शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

वन्यप्राणी शिवारात; शेतकरी घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:15 IST

कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे  मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत  आहे. रानडुक्करांनी अक्षरश:  धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देकोयना भागातील येराड परिसरात दहशत रानडुकरांसह इतर प्राण्यांचा वावर; पिकाची नासधुस

कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे  मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत  आहे. रानडुक्करांनी अक्षरश:  धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

येराड, तामकडे या गावांच्या शिवारात रानडुक्करांपासुन ऊसाचे नुकसान केले जात आहे. ऊस खाण्यापेक्षा तो मोडुनच नासधुस केली जात आहे. तसेच डुकरांकडुन गांडुळ, हुमणी वाळवी यासारखे जमिनीतील जीवजंतु खाण्यासाठी शेतात व बांधावर ठिकठिकाणी खड्डे काढले जात आहेत. शेतातुन ये जा करण्यासाठी पिकांमधे हमरस्ता मळला आहे. काही शेतकºयांनी डुकरांच्या  त्रासाला कंटाळून भुईमुग पिक करणेच सोडुन दिले आहे. खत, बियाणे, तणनाशक, किटकनाशक यांचे वाढलेले दर तसेच मजुरांची टंचाई व शेतीमालाचे अस्थिर दर यामुळे अगोदरच शेतकरी हतबल झाला असुन यात वन्यप्राण्यांची भर पडली आहे. 

डोंगरमाथ्यावर दाट झाडीत राहणारे  वन्यप्राणी  पवनचक्कीमुळे व बेसुमार झालेल्या वृक्षतोडीमूळे हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे  स्थलांतरीत होत आहेत. मानवी वस्तीमध्ये  राहण्यासाठी ऊस किंवा ओढा नाल्यातील  निर्जन जागा निवडत असुन खाण्यासाठी जवळच मुबलक अन्न व पिण्याचे पाणी असल्याने प्राण्यांचा राबता दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसाढवळ्या शेतातुन रानडुकरांचे कळप जात आहेत. हे जीवावर बेतु शकते. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. रानडुकरांसह इतर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शक्कल लढवत आहेत.  बांधावर उग्र वासासाठी  धुर करणे, संपुर्ण  शेताला कुंपन घालणे यासह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. वन्य प्राण्यांकडून हल्ल्याची भिती

कोयना विभागातील शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने सध्या शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यापुर्वी रानडुकरांसह इतर प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी शिवारात जाण्यास घाबरत आहेत. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.