शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वन्यप्राणी शिवारात; शेतकरी घरात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 14:15 IST

कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे  मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत  आहे. रानडुक्करांनी अक्षरश:  धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देकोयना भागातील येराड परिसरात दहशत रानडुकरांसह इतर प्राण्यांचा वावर; पिकाची नासधुस

कोयनानगर (जि. सातरा) : कोयना भागातील येराड ता. पाटण परिसरात शेतकरी वन्यप्राण्यांच्या उपद्रवाला त्रासले आहेत. या भागात आता मुख्यत: भात, भुईमुग, नाचणी ही पिके असुन वन्यप्राण्यापासुन त्याचे  मोठया प्रमाणात नुकसान करण्यात येत  आहे. रानडुक्करांनी अक्षरश:  धुमाकूळ घातला आहे. वनविभागाने डुकरांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

येराड, तामकडे या गावांच्या शिवारात रानडुक्करांपासुन ऊसाचे नुकसान केले जात आहे. ऊस खाण्यापेक्षा तो मोडुनच नासधुस केली जात आहे. तसेच डुकरांकडुन गांडुळ, हुमणी वाळवी यासारखे जमिनीतील जीवजंतु खाण्यासाठी शेतात व बांधावर ठिकठिकाणी खड्डे काढले जात आहेत. शेतातुन ये जा करण्यासाठी पिकांमधे हमरस्ता मळला आहे. काही शेतकºयांनी डुकरांच्या  त्रासाला कंटाळून भुईमुग पिक करणेच सोडुन दिले आहे. खत, बियाणे, तणनाशक, किटकनाशक यांचे वाढलेले दर तसेच मजुरांची टंचाई व शेतीमालाचे अस्थिर दर यामुळे अगोदरच शेतकरी हतबल झाला असुन यात वन्यप्राण्यांची भर पडली आहे. 

डोंगरमाथ्यावर दाट झाडीत राहणारे  वन्यप्राणी  पवनचक्कीमुळे व बेसुमार झालेल्या वृक्षतोडीमूळे हे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे  स्थलांतरीत होत आहेत. मानवी वस्तीमध्ये  राहण्यासाठी ऊस किंवा ओढा नाल्यातील  निर्जन जागा निवडत असुन खाण्यासाठी जवळच मुबलक अन्न व पिण्याचे पाणी असल्याने प्राण्यांचा राबता दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसाढवळ्या शेतातुन रानडुकरांचे कळप जात आहेत. हे जीवावर बेतु शकते. त्यामुळे शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. रानडुकरांसह इतर प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकरी शक्कल लढवत आहेत.  बांधावर उग्र वासासाठी  धुर करणे, संपुर्ण  शेताला कुंपन घालणे यासह अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. वन्य प्राण्यांकडून हल्ल्याची भिती

कोयना विभागातील शिवारामध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने सध्या शेतकºयांमध्ये भितीचे वातावरण आहे. यापुर्वी रानडुकरांसह इतर प्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी शिवारात जाण्यास घाबरत आहेत. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.