शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

विमानतळ विस्ताराविरोधात श्रमिक मुक्ती दलाचा मोर्चा

By admin | Updated: July 7, 2015 22:18 IST

लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे.

सातारा : कऱ्हाड येथील विमानतळ विस्ताराला विरोध करत श्रमिक मुक्ती दलातर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अनावश्यक विस्तार, अशास्त्रीय विस्तार टाळण्यासाठी पुनर्वसन प्राधिकरणासोबत बैठक आयोजित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कऱ्हाड विमानतळ विस्ताराला विरोध करणारी आणि शास्त्रीय व कायद्यांमधील तरतुदींना सुसंगत पर्याय देणारी चळवळ २0११ पासून सुरु झाली. विमानतळ विस्तारिकरण हे पुनर्वसन अधिनियम १९९९, पुनर्वसन प्राधिकरणचे वेगवेगळे शासन निर्णय, राष्ट्रीय पुनर्वसन धोरण इत्यादीच्या आधारावर विचार केल्यास कायद्याच्या कक्षेत बसत नाही. भूसंपादनाच्या प्रत्येक कलमांच्या अंमलबजावणीवेळी बाधितांनी या पायावर आक्षेपही घेतले आहेत. पण या आक्षेपांना सुनावणी घेतली गेली नाही. तसेच उत्तरेही दिली नाहीत. आजही पूर्वीचे निर्णय काय आहेत, याची पर्वा न करता ‘आता विमानतळ विस्तार अंतीम झाला,’ अशा पध्दतीने संबंधित कार्यालयाचा व्यवहार सुरु आहे. अशा प्रकारे लोकशाही हक्कांना पायाखाली दाबणे आणि कायद्याच्या तरतुदीला बगल देणे, हे अन्यायकारक आणि लोकशाही प्रणालीला मारक आहे. याबाबत चर्चा घडवून येणे आवश्यक असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे. साताऱ्यातील मोर्चामध्ये पंजाबराव पाटील, आनंदराव जमाले, जयसिंग गावडे, गोंविंदराव शिंदे, सिध्देश्वर पाटील आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)