शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंटच्या जंगलात रानटी प्राण्यांचा बाजार

By admin | Updated: July 18, 2015 00:34 IST

‘शोपीस’मधून प्राण्यांची ओळख : खऱ्याखुऱ्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले दुर्मिळ; वाढते औद्योगिकीकरण, नागरीवस्तीचा परिणाम

मलकापूर : सिमेंटचे वाढते जंगल व मोकळ्या पठारावर अतिक्रमण करून माणूसच जंगलापर्यंत पोहोचला आहे. धावपळीच्या जीवनात शहरीकरणाचा ओढा वाढतच आहे. या गोष्टींचा दुष्परिणाम म्हणून सध्या जंगली व रानटी प्राण्यांचे दर्शन दिवसेंदिवस दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे नव्या पिढीला प्राण्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांमधूनच ओळख करून देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ही कमतरता विचारात घेऊन हा आपल्या उदरनिर्वाहाचा एक मार्ग बनवत सध्या कऱ्हाड-मलकापूर परिसरात प्राण्यांचा रस्त्यावरच बाजार भरत आहे.वाढते शहरीकरण व औद्योगिक विकास म्हटलं की, रस्ते व नागरी वस्त्यांचे प्रमाण आपोआपच वाढते. या विकासाचा दुष्परिणाम म्हणून या ना त्या कारणाने सध्या भरमसाठ वृक्षतोड होत आहे. शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारतींची सिमेंटची जंगले निर्माण होत आहेत. या सर्वांचा निसर्गाचा समतोल बिघडण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. गावांपासून काही अंतरावरील शेतशिवारात सहजपणे दिसणारे हरीण, काळविट, ससा अशा प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने हे प्राणी पाहणे म्हणजे दुर्मिळ क्षण बनला आहे. या प्राण्यांबरोबरच भरमसाठ जंगलतोड होत असल्यामुळे जंगली प्राण्यांचे प्रमाणही घटत आहे, ही शोकांतिका आहे.शहरीकरणामुळे नोकरी व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने आज जवळ- जवळ ७० टक्के लोक नागरीवस्तीत वास्तव्यास आहेत. गेली काही वर्षांपासून नागरी वस्तीत जन्म घेतलेल्या नव्या पिढीला जंगली, रानटी व पाळीव प्राण्यांना ओळखण्यासाठी प्राण्यांचे पुतळे, खेळणी किंवा छायाचित्राचांच आधार घ्यावा लागत आहे. यासाठी वह्या-पुस्तकांबरोबरच शालेय वस्तू विक्री दुकानातून प्राण्यांचे वेगवेगळे चार्टही विक्रीस ठेवले गेले आहेत. शाळेतूनही प्रोजेक्टसाठी अशाच चित्रांचा व माहितीचा सर्रास उपयोग केला जात आहे. समाजाची हीच कमतरता ओळखून काही व्यावसायिकांनी प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बनवून शोपीस म्हणून विक्रीस ठेवले आहेत. त्यांच्या किमतीही भरमसाठ आहेत. सध्या कऱ्हाड व मलकापूर परिसरात लाकूड व इतर साहित्यापासून हरीण, वाघ, सिंह, घोडे, काळविट यासारख्या लहान मोठ्या प्राण्यांच्या प्रतिकृतींचा बाजार पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)प्राण्यांची वाढती शिकारहरीण, वाघ, बिबट्या यासारख्या जंगली प्राण्यांची शिकार करून कातडी व अवयवांची तस्करी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर खाण्यासाठी अन्न न मिळाल्याने काही प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वांमुळे प्राण्याची संख्याही घटत आहे. पवनचक्क्यांचे जाळेजंगलातून बाहेर पडून भटकंती करीत अन्न मिळविण्यासाठी प्राणी पठारावर यायचे; पण सध्या डोंगर पठारावर पवनचक्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे पठारेच नामशेष झाली आहेत. पवनचक्क्यांच्या आवाजामुळे प्राणी स्थलांतरित होत आहेत. माळरानावर फिरायला गेल्यास पूर्वी ससा, कोल्हा, लांडगे, साळिंदर आदी प्राणी दिसायचे; मात्र सध्या शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे या प्राण्यांचा वावर कमी झाला आहे. डोंगर पायथ्यालगतही सध्या वस्त्या झाल्या आहेत. त्यामुळे हे प्राणी नाहीसे झाल्यासारखी परिस्थिती आहे. - अशोक घोरपडे, ग्रामस्थ, चचेगावबेंदरासाठी मातीचे बैल जोडीऔद्योगिकीकरण व जनावरे संगोपनावरील वाढता खर्च विचारत घेता शेतकरीही जनावरे पाळत नाहीत. बैलाच्या साह्याने होणारी मशागतीची कामे ट्रॅक्टर व नवनवीन यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यामुळे गावोगावी पाळीव प्राण्यांची संख्याही घटली आहे. परिणामी गाय-बैलांची दिवाळी म्हणून साजरी होणारी बेंदूर सणालाही सध्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबात मातीच्याच बैलांची पूजा केली जाते.