शिवथर : मालगाव येथील ग्रामस्थांनी कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, शिकार बंदीवर आळा घातल्यामुळे वनविभागाला वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे शासनाच्या वतीने दारिद्र्यरेषेखाली ३४ कुटुंबांना गॅस कनेक्शन दिले. ‘कुटुंबातील महिलेला जळणापासून दूर ठेवून आधुनिक युगात गॅसच्या साह्याने स्वंयपाक व्हायला हवा. आजपर्यंत सर्वसामान्य कुटुंबातील महिला चुलीवरच स्वंयपाक करत असत. परिस्थितीमुळे महागाईचा गॅस कनेक्शन घेणे त्यांना होत नव्हते. परंतु संयुक्त वनव्यवस्थापन समिती मालगाव व वनविभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गॅसवाटप करण्यात आले आहे. मात्र, आता वनविभागामुळे येथील महिलांना गॅस कनेक्शन मिळाले आहे, ’ असे प्रतिपादन वनपाल जी. एम. भोसले यांनी केले.मालगाव, ता. सातारा येथे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाना गॅस वितरणप्रसंगी ते बोलत होते.त्यावेळी उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण, वनरक्षक दीपक गायकवाड, सरपंच सुजाता कदम, सुरेश कदम, ग्रामविकास अधिकारी संजय बोराटे उपसरपंच जितेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरेश कदम यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य शैलेश कदम, जमीर मुलाणी, रवींद्र कदम, एम. एन. मोहिते, व्ही. आर. शिंदे, तसेच गावातील ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)
मालगावातील महिलांना वनखात्यातर्फे गॅसवाटप
By admin | Updated: September 11, 2014 23:19 IST