शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात, तर वनसंपदेचे अतोनात नुकसान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण ...

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या व पठारावर वणवे लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे वनसंपदा व वन्यप्राण्यांचे देखील होरपळून मोठे नुकसान होत आहे. माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या काळवंडल्या आहेत. काही ठिकाणी अज्ञानातून, तर काही ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जात आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने वणवे रोखण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

यंदा वरकुटे-मलवडी, पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-म्हसवड, थदाळे, हस्तनपूर, शिंगणापूर आदी डोंगर-टेकड्यांवर वणव्यांचे प्रकार घडले आहेत. येथील लागलेल्या वणव्यांमुळे डोंगर-टेकड्या, पठारे ही उघडी बोडकी झाली आहेत. शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांना वाळका चारासुद्धा शिल्लक राहिला नाही. दोन वर्षापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. यामध्ये मुख्यतः पांढऱ्या आणि काळ्या कुसळांच्या गवताचे प्रमाण अधिक आहे. ते अधिक ज्वलनशील असल्याने ठिणगीच्या संपर्कात आले, तर ताबडतोब पेट घेते. बघता-बघता आग वाऱ्याच्या गतीने पसरून होत्याचे नव्हते होते.

माण तालुक्यातील काही भागात जाणून-बुजून वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे अमूल्य वनसंपदा त्याचबरोबर औषधी वनस्पतींचे नुकसान होत आहे. मोठे वृक्षही होरपळून जात आहेत. वन विभागाने आणि सामाजिक संस्थांनी तसेच शासनाने केलेल्या वृक्ष लागवडीचेही वणव्यामुळे नुकसान होत आहे. वृक्ष लागवड अभियानातील चांगली वाढलेली झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. वणव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत आहे. अनेक छोटे-मोठे वन्यजीव आगीत सापडून होरपळले जात असल्याने. जीवसृष्टीच्या चक्रातून गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे कित्येक वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

चौकट :

अनेकवेळा हे वणवे मुद्दाम लावले जात आहेत.

डोंगर-टेकड्यांवरील वणवा रात्रीच्या वेळी खूप छान दिसतो, म्हणून फोटो काढण्यासाठी वणवे लावणारे बहाद्दरही आहेत. पुढीलवर्षी पावसाळ्यात चांगले गवत यायचे असेल, तर आताचे जाळावे लागते, असा गैरसमज पसरल्यानेही वणवे लावले जात आहेत. सिगारेटच्या अर्धवट जळालेल्या थोटक्यानेही मोठे वणवे लागत आहेत. अजाणतेपणी किंवा मुद्दाम लावलेल्या वणव्यांनी वन्यजीवसृष्टीचे मात्र मोठे नुकसान होत आहे.

कोट :

सातत्याने लागणाऱ्या या वणव्यांवर वन विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी माण तालुक्याच्या प्रत्येक गावातून जनजागृती व्हायला हवी. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून, त्यांंच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, तरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा वाचण्यास मदत होईल. अन्यथा, पर्यावरणाचे नुकसान असेच होत राहील

- धीरज जगताप

पर्यावरणप्रेमी, वरकुटे-मलवडी

०१वरकुटे-मलवडी

माण तालुक्यातील डोंगरावरही वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वनमित्र वणवा विझविण्याचा प्रयत्न करतात. (छाया : सिध्दार्थ सरतापे)