शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची जीवन प्राधिकरणवर धडक

By admin | Updated: November 17, 2014 23:27 IST

गृहलक्ष्मी भडकली : मतकर कॉलनीसह परिसरातील झोपडपट्टीत पाच महिन्यांपासून अपुरा पाणीपुरवठा

सातारा : येथील आयटीआय रोडवरील मतकर कॉलनीसह परिसरातील झोपडपट्टीत गेल्या चार-पाच महिन्यांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. यासंदर्भात वेळोवेळी तक्रार करून दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या महिला आज (सोमवारी) येथील जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात धडकल्या. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.मतकर कॉलनीतील महिलांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मतकर कॉलनीत गेल्या चार-पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित तसेच कमी दाबाने केला जात आहे. यासंदर्भात दि. ३० जून रोजी शाहूपुरी ग्रामपंचायत तसेच सरपंचांना पत्र पाठवून तेथील लोकांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, समस्या न सुटल्याने दि. २ सप्टेंबरला दुसरे पत्र शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना दिले. मात्र, कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. मतकर कॉलनी व परिसरातील झोपडपट्टीतील रहिवाशांनी दि. २२ सप्टेंबरला आयटीआय रोडवर धरणे आंदोलन केले होते. त्यावेळी जीवन प्राधिकरण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही आजतागायत या कॉलनीत व झोपडपट्टीत पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होतच आहे. ज्या दिवशी पाणी सोडले जाते, त्याची वेळ निश्चित नसते. त्यामुळे पाणी सोडल्याचे माहिती होण्यापूर्वी बंद झालेले असते. घरातील पुरुष मंडळी कामावर किंवा गृहिणी मुलांना शाळेत सोडण्यास जातात, त्याचवेळी पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी कधी आले, हे देखील लक्षात येत नाही. त्यामुळे अनेकांची गैरसोयच जास्त होत असल्याने पाणीपुरवठा करण्याची वेळ निश्चित करावी. या परिसरात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा परिसरातील ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील, असाही इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)आठवड्यातील तीन दिवस ठणठणाटया परिसरात सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत स्वरूपात होत असल्यामुळे ग्रामस्थांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच या आठवड्यात कहरच झाला आहे. यामध्ये मंगळवार, दि. ११, बुधवार, दि. १२, शुक्रवार, दि. १४ या दिवसांत पाणीपुरवठाच झालेला नाही. त्यामुळे महिला संतप्त झाल्या आहेत. जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणी सांगण्यासाठी मोठ्या संख्येने महिला आल्या होत्या.