टाळण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड विमानतळ विस्ताराला विरोध करणारी आणि शास्त्रीय व कायद्यांमधील तरतुदींना सुसंगत पर्याय देणारी चळवळ २0११ पासून सुरु झाली. विमानतळ विस्तारिकरण हे पुनर्वसन अधिनियम १९९९, पुनर्वसन प्राधिकरणचे वेगवेगळे शासन निर्णय, राष्ट्रीय पुनर्वसन धोरण इत्यादीच्या आधारावर विचार केल्यास कायद्याच्या कक्षेत बसत नाही. भूसंपादनाच्या प्रत्येक कलमांच्या अंमलबजावणीवेळी बाधितांनी या पायावर आक्षेपही घेतले आहेत. पण या आक्षेपांना सुनावणी घेतली गेली नाही. तसेच उत्तरेही दिली नाहीत. आजही पूर्वीचे निर्णय काय आहेत, याची पर्वा न करता ‘आता विमानतळ विस्तार अंतीम झाला,’ अशा पध्दतीने संबंधित कार्यालयाचा व्यवहार सुरु आहे. अशा प्रकारे लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे. याबाबत चर्चा घडवून येणे आवश्यक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. साताऱ्यातील मोर्चामध्ये पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, जयसिंग गावडे, गोंविंदराव शिंदे, सिध्देश्वर पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)