शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

वणव्यामुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात, तर वनसंपदेचे अतोनात नुकसान...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:40 IST

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण ...

वरकुटे-मलवडी : उन्हाळा तीव्र होत असून, मार्च महिन्यातील वाढत्या तापमानामुळे पारा चाळीस अंशाकडे झुकला आहे. त्यातच यंदाच्या वर्षीच माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या व पठारावर वणवे लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यामुळे वनसंपदा व वन्यप्राण्यांचे देखील होरपळून मोठे नुकसान होत आहे. माण तालुक्यातील डोंगर-टेकड्या काळवंडल्या आहेत. काही ठिकाणी अज्ञानातून, तर काही ठिकाणी मुद्दाम वणवे लावले जात आहेत. पर्यावरणाच्यादृष्टीने वणवे रोखण्यासाठी वन विभागाने कडक पावले उचलणे गरजेचे आहे.

यंदा वरकुटे-मलवडी, पळसावडे, देवापूर, शिरताव, वरकुटे-म्हसवड, थदाळे, हस्तनपूर, शिंगणापूर आदी डोंगर-टेकड्यांवर वणव्यांचे प्रकार घडले आहेत. येथील लागलेल्या वणव्यांमुळे डोंगर-टेकड्या, पठारे ही उघडी बोडकी झाली आहेत. शेळ्या-मेंढ्यांसह जनावरांना वाळका चारासुद्धा शिल्लक राहिला नाही. दोन वर्षापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. यामध्ये मुख्यतः पांढऱ्या आणि काळ्या कुसळांच्या गवताचे प्रमाण अधिक आहे. ते अधिक ज्वलनशील असल्याने ठिणगीच्या संपर्कात आले, तर ताबडतोब पेट घेते. बघता-बघता आग वाऱ्याच्या गतीने पसरून होत्याचे नव्हते होते.

माण तालुक्यातील काही भागात जाणून-बुजून वणवे लावले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात आहेत. वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे अमूल्य वनसंपदा त्याचबरोबर औषधी वनस्पतींचे नुकसान होत आहे. मोठे वृक्षही होरपळून जात आहेत. वन विभागाने आणि सामाजिक संस्थांनी तसेच शासनाने केलेल्या वृक्ष लागवडीचेही वणव्यामुळे नुकसान होत आहे. वृक्ष लागवड अभियानातील चांगली वाढलेली झाडे वणव्याच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. वणव्यांमुळे वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येत आहे. अनेक छोटे-मोठे वन्यजीव आगीत सापडून होरपळले जात असल्याने. जीवसृष्टीच्या चक्रातून गंभीर परिणाम होत आहेत. त्यामुळे कित्येक वन्यजीव गावाकडे धाव घेत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

चौकट :

अनेकवेळा हे वणवे मुद्दाम लावले जात आहेत.

डोंगर-टेकड्यांवरील वणवा रात्रीच्या वेळी खूप छान दिसतो, म्हणून फोटो काढण्यासाठी वणवे लावणारे बहाद्दरही आहेत. पुढीलवर्षी पावसाळ्यात चांगले गवत यायचे असेल, तर आताचे जाळावे लागते, असा गैरसमज पसरल्यानेही वणवे लावले जात आहेत. सिगारेटच्या अर्धवट जळालेल्या थोटक्यानेही मोठे वणवे लागत आहेत. अजाणतेपणी किंवा मुद्दाम लावलेल्या वणव्यांनी वन्यजीवसृष्टीचे मात्र मोठे नुकसान होत आहे.

कोट :

सातत्याने लागणाऱ्या या वणव्यांवर वन विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे. यासाठी माण तालुक्याच्या प्रत्येक गावातून जनजागृती व्हायला हवी. वेगवेगळ्या समित्या स्थापन करून, त्यांंच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायला हवेत, तरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारी वनसंपदा वाचण्यास मदत होईल. अन्यथा, पर्यावरणाचे नुकसान असेच होत राहील

- धीरज जगताप

पर्यावरणप्रेमी, वरकुटे-मलवडी

०१वरकुटे-मलवडी

माण तालुक्यातील डोंगरावरही वणवे लावण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वनमित्र वणवा विझविण्याचा प्रयत्न करतात. (छाया : सिध्दार्थ सरतापे)