शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात, तर वनसंपदेचे अतोनात नुकसान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण ...

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या व पठारावर वणवे लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे वनसंपदा व वन्यप्राण्यांचे देखील होरपळून मोठे नुकसान होत आहे. माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या काळवंडल्या आहेत. काही ठिकाणी अज्ञानातून, तर काही ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जात आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने वणवे रोखण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

यंदा वरकुटे-मलवडी, पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-म्हसवड, थदाळे, हस्तनपूर, शिंगणापूर आदी डोंगर-टेकड्यांवर वणव्यांचे प्रकार घडले आहेत. येथील लागलेल्या वणव्यांमुळे डोंगर-टेकड्या, पठारे ही उघडी बोडकी झाली आहेत. शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांना वाळका चारासुद्धा शिल्लक राहिला नाही. दोन वर्षापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. यामध्ये मुख्यतः पांढऱ्या आणि काळ्या कुसळांच्या गवताचे प्रमाण अधिक आहे. ते अधिक ज्वलनशील असल्याने ठिणगीच्या संपर्कात आले, तर ताबडतोब पेट घेते. बघता-बघता आग वाऱ्याच्या गतीने पसरून होत्याचे नव्हते होते.

माण तालुक्यातील काही भागात जाणून-बुजून वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे अमूल्य वनसंपदा त्याचबरोबर औषधी वनस्पतींचे नुकसान होत आहे. मोठे वृक्षही होरपळून जात आहेत. वन विभागाने आणि सामाजिक संस्थांनी तसेच शासनाने केलेल्या वृक्ष लागवडीचेही वणव्यामुळे नुकसान होत आहे. वृक्ष लागवड अभियानातील चांगली वाढलेली झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. वणव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत आहे. अनेक छोटे-मोठे वन्यजीव आगीत सापडून होरपळले जात असल्याने. जीवसृष्टीच्या चक्रातून गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे कित्येक वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

चौकट :

अनेकवेळा हे वणवे मुद्दाम लावले जात आहेत.

डोंगर-टेकड्यांवरील वणवा रात्रीच्या वेळी खूप छान दिसतो, म्हणून फोटो काढण्यासाठी वणवे लावणारे बहाद्दरही आहेत. पुढीलवर्षी पावसाळ्यात चांगले गवत यायचे असेल, तर आताचे जाळावे लागते, असा गैरसमज पसरल्यानेही वणवे लावले जात आहेत. सिगारेटच्या अर्धवट जळालेल्या थोटक्यानेही मोठे वणवे लागत आहेत. अजाणतेपणी किंवा मुद्दाम लावलेल्या वणव्यांनी वन्यजीवसृष्टीचे मात्र मोठे नुकसान होत आहे.

कोट :

सातत्याने लागणाऱ्या या वणव्यांवर वन विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी माण तालुक्याच्या प्रत्येक गावातून जनजागृती व्हायला हवी. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून, त्यांंच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, तरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा वाचण्यास मदत होईल. अन्यथा, पर्यावरणाचे नुकसान असेच होत राहील

- धीरज जगताप

पर्यावरणप्रेमी, वरकुटे-मलवडी

०१वरकुटे-मलवडी

माण तालुक्यातील डोंगरावरही वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वनमित्र वणवा विझविण्याचा प्रयत्न करतात. (छाया : सिध्दार्थ सरतापे)