शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या रागांच्या झळांत होरपळताहेत वन्यजीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ज्या गावांमध्ये कारवाई झाली त्याच गावात वणवे लागल्याच्या घटना सलगपणे दिसून येत आहेत. कारवाई करणाऱ्या वनविभागाची त्रेधा उडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रकारामुळे नाहकपणे वनसंपदा आणि वन्यजीव यांची न भरून येणारी हानी होत असल्याचे त्यांच्या लक्षातच येत नाही.

नैसर्गिक समृध्दी आणि वनसंपदा मुबलक उपलब्ध असणाऱ्या सातारा जिल्ह्यात वनक्षेत्राचाही उत्तमपणे सांभाळ करण्यात आला आहे. परिणामी बिबट्यासह अनेक वन्यप्राणी जिल्ह्याच्या वनक्षेत्रात मुक्तपणे वावरत असल्याचे आढळून येते. सुरक्षित अधिवास लाभल्यामुळे वन्यजीवांची संख्याही या परिसरात वाढल्याचे पहायला मिळते. ही समृध्दता टिकवून ठेवण्यासाठी आणि वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेपाला आळा घालण्यासाठी वनविभाग कार्यरत राहतो.

हिवाळा संपून उन्हाच्या रापीमुळे वनक्षेत्रातील गवत वाळू लागले की वणवा लागण्याच्या घटना सुरू होतात. गतवर्षी लॉकडाऊन आणि कोविडमुळे जिल्ह्यात वणव्याचे प्रमाण मर्यादित होते. अंधश्रध्दा आणि पारंपरिक विचारांच्या पगड्यामुळे खासगी क्षेत्र जाळत असताना वणवा लागल्याच्या घटना मागच्यावर्षी घडल्या होत्या. वर्षभरात वनकारवाई केलेल्या गावांतच वणवा लागल्याने याविषयी चर्चा सुरू झाली.

नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सातारा तालुक्यातील काही गावांच्या तरूणाईने या वृत्ताला दुजोराही दिला आहे. याबाबत तक्रार केली तर गावात वाद होतील म्हणून हा विषय आम्ही कुठेच बोललो नाही. पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत, किंवा ज्यांचे वनक्षेत्रातील अतिक्रमण काढले गेलेय त्यांच्याकडून चिडून हा प्रकार होत असल्याची माहिती तरूणाईने दिली.

चौकट :

माणसांची जिरवायला प्राण्यांची आहुती!

वनक्षेत्राचे रक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी वनविभागाची असते. त्यामुळे वनक्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये शिकार, बेकायदेशीर वृक्षतोड, वन हद्दीतील बांधकाम करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर वन कायद्यांन्वये गुन्हे दाखल केले जातात. ज्या ज्या गावांमध्ये वनविभागाच्यावतीने अशी कारवाई झाली आहे, त्याच गावात वणवा लागल्याची घटना घडल्याचे स्पष्ट होत आहे. वनक्षेत्राच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या वनविभागावरील राग काढण्याच्या निमित्ताने वनसंपदा आणि वन्यजीव यांच्या जिवावर उठणेे मानवतेला धरून नाही, हे नक्की.