शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सिमेंटच्या जंगलात रानटी प्राण्यांचा बाजार

By admin | Updated: July 18, 2015 00:34 IST

‘शोपीस’मधून प्राण्यांची ओळख : खऱ्याखुऱ्या वन्यप्राण्यांचे दर्शन झाले दुर्मिळ; वाढते औद्योगिकीकरण, नागरीवस्तीचा परिणाम

मलकापूर : सिमेंटचे वाढते जंगल व मोकळ्या पठारावर अतिक्रमण करून माणूसच जंगलापर्यंत पोहोचला आहे. धावपळीच्या जीवनात शहरीकरणाचा ओढा वाढतच आहे. या गोष्टींचा दुष्परिणाम म्हणून सध्या जंगली व रानटी प्राण्यांचे दर्शन दिवसेंदिवस दुर्मिळ झाले आहे. त्यामुळे नव्या पिढीला प्राण्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांमधूनच ओळख करून देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ही कमतरता विचारात घेऊन हा आपल्या उदरनिर्वाहाचा एक मार्ग बनवत सध्या कऱ्हाड-मलकापूर परिसरात प्राण्यांचा रस्त्यावरच बाजार भरत आहे.वाढते शहरीकरण व औद्योगिक विकास म्हटलं की, रस्ते व नागरी वस्त्यांचे प्रमाण आपोआपच वाढते. या विकासाचा दुष्परिणाम म्हणून या ना त्या कारणाने सध्या भरमसाठ वृक्षतोड होत आहे. शहरीकरणामुळे मोठमोठ्या इमारतींची सिमेंटची जंगले निर्माण होत आहेत. या सर्वांचा निसर्गाचा समतोल बिघडण्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. जंगलाचे प्रमाण कमी होत आहे. गावांपासून काही अंतरावरील शेतशिवारात सहजपणे दिसणारे हरीण, काळविट, ससा अशा प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने हे प्राणी पाहणे म्हणजे दुर्मिळ क्षण बनला आहे. या प्राण्यांबरोबरच भरमसाठ जंगलतोड होत असल्यामुळे जंगली प्राण्यांचे प्रमाणही घटत आहे, ही शोकांतिका आहे.शहरीकरणामुळे नोकरी व्यवसाय व शिक्षणाच्या निमित्ताने आज जवळ- जवळ ७० टक्के लोक नागरीवस्तीत वास्तव्यास आहेत. गेली काही वर्षांपासून नागरी वस्तीत जन्म घेतलेल्या नव्या पिढीला जंगली, रानटी व पाळीव प्राण्यांना ओळखण्यासाठी प्राण्यांचे पुतळे, खेळणी किंवा छायाचित्राचांच आधार घ्यावा लागत आहे. यासाठी वह्या-पुस्तकांबरोबरच शालेय वस्तू विक्री दुकानातून प्राण्यांचे वेगवेगळे चार्टही विक्रीस ठेवले गेले आहेत. शाळेतूनही प्रोजेक्टसाठी अशाच चित्रांचा व माहितीचा सर्रास उपयोग केला जात आहे. समाजाची हीच कमतरता ओळखून काही व्यावसायिकांनी प्राण्यांचे हुबेहूब पुतळे बनवून शोपीस म्हणून विक्रीस ठेवले आहेत. त्यांच्या किमतीही भरमसाठ आहेत. सध्या कऱ्हाड व मलकापूर परिसरात लाकूड व इतर साहित्यापासून हरीण, वाघ, सिंह, घोडे, काळविट यासारख्या लहान मोठ्या प्राण्यांच्या प्रतिकृतींचा बाजार पाहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)प्राण्यांची वाढती शिकारहरीण, वाघ, बिबट्या यासारख्या जंगली प्राण्यांची शिकार करून कातडी व अवयवांची तस्करी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. तर खाण्यासाठी अन्न न मिळाल्याने काही प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्वांमुळे प्राण्याची संख्याही घटत आहे. पवनचक्क्यांचे जाळेजंगलातून बाहेर पडून भटकंती करीत अन्न मिळविण्यासाठी प्राणी पठारावर यायचे; पण सध्या डोंगर पठारावर पवनचक्यांचे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे पठारेच नामशेष झाली आहेत. पवनचक्क्यांच्या आवाजामुळे प्राणी स्थलांतरित होत आहेत. माळरानावर फिरायला गेल्यास पूर्वी ससा, कोल्हा, लांडगे, साळिंदर आदी प्राणी दिसायचे; मात्र सध्या शहरीकरण व औद्योगिकीकरणामुळे या प्राण्यांचा वावर कमी झाला आहे. डोंगर पायथ्यालगतही सध्या वस्त्या झाल्या आहेत. त्यामुळे हे प्राणी नाहीसे झाल्यासारखी परिस्थिती आहे. - अशोक घोरपडे, ग्रामस्थ, चचेगावबेंदरासाठी मातीचे बैल जोडीऔद्योगिकीकरण व जनावरे संगोपनावरील वाढता खर्च विचारत घेता शेतकरीही जनावरे पाळत नाहीत. बैलाच्या साह्याने होणारी मशागतीची कामे ट्रॅक्टर व नवनवीन यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यामुळे गावोगावी पाळीव प्राण्यांची संख्याही घटली आहे. परिणामी गाय-बैलांची दिवाळी म्हणून साजरी होणारी बेंदूर सणालाही सध्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबात मातीच्याच बैलांची पूजा केली जाते.